शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

महिलेला संरक्षणासह निवासासाठी न्यायालयाने तासाभरात दिले आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2018 18:13 IST

मद्यपी पतीच्या मारहाणीनंतर घरातून हाकलून लावलेल्या पत्नीला न्यायालयात खटला दाखल होण्याच्या तासभरातच सरंक्षणासह निवास मिळून देण्यात आला.

अमरावती - मद्यपी पतीच्या मारहाणीनंतर घरातून हाकलून लावलेल्या पत्नीला न्यायालयात खटला दाखल होण्याच्या तासभरातच सरंक्षणासह निवास मिळून देण्यात आला. न्यायालयाच्या आदेशावरून सरंक्षण अधिकाºयांनी शुक्रवारी ही कारवाई केली. धामणगाव रेल्वेच्या इतिहासात प्रथमच असा अनुभवास आला. धामणगाव रेल्वे येथील रहिवासी महिला सारिका (३०) यांचा विवाह १३ आॅगस्ट २००५ रोजी गंगाधर मुलवंडे यांच्याशी झाला. पानठेला चालविणारे गंगाधरने लग्नानंतर दिडेक वर्षे पत्नीसोबत चांगला संसार केला. मात्र, त्यानंतर त्याला मद्याचे व्यसन जडले, तो पत्नीचा कौटुंबिक छळ करू लागला. पतीचा त्रास सहन करीत संसाराचा गाडा चालविणाºया सारिकाला दोन मुली आहेत. मद्यधुंद अवस्थेत गंगाधर पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करीत होता. ती कसेबसे दिवस काढत होती. मात्र, ३० आॅगस्ट २०१८ रोजी रात्री २ वाजता गंगाधरने पत्नीस लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तिने कशीबशी रात्र काढली, मात्र, सकाळीच बहीण प्रियंकाचे घर गाठून कौटुंबिक छळ सहन न झालेल्या सारिकाने धामणगावातील सरंक्षण अधिकारी कार्यालय गाठले.सरंक्षण अधिका-यांनी त्यांची तक्रार तत्काळ नोंदवून दिवाणी व फौजदारी न्यायालयात पाठविली. सारिकाला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविले. वैद्यकीय अधिकारी आशिष सालनकर यांनी वैद्यकीय अहवाल मिळवून सरंक्षण अधिकारी कुलदीप गावंडे यांनी प्रकरण न्यायालयात दाखल केले. प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी के.ए.नहर यांनी प्रकरणाची तत्क्षण दखल घेऊन सरंक्षण (कलम १८) व निवासाचा आदेश (कलम १९ अन्वये) पारित केले. याची अमंलबजावणी करण्यासाठी सरंक्षण अधिकारी कुलदीप गावंडे, दत्तापूर ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन कानडे, पोलीस कर्मचारी मोनाली बोडके व मंगेश लकडे यांनी पीडिताला घरी प्रवेश मिळून दिला. याशिवाय पीडिताचा कौटुंबिक छळ करू नये आणि घराबाहेर हाकलू नये, असे पतीला बजावण्यात आले. विशेष म्हणजे न्यायालयात प्रकरण दाखल झाल्याच्या तासाभरात आदेशाची अंमलबजावणी करीत पीडित महिलेला न्याय मिळाल्याची ही पहिलीच वेळ आहे. 

कौटुंबिक हिंसाचार ही एक मोठी सामाजिक समस्या आहे. पीडितांनी कुठल्याची प्रकारचा कौटुंबिक हिंसाचर सहन न करता, सरंक्षण अधिका-यांकडे दाद मागावी.- कुलदीप गावंडे, सरंक्षण अधिकारी, धामणगाव रेल्वे

टॅग्स :Courtन्यायालयnewsबातम्या