शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
3
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
4
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
5
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
6
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
7
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
8
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
9
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
10
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
11
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
12
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
13
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
14
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
15
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
16
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

मतमोजणी; प्रशासन सज्ज

By admin | Updated: October 18, 2014 22:56 IST

राज्याच्या १४ व्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी रविवार १९ आॅक्टोबर रोजी सकाळी ८ वाजेपासून प्रारंभ होईल. दुपारी १२ वाजेपर्यंत पूर्ण निकाल लावण्याची तयारी प्रशासनाने चालविली आहे.

अमरावती : राज्याच्या १४ व्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी रविवार १९ आॅक्टोबर रोजी सकाळी ८ वाजेपासून प्रारंभ होईल. दुपारी १२ वाजेपर्यंत पूर्ण निकाल लावण्याची तयारी प्रशासनाने चालविली आहे. अमरावती जिल्ह्यात १४ लाख, २२ हजार, ८५७ मतदारांनी मतदान केले असून आठही मतदारसंघांतील १३५ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला निश्चित केला जाईल. ११२ टेबलवर मतमोजणी होणार आहे.बुधवार १५ आॅक्टोबर रोजी पार पडलेल्या मतदानानंतर कोण विजयी होणार, या चर्चांनी मागील चार दिवस घालविले. मैदानात असलेल्या उमेदवारांची गर्दी बघता कोणीही उमेदवार ठामपणे विजयाचे दावे करु शकले नाही. मात्र मतदारराजाने कोणाच्या बाजूने कौल दिला, हे रविवार १९ आॅक्टोबर रोजी स्पष्ट होणार आहे. मतदानानंतर पक्षनिहाय अंदाज किंवा गुप्तचर यंत्रणेने वर्तविलेले अहवाल किती खरे ठरतात, हे दिसून येईल. मतमोजणीची प्रक्रिया त्यानंतर निर्माण होणारी परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. अमरावती, बडनेरा मतदारसंघाची मतमोजणी ही येथील विलासनगर भागातील शाासकीय वेअर हाऊसमध्ये होणार आहे. त्याअनुषंगाने शनिवारी जिल्हाधिकारी किरण गित्ते, पोलीस आयुक्त सुरेश मेकला यांनी स्ट्राँग रुम परिसराची पाहणी केली. यावेळी पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे, बी.के. गावराने, उपविभागीय अधिकारी प्रवीण ठाकरे, तहसीलदार सुरेश बगळे, ठाणेदार गणेश अणे, जिल्हा माहिती अधिकारी काचावार आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्तांनी मतमोजणीबाबतची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. उमेदवारांचे प्रतिनिधी, मीडिया केंद्र, कॅन्टीन, निवडणूक निरीक्षक, अधिकारी कक्ष आदींसाठी विविध व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक मतदारसंघनिहाय १४ टेबलवर मतमोजणी होणार आहे. कायदा, सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी मतदानस्थळांव्यतिरिक्त शहरातील काही संवेदनशील भागात अतिरिक्त कुमक तैनात केली जाणार आहे. उमेदवारांच्या प्रतिनिधींना सकाळी सात वाजता मतमोजणीस्थळी पोहचणे आवश्यक राहील, असे जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी सांगितले. प्रत्येक मतदार संघाच्या मतमोजणीसाठी १५० कर्मचारी नेमण्यात आले आहेत. काही कर्मचारी राखीव ठेवण्यात आल्याची माहिती आहे. सकाळी आठ वाजता पोस्टल बॅलेटच्या मतमोजणीला प्रारंभ केला जाणार आहे. त्यानंतर ईव्हीएमची मतमोजणी सुरु होईल. पोस्टल बॅलेटची मतमोजणी पूर्ण झाल्याशिवाय ईव्हीएमची अंतिम फेरीची मतमोजणी पूर्ण केली जाणार नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. मतमोजणी सुरळीतपणे पार पाडावी, यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.