शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
4
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
5
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
6
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
7
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
8
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
9
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
10
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
11
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
12
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
13
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
14
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
15
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
16
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
17
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
18
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
19
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
20
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे

मतमोजणी; प्रशासन सज्ज

By admin | Updated: October 18, 2014 22:56 IST

राज्याच्या १४ व्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी रविवार १९ आॅक्टोबर रोजी सकाळी ८ वाजेपासून प्रारंभ होईल. दुपारी १२ वाजेपर्यंत पूर्ण निकाल लावण्याची तयारी प्रशासनाने चालविली आहे.

अमरावती : राज्याच्या १४ व्या विधानसभा निवडणुकीची मतमोजणी रविवार १९ आॅक्टोबर रोजी सकाळी ८ वाजेपासून प्रारंभ होईल. दुपारी १२ वाजेपर्यंत पूर्ण निकाल लावण्याची तयारी प्रशासनाने चालविली आहे. अमरावती जिल्ह्यात १४ लाख, २२ हजार, ८५७ मतदारांनी मतदान केले असून आठही मतदारसंघांतील १३५ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला निश्चित केला जाईल. ११२ टेबलवर मतमोजणी होणार आहे.बुधवार १५ आॅक्टोबर रोजी पार पडलेल्या मतदानानंतर कोण विजयी होणार, या चर्चांनी मागील चार दिवस घालविले. मैदानात असलेल्या उमेदवारांची गर्दी बघता कोणीही उमेदवार ठामपणे विजयाचे दावे करु शकले नाही. मात्र मतदारराजाने कोणाच्या बाजूने कौल दिला, हे रविवार १९ आॅक्टोबर रोजी स्पष्ट होणार आहे. मतदानानंतर पक्षनिहाय अंदाज किंवा गुप्तचर यंत्रणेने वर्तविलेले अहवाल किती खरे ठरतात, हे दिसून येईल. मतमोजणीची प्रक्रिया त्यानंतर निर्माण होणारी परिस्थिती हाताळण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. अमरावती, बडनेरा मतदारसंघाची मतमोजणी ही येथील विलासनगर भागातील शाासकीय वेअर हाऊसमध्ये होणार आहे. त्याअनुषंगाने शनिवारी जिल्हाधिकारी किरण गित्ते, पोलीस आयुक्त सुरेश मेकला यांनी स्ट्राँग रुम परिसराची पाहणी केली. यावेळी पोलीस उपायुक्त सोमनाथ घार्गे, बी.के. गावराने, उपविभागीय अधिकारी प्रवीण ठाकरे, तहसीलदार सुरेश बगळे, ठाणेदार गणेश अणे, जिल्हा माहिती अधिकारी काचावार आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्तांनी मतमोजणीबाबतची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून जाणून घेतली. उमेदवारांचे प्रतिनिधी, मीडिया केंद्र, कॅन्टीन, निवडणूक निरीक्षक, अधिकारी कक्ष आदींसाठी विविध व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक मतदारसंघनिहाय १४ टेबलवर मतमोजणी होणार आहे. कायदा, सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी मतदानस्थळांव्यतिरिक्त शहरातील काही संवेदनशील भागात अतिरिक्त कुमक तैनात केली जाणार आहे. उमेदवारांच्या प्रतिनिधींना सकाळी सात वाजता मतमोजणीस्थळी पोहचणे आवश्यक राहील, असे जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी सांगितले. प्रत्येक मतदार संघाच्या मतमोजणीसाठी १५० कर्मचारी नेमण्यात आले आहेत. काही कर्मचारी राखीव ठेवण्यात आल्याची माहिती आहे. सकाळी आठ वाजता पोस्टल बॅलेटच्या मतमोजणीला प्रारंभ केला जाणार आहे. त्यानंतर ईव्हीएमची मतमोजणी सुरु होईल. पोस्टल बॅलेटची मतमोजणी पूर्ण झाल्याशिवाय ईव्हीएमची अंतिम फेरीची मतमोजणी पूर्ण केली जाणार नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. मतमोजणी सुरळीतपणे पार पाडावी, यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.