शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींच्या ११ वर्षांच्या काळात भारताची झेप; जगातील चौथी मोठी आर्थिक महासत्ता झाल्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य: सोमवार 26 मे 2025; प्रिय व्यक्तीचा सहवास, वैवाहिक जीवनात सौख्य लाभेल; असा असेल तुमचा आजचा दिवस 
3
‘मे’न्सून : १२ दिवस आधीच आल्या सुखसरी; १६ वर्षांत प्रथमच मे महिन्यात मान्सून राज्यात दाखल
4
महाराष्ट्रावर ५.६ लाख कोटींचे कर्ज; मेट्रो, महामार्ग, स्मार्ट सिटीला चालना, राज्याची स्थिती इतरांपेक्षा अधिक चांगली
5
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
6
भारताच्या अर्थव्यवस्थेची भरारी, जपान आणि इंग्लंडलाही टाकले मागे; तुम्हा-आम्हाला कसा लाभ होईल?
7
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
8
फक्त मनोरंजनासाठी पत्ते खेळणे हे अनैतिक वर्तन मानले जाऊ शकत नाही: सर्वोच्च न्यायालय
9
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
10
नरीमन पॉइंट ते पालघर प्रवास सव्वा तासात! उत्तन-विरार सागरी सेतूला लवरकरच हिरवा कंदील
11
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
12
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
13
‘इज्जत’ महत्त्वाची आहे; महिलेबरोबर पोस्ट, लालूंनी मुलाला पक्षातून हाकलले
14
चिमुकल्याने सू-सू केल्यामुळे रेल्वेच्या कोचमध्ये राडा; महिलेसह तिघांना बेदम मारहाण
15
मेट्रोने दीड वर्षापूर्वी कंत्राटदार नेमूनही कारशेड उभारणी अजून रखडलेलीच
16
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
17
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
18
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
19
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
20
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय

कापसाच्या दरात घसरण सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2019 05:35 IST

साठवलेला कापूस निघतोय बाहेर; भाववाढीच्या अपेक्षेने पत्करली जोखीम, पदरी निराशाच

अंजनगाव सुर्जी (अमरावती): दिवाळी दरम्यान कापूस सहा हजारांवर विकला गेला. त्यामुळे कापसाचे भाव वाढण्याची चर्चा होती. बहुतांश शेतकऱ्यांची सहा हजारांपेक्षा अधिक दर असताना कापूस विकला नाही. मात्र, आता ५४०० रुपयांपेक्षा कमी दर झाले. दरात घसरण सुरूच असल्याने शेतकरी साठवलेला कापूस विक्री करण्यासाठी धडपडत असून चिंताग्रस्त असल्याचे चित्र आहे.शेतमालाच्या तेजीचा लाभ शेतकºयांपेक्षा व्यापाºयांनाच अधिक होतो. तेजी मंदीचा अंदाज घेऊन शेतमाल विकण्यासाठी बाजारात येत आहे. यावर्षी कापूस आल्यानंतर बाजारात सहा हजार होते. कापूस खरेदी सुरू झाली तेव्हा हळूहळू दर वाढत होते. त्यामुळे अधिक भाव वाढण्याची आशा शेतकºयांना लागली होती. परिणामी बहुतांश शेतकºयांनी कापूस नवीन घरात सांभाळून ठेवला. दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटला तरी कापसाच्या दरात वाढ होण्याऐवजी घसरण सुरू झाली आहे. आजघडीला ५४०० ते ५ हजार रुपयांपर्यंत दर घसरले आहेत. परिणामी कापसाची साठवणूक करणारे शेतकरी तोट्यात आहेत. कापसासारखी जोखीम घरात बाळगू नये, यासाठी शेतकरी जसे भाव वाढतील तसे विकण्यास सुरुवात करतात. मात्र, यावर्षी भाववाढीचे संकेत मिळाल्याने सधन शेतकºयांनी शेकडो क्विंटलची थप्पी घरात लावून ठेवली. एकाचवेळी विक्री केल्यास त्याला लाभ होईल, या आशेवर ते थांबले खरे; मात्र अद्याप भावात घसरण सुरूच असल्याने आता शेतकºयांची चिंता वाढली आहे. भाव वाढले नाही तर अधिक वेळ वाट पाहण्याऐवजी मिळेल त्या दरात विकून मोकळे व्हावे म्हणून कापूस घेऊन बाजारात येणाºयांची गर्दी आता वाढली आहे.निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादन घटले. उत्पादन घटले तर दर वाढतात, हे समीकरणही यावेळी फोल ठरले व साठा केलेल्या शेतकºयांना तोटा झाला. आता शेतकरी कापूस विकण्याची घाई करीत आहे. त्यांनी सर्व कापूस संपल्यावर दर वाढल्यास त्याचा लाभ व्यापाºयांना होणार आहे.

टॅग्स :cottonकापूस