शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

कापसाच्या दरात घसरण सुरूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2019 05:35 IST

साठवलेला कापूस निघतोय बाहेर; भाववाढीच्या अपेक्षेने पत्करली जोखीम, पदरी निराशाच

अंजनगाव सुर्जी (अमरावती): दिवाळी दरम्यान कापूस सहा हजारांवर विकला गेला. त्यामुळे कापसाचे भाव वाढण्याची चर्चा होती. बहुतांश शेतकऱ्यांची सहा हजारांपेक्षा अधिक दर असताना कापूस विकला नाही. मात्र, आता ५४०० रुपयांपेक्षा कमी दर झाले. दरात घसरण सुरूच असल्याने शेतकरी साठवलेला कापूस विक्री करण्यासाठी धडपडत असून चिंताग्रस्त असल्याचे चित्र आहे.शेतमालाच्या तेजीचा लाभ शेतकºयांपेक्षा व्यापाºयांनाच अधिक होतो. तेजी मंदीचा अंदाज घेऊन शेतमाल विकण्यासाठी बाजारात येत आहे. यावर्षी कापूस आल्यानंतर बाजारात सहा हजार होते. कापूस खरेदी सुरू झाली तेव्हा हळूहळू दर वाढत होते. त्यामुळे अधिक भाव वाढण्याची आशा शेतकºयांना लागली होती. परिणामी बहुतांश शेतकºयांनी कापूस नवीन घरात सांभाळून ठेवला. दोन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी उलटला तरी कापसाच्या दरात वाढ होण्याऐवजी घसरण सुरू झाली आहे. आजघडीला ५४०० ते ५ हजार रुपयांपर्यंत दर घसरले आहेत. परिणामी कापसाची साठवणूक करणारे शेतकरी तोट्यात आहेत. कापसासारखी जोखीम घरात बाळगू नये, यासाठी शेतकरी जसे भाव वाढतील तसे विकण्यास सुरुवात करतात. मात्र, यावर्षी भाववाढीचे संकेत मिळाल्याने सधन शेतकºयांनी शेकडो क्विंटलची थप्पी घरात लावून ठेवली. एकाचवेळी विक्री केल्यास त्याला लाभ होईल, या आशेवर ते थांबले खरे; मात्र अद्याप भावात घसरण सुरूच असल्याने आता शेतकºयांची चिंता वाढली आहे. भाव वाढले नाही तर अधिक वेळ वाट पाहण्याऐवजी मिळेल त्या दरात विकून मोकळे व्हावे म्हणून कापूस घेऊन बाजारात येणाºयांची गर्दी आता वाढली आहे.निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादन घटले. उत्पादन घटले तर दर वाढतात, हे समीकरणही यावेळी फोल ठरले व साठा केलेल्या शेतकºयांना तोटा झाला. आता शेतकरी कापूस विकण्याची घाई करीत आहे. त्यांनी सर्व कापूस संपल्यावर दर वाढल्यास त्याचा लाभ व्यापाºयांना होणार आहे.

टॅग्स :cottonकापूस