शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
7
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
8
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
9
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
10
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
11
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
12
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
13
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
14
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
15
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
16
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
17
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
18
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
19
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
20
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट

कापूस उत्पादकांना ४५० कोटींचा फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 23:30 IST

यंत्र सर्वच बीटी वाणावर गुलाबी बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे.

ठळक मुद्देगुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव : १८ हजार हेक्टर कपाशीचे क्षेत्र प्रभावित

आॅनलाईन लोकमतचांदूरबाजार : यंत्र सर्वच बीटी वाणावर गुलाबी बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील १८ हजार हेक्टरवरील कपाशीचे पीक ८० ते ९० टक्के बुडाले आहे. परिणामी तालुक्यातील कापूस उत्पादकांना ४५० कोटींचा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.चार ते पाच वर्षांपासून तालुक्यात सोयाबीन पीक शेतकऱ्यांना धोका देत असल्यामुळे तसेच मागील वर्षी कापसाला चांगले भाव मिळाल्यामुळे शेतकरी वर्ग सोयाबीनकडून कपाशीच्या पिकाकडे वळला. त्यात यावर्षी कापसाचे पीकही उत्तम आले. परंतु ऐन पीक हाती येण्याच्या वेळेतच घात झाला आणि गुलाबी बोंडअळीने कापसाच्या बोंडावर तुफानी हल्ला चढविला. कपाशीच्या झाडावरील फुटण्यास तयार असलेली ६० ते ७० पक्की बोंडे अक्षरश: खराब झालीत. त्यामुळे कपाशीचा दर्जा घसरून उत्पादनात खूप मोठी घट झाली.तालुक्यातील कापूस उत्पादकांच्या एकत्रित नुकसानीच्या ४५० कोटीच्या आकड्याला कृषी विभागाच्या अहवालाचा आधार आहे. जिल्हा कृषी विभागाच्या कृषी समितीने नोव्हेंबरमध्ये आपला अहवाल जाहीर केला आहे. त्या अहवालानुसार गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे एकरी १ लाख २० हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. तालुक्यातील कापूस पेऱ्याचा विचार करता व शेतकऱ्यांच्या हातात फारसे काही लागले नसल्याचे चित्र आहे.आर्थिक स्थिती खालावलीयंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी अत्यंत कठीण गेला आहे. शेतकऱ्यांच्या हातून यंदा सुरुवातीच्या कमी पावसामुळे उडीद, मूग ही पिके हातून गेलीत. नंतर संत्रा फळगळीमुळे हेही पीक बुडाले. सोयाबीन पिकाने तर यावर्षी शेतकऱ्यांना अक्षरश: निराशा केली. त्यामुळे कधी नव्हे ती तालुक्यातील शेतकºयांची आर्थिक स्थिती यावर्षी खालावली आहे.शेतकºयांची परिस्थिती बिकट आहे. अशावेळी मदतीला शासन धावून आले पाहिले. अन्यथा शेतकरी आत्मघाती निर्णयापर्यंत पोहचू शकतात. तेव्हा शासनाने त्वरीत मदतीचा निर्णय घ्यावा.- बच्चू कडू,आमदार, अचलपूर