शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कापूस उत्पादकांना ४५० कोटींचा फटका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 23:30 IST

यंत्र सर्वच बीटी वाणावर गुलाबी बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे.

ठळक मुद्देगुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव : १८ हजार हेक्टर कपाशीचे क्षेत्र प्रभावित

आॅनलाईन लोकमतचांदूरबाजार : यंत्र सर्वच बीटी वाणावर गुलाबी बोंडअळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील १८ हजार हेक्टरवरील कपाशीचे पीक ८० ते ९० टक्के बुडाले आहे. परिणामी तालुक्यातील कापूस उत्पादकांना ४५० कोटींचा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.चार ते पाच वर्षांपासून तालुक्यात सोयाबीन पीक शेतकऱ्यांना धोका देत असल्यामुळे तसेच मागील वर्षी कापसाला चांगले भाव मिळाल्यामुळे शेतकरी वर्ग सोयाबीनकडून कपाशीच्या पिकाकडे वळला. त्यात यावर्षी कापसाचे पीकही उत्तम आले. परंतु ऐन पीक हाती येण्याच्या वेळेतच घात झाला आणि गुलाबी बोंडअळीने कापसाच्या बोंडावर तुफानी हल्ला चढविला. कपाशीच्या झाडावरील फुटण्यास तयार असलेली ६० ते ७० पक्की बोंडे अक्षरश: खराब झालीत. त्यामुळे कपाशीचा दर्जा घसरून उत्पादनात खूप मोठी घट झाली.तालुक्यातील कापूस उत्पादकांच्या एकत्रित नुकसानीच्या ४५० कोटीच्या आकड्याला कृषी विभागाच्या अहवालाचा आधार आहे. जिल्हा कृषी विभागाच्या कृषी समितीने नोव्हेंबरमध्ये आपला अहवाल जाहीर केला आहे. त्या अहवालानुसार गुलाबी बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकऱ्यांचे एकरी १ लाख २० हजार रुपयांचे नुकसान झाले असल्याचे स्पष्टपणे नमूद केले आहे. तालुक्यातील कापूस पेऱ्याचा विचार करता व शेतकऱ्यांच्या हातात फारसे काही लागले नसल्याचे चित्र आहे.आर्थिक स्थिती खालावलीयंदाचा खरीप हंगाम शेतकऱ्यांसाठी अत्यंत कठीण गेला आहे. शेतकऱ्यांच्या हातून यंदा सुरुवातीच्या कमी पावसामुळे उडीद, मूग ही पिके हातून गेलीत. नंतर संत्रा फळगळीमुळे हेही पीक बुडाले. सोयाबीन पिकाने तर यावर्षी शेतकऱ्यांना अक्षरश: निराशा केली. त्यामुळे कधी नव्हे ती तालुक्यातील शेतकºयांची आर्थिक स्थिती यावर्षी खालावली आहे.शेतकºयांची परिस्थिती बिकट आहे. अशावेळी मदतीला शासन धावून आले पाहिले. अन्यथा शेतकरी आत्मघाती निर्णयापर्यंत पोहचू शकतात. तेव्हा शासनाने त्वरीत मदतीचा निर्णय घ्यावा.- बच्चू कडू,आमदार, अचलपूर