शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Coronavirus positive story; अमरावती जिल्ह्यातील २७७ गावांनी रोखल्या कोरोनाच्या दोन्ही लाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 22:36 IST

Amravati news कोरोनापासून बचावासाठीच्या त्रिसूत्रीचे पालन करीत जिल्ह्यातील २७७ गावांनी कोरोनाची पहिली व दुसरी लाट थोपविण्याची किमया साधली आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढले असताना या दोन्ही लाटांदरम्यान आपल्या गावाची वेस सुरक्षित ठेवण्यात या गावांनी यश मिळविले आहे.

ठळक मुद्देया २७७ गावांचे सर्वेक्षण करून त्याचा पॅटर्न निर्माण करण्याची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने लोकप्रतिनिधींसह, जिल्हा प्रशासन व जिल्हा परिषदेच्या यंत्रणांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी आता होऊ लागली आहे. या सर्वेक्षणाच्या माध्यमातून उपाय योजना करण्यास मदत होऊ शकत

लोकमत न्यूज नेटवर्क 

अमरावती : कोरोनापासून बचावासाठीच्या त्रिसूत्रीचे पालन करीत जिल्ह्यातील २७७ गावांनी कोरोनाची पहिली व दुसरी लाट थोपविण्याची किमया साधली आहे. पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात रुग्ण वाढले असताना या दोन्ही लाटांदरम्यान आपल्या गावाची वेस सुरक्षित ठेवण्यात या गावांनी यश मिळविले आहे. त्यामुळे या गावांच्या यशाचे नेमके गमक शोधून त्याचा पॅटर्न विकसित करण्याची आवश्यकता आहे.

जवळपास दीड वर्षाच्या अविरत परिश्रमानंतर दुसरी लाट ओसरण्यास सुरुवात झालेली दिसत आहे. प्रशासकीय यंत्रणा काहीशी थकलेली असली तरी तिसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी पुन्हा जोरकस प्रयत्न करीत आहे. पहिल्या लाटेचा ग्रामीण भागापेक्षा शहरी भागात कोरोनाचा संसर्ग वाढीस लागला होता. दुसऱ्या लाटेत शहरात कोरोना संसर्ग कमी असली तरी जिल्ह्यातील ग्रामीण भागात मात्र संसर्ग चांगलाच वाढला आहे. कोरोना संसर्गाची वाढती व्याप्ती लक्षात घेता बाधितांच्या जवळून संपर्कातील व्यक्तीचे कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंग करण्यात व्यस्त असलेल्या प्रशासकीय यंत्रणेने मोठ्या प्रमाणात नागरिकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला. या गावांनी जाणीवपूर्वक किंवा आपसुकच आचरणात आणलेली जीवनपद्धती व आपल्या दैनंदिन व्यवहारावर घातलेल्या मर्यादांचा महसूल, आरोग्य आणि ग्रामीण विकास विभागातील अधिकाऱ्यांनी अभ्यास केल्यास त्याचा तिसऱ्या लाटेचा मुकाबला करताना उपयोग होऊ शकतो. या गावांनी प्रशासनाच्या त्रिसूत्रीचे प्रामाणिकपणे पालन केल्यामुळे ही गावे आजघडीला कोरोनाच्या संसर्गापासून दूर असल्याचे जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांनी सांगितले.

अनेक तालुक्यांतील गावांचे योगदान

जिल्ह्यात प्रामुख्याने दुर्गम भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेळघाटातील धारणी, चिखलदरा या तालुक्यासह इतरही १२ तालुक्यांमध्ये अनेक गावांनी कोरोनाला वेशीवरच रोखले. कोरोनाला दोन्ही लाटांमध्ये थोपविणाऱ्या २७७ गावांपैकी अनेक गावे ही आदिवासी व गैरआदिवासी भाग असलेल्या तालुक्यातील आहेत.

असे रोखले कोरोनाला

या गावातील बहुतांश नागरिकांनी संक्रमित शहरी तसेच ग्रामीण भागातील काही मोठ्या गावांपासून स्वतःला दूर ठेवले. यातील बहुतेक गावे दुर्गम व गैरआदिवासी भागातील असल्याने गावकऱ्यांनी शहरी भागात जाणे. जाणीवपूर्वक टाळले. कोणी बाहेरून गावात आल्यास त्यांना दूर ठेवून विलगीकरणात ठेवण्यात आले. विशेष म्हणजे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनासाठी प्रभावी जनजागृती, शासन व प्रशासनाने जारी केलेल्या त्रिसूत्रीचे पालन व ग्राम दक्षता समिती, ग्रामपंचायतींनी केलेल्या उपाययोजनांमुळे आजघडीला कोरोना रोखण्यात यश आले आहे.

कोरोनाच्या संसर्गापासून ग्रामीण भागातील २७७ गावे दूर आहेत. त्यातील काही गावे आदिवासी व गैरआदिवासी भागातील आतापर्यंत कोरोनाला रोखण्यात या गावांना यश आले. ही समाधानाची बाब आहे. यातील काही निवड गावांनी उपाययोजनांबाबत केलेल्या उपाययोजनांचा अभ्यास करून त्यानुसार इतरही गावात उपाययोजना करण्यासाठी प्रयत्न केले जातील.

- अविश्यांत पंडा,

मुख्य कार्यकारी अधिकारीजिल्हा परिषद

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या