शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
6
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
7
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
8
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
9
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
10
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
11
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
12
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
13
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
14
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
15
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
16
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
17
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

कोरोनाने २५ हजार २९४ गाठली, पाच दिवसांत १८१८

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:13 IST

अमरावती : कोरोना संक्रमितांच्या आकडेवारीने कहर केला आहे. रविवारी पुन्हा ३९९ पॉझिटिव्ह आले, तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत ...

अमरावती : कोरोना संक्रमितांच्या आकडेवारीने कहर केला आहे. रविवारी पुन्हा ३९९ पॉझिटिव्ह आले, तिघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत २५ हजार २९४ संक्रमितांची नोंद झाली, तर मृतांची संख्या ४३५ झाली आहे. १० फेब्रुवारीपासून सातत्याने तीन शतकी रूग्णसंख्येने अमरावतीकरांमध्ये भीती व्यक्त होत आहे.

नवीन वर्षात जानेवारीपासून जिल्ह्यात कोरोना संक्रमितांच्या संख्येत बेफाम वाढ होत आहे. फेब्रुवारीत यात अधिक भर पडली आहे. विशेषत: कोरोनाने ज्येष्ठ नागरिकांचे बळी घेतल्याची आकडेवारी आहे. अमरावती शहरात संक्रमितांची संख्या वाढीस लागली असून, महापालिका प्रशासनाने गृह विलगीकरण रुग्ण शोधमोहीम हाती घेतली आहे. दुसरीकडे जिल्हा प्रशासनाने गर्दी टाळण्यासाठी विविध उपाययोजनांवर भर देण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे. परंतु, दरदिवशी कोरोना पॉझिटिव्ह रुग्णसंख्या आढळून येत असल्याने आरोग्य यंत्रणा हैराण झाली आहे.

------------

आतापर्यंत ४३५ मृत्यू

मार्चपासून तर आतापर्यंत ४३५ कोरोना संक्रमित रुग्णांना जीव गमावावा लागला आहे. रविवारी तीन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यात अमरावती येथील कृष्णार्पण कॉलनीतील ६४ वर्षीय पुरुष, राजापेठ येथील नरहरीनगरातील ८४ वर्षीय पुरुष, तर प्रसादनगरातील ७३ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.

---------------------

त्रिसूत्रीचे पालन विसरले

कोरोना लस येताच, नागरिक त्रिसूत्रीचे पालन करणे विसरले आहेत. केवळ ५ ते १० टक्केच नागरीक मास्कचा वापर करतात. शारीरिक अंतराचे पालन कुठेही दिसून येत नाही. बाजारपेठेतील गर्दी बघता, कोरोनाचा स्फोट होण्याच्या दिशेने ही वाटचाल सुरू झाली आहे. नियमित हात धुणे तर आता बंदच झाले आहे. कोरोना वाढीस बहुधा नागरिक जबाबदार असल्याचे एकंदर चित्र आहे.

----------

मृत्युदर १.८६ टक्के

आतापर्यंत निष्पन्न झालेल्या २५ हजार २९४ संक्रमितांपैकी कोरोनाने ४३५ जणांचा बळी घेतला. हा मृत्युदर १.८६ टक्के असा आहे. मृतांमध्ये वयस्कर व्यक्ती व वृद्धांची संख्या अधिक आहे.

----------------

कॉलन्यांमध्ये संसर्गाची भीती

शहरातील कॉलनी, अपार्टमेंट यात कोरोना पॉझिटिव्ह जादा आढळून येत आहेत. त्याच्या तुलनेत मागास नागरी वस्त्यांमध्ये कोरोनाग्रस्त आढळून येण्याची संख्या कमी आहे.

--------------

रविवारी यंदाचा उच्चांक

नवीन वर्षात १४ फेब्रुवारीपर्यंत रविवारी निष्पन्न झालेला कोरोनाग्रस्तांचा ३९९ हा आकडा सर्वाधिक आहे. १० ते १४ फेब्रुवारी या दरम्यान पाच दिवसांत १८१८ जणांना कोरोनाचे निदान झाले आहे.

-------------------

एकूण पॉझिटिव्ह- ३९९

दाखल रुग्ण - ५११

बरे होऊन घरी परतले- ३७४

महापालिका क्षेत्रात गृह विलगीकरण - २२५

ग्रामीण क्षेत्रात गृह विलगीकरण - ३६९

ॲक्टिव्ह रुग्ण - ११०५

रिकव्हरी रेट - ९३.९१

डबलिंग रेट- २६६.१

एकूण नमुने - १ लाख ९३ हजार ४६४