शहरं
Join us  
Trending Stories
1
हिजाब वादानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार यांची सुरक्षा वाढवली, पोलिसांनी व्यक्त केली भीती
2
माणिकराव कोकाटेंना आजच रात्री अटक होणार? नाशिक पोलिसांची टीम लिलावती रुग्णालयात दाखल
3
"निवडणूक आयोग बेईमान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 'गजनी"; हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
4
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
5
महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे; चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चेनंतर निर्णय
6
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
7
ठाकरेंचा शिलेदार भाजपामध्ये... संजोग वाघेरेंचा राजीनामा, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात भूकंप
8
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
9
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
10
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
11
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
12
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
13
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
14
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
15
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
16
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
17
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
18
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
19
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
20
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना संसर्गात ५३८ पुरुषांचे मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 05:00 IST

 जिल्ह्यातील कोरोना संसर्गाच्या मृत्यूबाबतची कारणमीमांसा वेळोवेळी करण्यात आली असता, यात ८० टक्क्यांवर नागरिकांना कॉमार्बिड आजार असल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय उर्वरित मृत्यूमध्ये लक्षणे अंगावर काढणे घातक ठरले आहे. मंगळवारी दगावलेली चांदूर रेल्वे तालुक्यातील मांडवा येथील सहा महिन्यांची बालिका ही आतापर्यंतची सर्वांत कमी वयाची रुग्ण ठरली आहे. याशिवाय ९२ वर्षांचे अन्य एक ज्येष्ठ नागरिक  सर्वाधिक वयाचे रुग्ण ठरले आहेत.

ठळक मुद्दे‘डेथ ऑडिट’, जिल्ह्यात आतापर्यंत १८८ महिला दगावल्या

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोना संसर्गामुळे जिल्ह्यात आतापर्यंत ७२६ रुग्णांचा मृत्यू झाला. यात ५३८ पुरुष व १८८ महिलांचा समावेश आहे. ५० वर्षांवरील रुग्णांवर कोरोनाची वक्रदृष्टी असल्याचे दिसून आले. बाधितांच्या मृत्यूमध्ये सर्वाधिक ५८२ मृत्यू हे ५० वर्षांवरील नागरिकांचे आहे. यामध्येही पुरुषांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक असल्याचे वास्तव ‘डेथ ऑडिट’मध्ये स्पष्ट झाले. जिल्ह्यात ४ एप्रिलला झालेला पहिला कोरोनाग्रस्त हा ‘होमडेथ’ होता. तेव्हापासून कोरोना संसर्गात मृत्यूचे तांडव सुरू आहे. त्यानंतर एप्रिलमध्ये १० मृत्यू झालेत. यात ८ केसेस या ‘होमडेथ’ होत्या. त्यानंतर जिल्ह्यात होमडेथ व्यक्तींचे स्वॅब घेणे बंद केले. त्याऐवजी त्या परिवारातील हायरिस्कमधील व्यक्तींचे स्वॅब घेण्यात येत आहेत. जिल्ह्याचा मृत्युदर हा त्यावेळी सात ते आठ टक्के असा असल्याने अमरावती जिल्हा राज्यात सर्वाधिक मृत्युदराचा ठरला होता.  जिल्ह्यातील कोरोना संसर्गाच्या मृत्यूबाबतची कारणमीमांसा वेळोवेळी करण्यात आली असता, यात ८० टक्क्यांवर नागरिकांना कॉमार्बिड आजार असल्याचे स्पष्ट झाले. याशिवाय उर्वरित मृत्यूमध्ये लक्षणे अंगावर काढणे घातक ठरले आहे. मंगळवारी दगावलेली चांदूर रेल्वे तालुक्यातील मांडवा येथील सहा महिन्यांची बालिका ही आतापर्यंतची सर्वांत कमी वयाची रुग्ण ठरली आहे. याशिवाय ९२ वर्षांचे अन्य एक ज्येष्ठ नागरिक  सर्वाधिक वयाचे रुग्ण ठरले आहेत. जिल्ह्यात ६० ते ७० वर्षांचे नागरिकांवरच कोरोनाची अधिक वक्रदृष्टी का, याबाबतचे गंभीरतेने विचार होऊन उपाययोजना होणे महत्त्वाचे आहे. 

१८९ महिलांचेही मृत्यूकोरोनाकाळात १८९ महिलांचे मृत्यू जिल्ह्यात झाले आहेत. यामध्ये ५० ते ७० वयोगटातील अधिक रुग्ण आहेत.  जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अहवालानुसार ५१ ते ६०  वयोगटातील ५६, तर ६१ ते ७० या वयोगटातील ५५ महिलांचे उपचारादरम्यान मृत्यू झाला. अंगावर दुखणे काढणे व  कॉर्माबिडी आजार व रोगप्रतिकार शक्ती घटणे ही प्रमुख कारणे आहेत.

६१ ते ७० वर्षे वयोगटात मृतांची संख्या अधिकजिल्ह्यात १३ एप्रिलपर्यंत कोरोना मृत्यूमध्ये ५० ते ६० वयोगटात आतापर्यंत १७५, तर ६१ ते ७० वयोगटात २०९ रुग्णांचा समावेश आहे. या व्यक्ती कामानिमित्त बाहेरगावी जास्त राहतात व बाहेरच्या व्यक्तींच्या जास्त संपर्कात राहत असल्याने त्यांना संसर्ग अधिक होतो. अंगावर लक्षणे काढणेदेखील महागडे ठरू शकते.

पुरुष कामानिमित्त बाहेर असताना, त्यांचा अनेकांशी संपर्क येतो. त्यामुळे पुरुषांची पॉझिटिव्हिटी अधिक आहे. याशिवाय अंगावर दुखणे काढणे, रोगप्रतिकार शक्तीत घट व कॉमार्बिड आजारांमुळे संसर्गात मृत्यूचे प्रमाण वाढते. - श्यामसुंदर निकम, जिल्हा शल्यचिकित्सक

मार्च महिन्यात सर्वाधिक मृत्यूजिल्ह्यात यापूर्वी सप्टेंबर २०२० मध्ये कोरोनाचा ब्लास्ट झाला. त्यावेळी महिनाभरात ७,७१३ पॉझिटिव्हची नोंद व १५४ मृत्यू झाले. मात्र, मार्च २०२१ मध्ये आलेल्या दुसऱ्या लाटेत १३,५१८ पॉझिटिव्हची नोंद व १६४ जणांचा बळी गेलेला आहे. कोरोनाचा नवा स्ट्रेनचा संसर्ग अधिक असल्याने जिल्ह्यात उद्रेक झाला होता. काही दिवस माघारत नाही तोच पुन्हा संसर्ग वाढायला लागला आहे.

रोगप्रतिकार शक्ती महत्त्वाचीकोरोना संक्रमित व्यक्तींमध्ये त्यांच्या रोगप्रतिकार शक्तीचीही महत्त्वाचा भूमिका आहे. रोगप्रतिकार शक्ती चांगली असल्यास संसर्गाचा गंभीर परिणाम होत नसल्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांनी सांगितले. यासाठी विविध उपाययोजना करणे महत्त्वाचे आहे. ज्येष्ठ नागरिकांमध्ये प्रतिकार करण्याची क्षमता कमी असल्याने आजार अंगलट येतात.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDeathमृत्यू