शहरं
Join us  
Trending Stories
1
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
2
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
3
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
4
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
5
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
6
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
7
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
8
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
9
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
10
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
11
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
12
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
13
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
14
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
15
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न
16
मंदिराजवळ कुणी बिगर हिंदू प्रसाद विकत असेल तर त्याला...; साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांचं वादग्रस्त विधान
17
करुर येथील चेंगराचेंगरीसाठी पोलिसांनी विजयला ठरवले जबाबदार, म्हणाले तो सभेला जाणीवपूर्वक उशिरा आला कारण...
18
संवेदनशील पूर परिस्थितीत एसटी मुख्यालयात हजर नसलेल्या ३४ आगार प्रमुखांवर कारवाई होणार!
19
"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा
20
मौलाना तौकीर रजा, पेट्रोल बॉम्ब, अवैध शस्त्रास्त्रं अन्...; FIR मध्ये पोलिसांनी केले मोठे खुलासे, तुम्हालाही धक्का बसेल!

कोरोनामुळे यंदाही सरकारी काटकसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:10 IST

अमरावती : कोविड-१९ मुळे राज्यात मार्च महिन्यापासून कडक निर्बंध लागू करण्यात आल्यामुळे त्याचा राज्याच्या आर्थिक परिस्थितीवर परिणाम झाला ...

अमरावती : कोविड-१९ मुळे राज्यात मार्च महिन्यापासून कडक निर्बंध लागू करण्यात आल्यामुळे त्याचा राज्याच्या आर्थिक परिस्थितीवर परिणाम झाला आहे. यामुळे राज्य शासनाने सर्व विभागांना यंदाच्या अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या निधीचा ६० टक्के रक्कम उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. अत्यावश्यक बाबी वगळता इतर विभागांमधील शासकीय खरेदीला ब्रेक लावला आहे. मात्र, जिल्हा नियोजन समिती व आमदार स्थानिक विकास निधीला हे निर्बंध लागू राहणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

राज्याची आर्थिक स्थिती कोरोनामुळे खालावली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदीच्या ६० टक्के निधी उपलब्ध करून देतानाच केंद्र व इतर बाह्य संस्था अर्थसाहाय्यित योजना त्या अर्थसाहाय्याच्या प्रमाणात आहेत. तशा सुरू ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शासनाने सर्व शासकीय कार्यालयीन कामकाजाच्या खर्चात काटकसर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार कार्यालयीन कार्यशाळा, सेमिनार, भाड्याने कार्यालय घेणे, प्राधान्य असलेल्या बाबींची खरेदी करणे या बाबी टाळण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. भांडवली अर्थात बांधकामाच्या खर्चावर निर्बंध घालताना उपलब्ध केलेल्या ६० टक्के निधीच्या ५० टक्के रकमेचा कामांना प्रशासकीय मान्यता देण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे भांडवली खर्चासाठी अर्थसंकल्पीय तरतूद केवळ ३० टक्के निधी उपलब्ध होणार आहे. याच वेळी पाणीपुरवठा स्वच्छता व पाणीटंचाईच्या भांडवली खर्चात ही अट लागू राहणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

बॉक्स

आमदार निधी, डीपीसीला सवलत

राज्य शासनाने सर्व विभागाच्या खरेदी भांडवली खर्च यावर निर्बंध लागू केले असले तरी आमदार स्थानिक विकासनिधी व जिल्हा नियोजन समिती यांना पूर्ण निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. या दोहोंच्या अंतर्गत येणारा भांडवली खर्च व खरेदीसाठी पूर्ण निधी मिळणार असल्याचे शासननिर्णयात स्पष्ट केले आहे. यासाठी पहिल्या सहा महिन्यांसाठी ५० टक्के निधी वितरित केला जाणार आहे. हे स्पष्ट करतानाच दुसऱ्या सहामाहीसाठी नवीन आदेश काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. जिल्हा नियोजन समितीला प्राप्त झालेल्या ३० टक्के निधी हा उपाययोजनांसाठी खर्च करण्याचे आदेश यापूर्वीच दिल्याने जिल्हा परिषदेला नियोजनासाठी केवळ ७० टक्के निधी उपलब्ध होणार आहे.