शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे यंदाही सरकारी काटकसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:10 IST

अमरावती : कोविड-१९ मुळे राज्यात मार्च महिन्यापासून कडक निर्बंध लागू करण्यात आल्यामुळे त्याचा राज्याच्या आर्थिक परिस्थितीवर परिणाम झाला ...

अमरावती : कोविड-१९ मुळे राज्यात मार्च महिन्यापासून कडक निर्बंध लागू करण्यात आल्यामुळे त्याचा राज्याच्या आर्थिक परिस्थितीवर परिणाम झाला आहे. यामुळे राज्य शासनाने सर्व विभागांना यंदाच्या अर्थसंकल्पात तरतूद केलेल्या निधीचा ६० टक्के रक्कम उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. अत्यावश्यक बाबी वगळता इतर विभागांमधील शासकीय खरेदीला ब्रेक लावला आहे. मात्र, जिल्हा नियोजन समिती व आमदार स्थानिक विकास निधीला हे निर्बंध लागू राहणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

राज्याची आर्थिक स्थिती कोरोनामुळे खालावली आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात केलेल्या तरतुदीच्या ६० टक्के निधी उपलब्ध करून देतानाच केंद्र व इतर बाह्य संस्था अर्थसाहाय्यित योजना त्या अर्थसाहाय्याच्या प्रमाणात आहेत. तशा सुरू ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. शासनाने सर्व शासकीय कार्यालयीन कामकाजाच्या खर्चात काटकसर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार कार्यालयीन कार्यशाळा, सेमिनार, भाड्याने कार्यालय घेणे, प्राधान्य असलेल्या बाबींची खरेदी करणे या बाबी टाळण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. भांडवली अर्थात बांधकामाच्या खर्चावर निर्बंध घालताना उपलब्ध केलेल्या ६० टक्के निधीच्या ५० टक्के रकमेचा कामांना प्रशासकीय मान्यता देण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे भांडवली खर्चासाठी अर्थसंकल्पीय तरतूद केवळ ३० टक्के निधी उपलब्ध होणार आहे. याच वेळी पाणीपुरवठा स्वच्छता व पाणीटंचाईच्या भांडवली खर्चात ही अट लागू राहणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

बॉक्स

आमदार निधी, डीपीसीला सवलत

राज्य शासनाने सर्व विभागाच्या खरेदी भांडवली खर्च यावर निर्बंध लागू केले असले तरी आमदार स्थानिक विकासनिधी व जिल्हा नियोजन समिती यांना पूर्ण निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. या दोहोंच्या अंतर्गत येणारा भांडवली खर्च व खरेदीसाठी पूर्ण निधी मिळणार असल्याचे शासननिर्णयात स्पष्ट केले आहे. यासाठी पहिल्या सहा महिन्यांसाठी ५० टक्के निधी वितरित केला जाणार आहे. हे स्पष्ट करतानाच दुसऱ्या सहामाहीसाठी नवीन आदेश काढण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. जिल्हा नियोजन समितीला प्राप्त झालेल्या ३० टक्के निधी हा उपाययोजनांसाठी खर्च करण्याचे आदेश यापूर्वीच दिल्याने जिल्हा परिषदेला नियोजनासाठी केवळ ७० टक्के निधी उपलब्ध होणार आहे.