शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना, दुसऱ्या लाटेचा आलेख जिल्ह्यात माघारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 05:00 IST

 जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला प्रारंभ झाला. जिल्हा किंबहुना राज्यात दुसऱ्या लाटेची सुरुवातच अमरावतीपासूनच झाली. यात फेब्रुवारी महिन्यात १३,२३० पॉझिटिव्ह व ९२ रुग्णांचे मृत्यू झाले. त्यानंतर मार्च महिन्यात १३,५१८ पॉझिटिव्ह १६४ मृत्यू, एप्रिल महिन्यात १६,६९४ पॉझिटिव्ह व ४१० मृत्यू झालेले आहेत. याशिवाय मे महिन्याच्या २७ दिवसांत उच्चांकी २३,८३३ पॉझिटिव्ह व ४३८ मृत्यू झालेले आहेत.

ठळक मुद्देगुरुवारच्या चाचण्यांमध्ये ७.४७ टक्केच पाॅझिटिव्हिटीची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा आलेख आता माघारायला लागला आहे. गुरुवारच्या चाचणीत ७.४७ टक्केच पॉझिटिव्हिटी नोंद झाल्याने जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला प्रारंभ झाला. जिल्हा किंबहुना राज्यात दुसऱ्या लाटेची सुरुवातच अमरावतीपासूनच झाली. यात फेब्रुवारी महिन्यात १३,२३० पॉझिटिव्ह व ९२ रुग्णांचे मृत्यू झाले. त्यानंतर मार्च महिन्यात १३,५१८ पॉझिटिव्ह १६४ मृत्यू, एप्रिल महिन्यात १६,६९४ पॉझिटिव्ह व ४१० मृत्यू झालेले आहेत. याशिवाय मे महिन्याच्या २७ दिवसांत उच्चांकी २३,८३३ पॉझिटिव्ह व ४३८ मृत्यू झालेले आहेत. मात्र, या पाच दिवसांत पॉझिटिव्हीटीत कमी आल्याने रोज नव्या रुग्णांची नोंद कमी येत आहे.फेब्रुवारीत राज्यात जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या रोज वाढू लागल्याने येथील सात नमुने पुणे एनआयव्हीला तपासणीकरिता पाठविले असता, चार नमुन्यांमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळून आला. यानंतरही रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने पुन्हा चार रुग्ण प्रकारातील प्रत्येकी २५ नमुने तपासणीला पाठविले असता, रोनाचा डबल म्युटंट व्हेरिएंट आढळून आल्याचे आयसीएमआरने स्पष्ट केले होते. यात संक्रमणाचा दर अधिक असल्याने कोरोनाग्रस्तांची संख्यावाढ झाल्याचे सांगण्यात आले.

ग्रामीणमध्ये कोरोनाचा स्फोटजिल्हा ग्रामिणमध्ये एप्रिल ते डिसेंबर २०२० मध्ये ७,१३४ पाॅझिटिव्ह व ६३३ मृत्यूची नोंद झाली व यंदा जानेवारी ते २६ मे पर्यंत ३९,६४६ पॉझिटिव्ह व ६३३ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. यामध्ये होम आयसोलेशनमधील रुग्णांनी नियम पाळले नसल्याने कुटुंबाचे कुटुंब पॉझिटिव्ह आलेले आहेत.  याशिवाय लक्षणे अंगावर काढणे, कोरोना चाचणींना उशीर त्याचप्रमाणे लगतच्या जिल्ह्याशी संपर्क यामुळे कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत.

कोरोना, १७ मृत्यू, ४५५ पॉझिटिव्हअमरावती : जिल्ह्यात गुरुवारी उपचारादरम्यान १५ संक्रमितांचा मृत्यू झाल्याने कोरोनाग्रस्त मृतांची संख्या १,४१४ झालेली आहे. याशिवाय दोन अन्य जिल्ह्यांतील रुग्णांचा मृतात समावेश आहे. जिल्ह्यात नव्या ४५५ पॉझिटिव्हची नोंद झाल्याने संक्रमितांची एकूण संख्या ९०,५३० झालेली आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अहवालानुसार गुरुवारी उपचारादरम्यान ८५ वर्षीय महिला, कारंजा घाडगे, ७० वर्षीय पुरुष, नांदगाव खंडेश्वर, ६६ वर्षीय पुरुष, कांडली, ७५ वर्षीय पुरुष, परतवाडा, ४४ वर्षीय पुरुष, कांडली, परतवाडा, ४६ वर्षीय महिला, रविनगर, अमरावती, ४१ वर्षीय पुरुष, शिंदी, अचलपूर, ५३ वर्षीय महिला, अचलपूर, ६० वर्षीय महिला, परतवाडा, ४९ वर्षीय महिला, नायगाव, ६५ वर्षीय पुरुष, वरूड, ४९ वर्षीय पुरुष, माळवेशपुरा, अचलपूर, ७० वर्षीय पुरुष, चांदूर रेल्वे, ७० वर्षीय पुरुष, अचलपूर व ४० वर्षीय महिला, सुकळी याशिवाय ४८ वर्षीय पुरुष, तळेगाव पंत, आष्टी, वर्धा, ७५ वर्षीय महिला, कोळंबी, मूर्तिजापूर, अकोला या रुग्णांचा मृत्यू झाला.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या