शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

कोरोना, दुसऱ्या लाटेचा आलेख जिल्ह्यात माघारला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 05:00 IST

 जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला प्रारंभ झाला. जिल्हा किंबहुना राज्यात दुसऱ्या लाटेची सुरुवातच अमरावतीपासूनच झाली. यात फेब्रुवारी महिन्यात १३,२३० पॉझिटिव्ह व ९२ रुग्णांचे मृत्यू झाले. त्यानंतर मार्च महिन्यात १३,५१८ पॉझिटिव्ह १६४ मृत्यू, एप्रिल महिन्यात १६,६९४ पॉझिटिव्ह व ४१० मृत्यू झालेले आहेत. याशिवाय मे महिन्याच्या २७ दिवसांत उच्चांकी २३,८३३ पॉझिटिव्ह व ४३८ मृत्यू झालेले आहेत.

ठळक मुद्देगुरुवारच्या चाचण्यांमध्ये ७.४७ टक्केच पाॅझिटिव्हिटीची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा आलेख आता माघारायला लागला आहे. गुरुवारच्या चाचणीत ७.४७ टक्केच पॉझिटिव्हिटी नोंद झाल्याने जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यापासून कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला प्रारंभ झाला. जिल्हा किंबहुना राज्यात दुसऱ्या लाटेची सुरुवातच अमरावतीपासूनच झाली. यात फेब्रुवारी महिन्यात १३,२३० पॉझिटिव्ह व ९२ रुग्णांचे मृत्यू झाले. त्यानंतर मार्च महिन्यात १३,५१८ पॉझिटिव्ह १६४ मृत्यू, एप्रिल महिन्यात १६,६९४ पॉझिटिव्ह व ४१० मृत्यू झालेले आहेत. याशिवाय मे महिन्याच्या २७ दिवसांत उच्चांकी २३,८३३ पॉझिटिव्ह व ४३८ मृत्यू झालेले आहेत. मात्र, या पाच दिवसांत पॉझिटिव्हीटीत कमी आल्याने रोज नव्या रुग्णांची नोंद कमी येत आहे.फेब्रुवारीत राज्यात जिल्ह्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या रोज वाढू लागल्याने येथील सात नमुने पुणे एनआयव्हीला तपासणीकरिता पाठविले असता, चार नमुन्यांमध्ये कोरोनाचा नवा स्ट्रेन आढळून आला. यानंतरही रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने पुन्हा चार रुग्ण प्रकारातील प्रत्येकी २५ नमुने तपासणीला पाठविले असता, रोनाचा डबल म्युटंट व्हेरिएंट आढळून आल्याचे आयसीएमआरने स्पष्ट केले होते. यात संक्रमणाचा दर अधिक असल्याने कोरोनाग्रस्तांची संख्यावाढ झाल्याचे सांगण्यात आले.

ग्रामीणमध्ये कोरोनाचा स्फोटजिल्हा ग्रामिणमध्ये एप्रिल ते डिसेंबर २०२० मध्ये ७,१३४ पाॅझिटिव्ह व ६३३ मृत्यूची नोंद झाली व यंदा जानेवारी ते २६ मे पर्यंत ३९,६४६ पॉझिटिव्ह व ६३३ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. यामध्ये होम आयसोलेशनमधील रुग्णांनी नियम पाळले नसल्याने कुटुंबाचे कुटुंब पॉझिटिव्ह आलेले आहेत.  याशिवाय लक्षणे अंगावर काढणे, कोरोना चाचणींना उशीर त्याचप्रमाणे लगतच्या जिल्ह्याशी संपर्क यामुळे कोरोनाचे रुग्ण वाढले आहेत.

कोरोना, १७ मृत्यू, ४५५ पॉझिटिव्हअमरावती : जिल्ह्यात गुरुवारी उपचारादरम्यान १५ संक्रमितांचा मृत्यू झाल्याने कोरोनाग्रस्त मृतांची संख्या १,४१४ झालेली आहे. याशिवाय दोन अन्य जिल्ह्यांतील रुग्णांचा मृतात समावेश आहे. जिल्ह्यात नव्या ४५५ पॉझिटिव्हची नोंद झाल्याने संक्रमितांची एकूण संख्या ९०,५३० झालेली आहे. जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अहवालानुसार गुरुवारी उपचारादरम्यान ८५ वर्षीय महिला, कारंजा घाडगे, ७० वर्षीय पुरुष, नांदगाव खंडेश्वर, ६६ वर्षीय पुरुष, कांडली, ७५ वर्षीय पुरुष, परतवाडा, ४४ वर्षीय पुरुष, कांडली, परतवाडा, ४६ वर्षीय महिला, रविनगर, अमरावती, ४१ वर्षीय पुरुष, शिंदी, अचलपूर, ५३ वर्षीय महिला, अचलपूर, ६० वर्षीय महिला, परतवाडा, ४९ वर्षीय महिला, नायगाव, ६५ वर्षीय पुरुष, वरूड, ४९ वर्षीय पुरुष, माळवेशपुरा, अचलपूर, ७० वर्षीय पुरुष, चांदूर रेल्वे, ७० वर्षीय पुरुष, अचलपूर व ४० वर्षीय महिला, सुकळी याशिवाय ४८ वर्षीय पुरुष, तळेगाव पंत, आष्टी, वर्धा, ७५ वर्षीय महिला, कोळंबी, मूर्तिजापूर, अकोला या रुग्णांचा मृत्यू झाला.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या