शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

कोरोनाचा उद्रेक थांबेना, उच्चांकी २६ मृत्यू, ५९३ नवे पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 05:00 IST

जिल्ह्यात सोमवारी ५,५४२ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यामध्ये १०.७० अशी पॉझिटिव्हिटी नोंद झाली आहे. चार दिवसांत चाचण्यांची संख्या बऱ्यापैकी वाढल्यानंतर रुग्णसंख्या वाढत असली तरी यामध्ये पॉझिटिव्हिटी कमी होत असल्याने दिलासा मिळाला आहे. 

ठळक मुद्देआतापर्यंत ७९३ बाधितांचे मृत्यू, ५७,१६५ कोरोनाग्रस्तांची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात कोरोना संसर्गात मृत्यूचा ग्राफ वाढता आहे. सोमवारी पुन्हा २६ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात पहिल्यांदा १६ बाधितांच्या मृत्यूची नोंद झाल्याने मृतांची संख्या ७९३ झाली. याशिवाय १० कोरोना मृत हे नागपूर, यवतमाळ व वर्धा  जिल्ह्यातील आहेत. जिल्ह्यात सोमवारी पुन्हा ५९३ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने संक्रमितांची संख्या ५७,१६५ झाली. जिल्ह्यात सोमवारी ५,५४२ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यामध्ये १०.७० अशी पॉझिटिव्हिटी नोंद झाली आहे. चार दिवसांत चाचण्यांची संख्या बऱ्यापैकी वाढल्यानंतर रुग्णसंख्या वाढत असली तरी यामध्ये पॉझिटिव्हिटी कमी होत असल्याने दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात फेब्रुवारीनंतर पुन्हा एप्रिल महिन्यात संसर्ग वाढायला सुरुवात झाली असली तरी आता परिस्थिती नियंत्रणात असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले. जिल्हा सीमेलगतच्या जिल्ह्यांमध्ये कोरोना सध्या ब्लास्ट होत असल्याने तेथील रुग्णालयांमध्ये बेडची संख्या अपुरी पडत असल्याने कित्येक रुग्ण अमरावती जिल्ह्यात दाखल होत आहेत. त्यामुळे येथील खासगी रुग्णालयात बेडचा तुटवडा पडत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात अशीच स्थिती कायम राहिल्यास जम्बो रुग्णालय सुरू करण्याची वेळ येईल.  अशी स्थिती उद्भवणार असल्याचे एका डॉक्टरांनी सांगितले.

जिल्ह्यात २४ तासांतील बाधितांचे मृत्यूजिल्हा शल्यचिकित्सकांच्या माहितीनुसार, येथील ७२ वर्षीय पुरुष (शारदानगर), ४५ वर्षीय पुरुष (भीमनगर), ४२ वर्षीय पुरुष (मसानगंज) तसेच ३० वर्षीय पुरुष (वरुड), ६२ वर्षीय महिला (वलगाव),  ५० वर्षीय पुरुष (धामणगाव काटपूर), ९० वर्षीय पुरुष (आरेगाव), ७८ वर्षीय पुरुष (कारंजा घाडगे), ७५ वर्षीय महिला (काटोल), ३४ वर्षीय पुरुष (कविठा कडू), ५० वर्षीय पुरुष (भारवाडी), ६६ वर्षीय पुरुष (तिवसा), ५५ वर्षीय पुरुष (सावरगाव) बुलडाणा, ६५ वर्षीय महिला (वरुड), ६५ वर्षीय पुरूष (खैरगाव) नरखेड व ५५ वर्षीय पुरूष (शिरजगाव कोरडे) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

नागपूर, यवतमाळ, वर्धा येथील रुग्णांचा मृत्यूअन्य जिल्ह्यांतील रुग्ण उपचारार्थ येथे दाखल झाले होते. यामध्ये सोमवारी उपचारादरम्यान ३४ वर्षीय  महिला (आर्वी), ३० वर्षीय महिला (सावनेर), ३८ वर्षीय पुरुष (नागपूर), ५४ वर्षीय पुरुष (जरीपटका, नागपूर), ६२ वर्षीय  महिला (विद्यानगर, यवतमाळ), ५१ वर्षीय पुरुष (गणपतीनगर, नागपूर), ४० वर्षीय महिला (अशोक पार्क, यवतमाळ), ३८ वर्षीय पुरुष (नागपूर), ४५ वर्षीय महिला (नागपूर), ६० वर्षीय पुरुष (चांदेवाडी, वर्धा) या रुग्णांचा मृत्यू झाला.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या