शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
नक्षलवाद्यांनी पेरलेल्या IED चा भीषण स्फोट; ASP आकाश राव शहीद, अनेक जवान जखमी
3
"सोनम धाब्यावर आली, घाबरलेली, रडत म्हणाली..."; साहिलने सांगितलं रात्री १ वाजता काय घडलं?
4
हनिमूनसाठी कौशलेंद्र-अंकिता सिक्कीमला गेले अन् नको ते घडलं; दोन आठवड्यांपासून थांगपत्ता नाही
5
Sonam Raghuvanshi : "सोनमला फाशी झालीच पाहिजे"; राजाच्या हत्येनंतर आईचा आक्रोश, घरात कशी वागायची सून?
6
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
7
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
8
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
9
"आम्ही कधीच चांगले मित्र नव्हतो, पण...", सोनाली बेंद्रेचा सलमान खानविषयी खुलासा, म्हणाली...
10
Vat Purnima 2025: आयुष्यात एकदा तरी 'या' पाच पुरातन वटवृक्षाला आवर्जून फेऱ्या मारा; मिळेल सिद्धी-संपत्ती!
11
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
12
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
13
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
14
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
15
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
16
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
17
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
18
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
19
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
20
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!

कोरोनामुळे आश्रमशाळांचे ऑनलाईन शिक्षण बारगळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:21 IST

अमरावती : आदिवासी विकास विभागाच्या बहुतांश निवासी आश्रमशाळा कोरोना संसर्गामुळे बंद आहेत. शासनाने शाळा, आश्रमशाळा सुरू करण्याचे आदेश जारी ...

अमरावती : आदिवासी विकास विभागाच्या बहुतांश निवासी आश्रमशाळा कोरोना संसर्गामुळे बंद आहेत. शासनाने शाळा, आश्रमशाळा सुरू करण्याचे आदेश जारी केले असले तरी मुलांना शाळेत पाठविण्याबाबत पालकांची नकारघंटा आहे. किंबहुना ग्रामीण, डोंगराळ भागात ऑनलाईन शिक्षणासाठी मोबाईलला नेट कनेक्टिव्हिटी मिळत नाही. त्यामुळे आदिवासी आश्रमशाळांच्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण बारगळल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात एकाही आश्रमशाळेत विद्यार्थी पोहोचले नसल्याची माहिती आहे.

शालेय शिक्षण विभागाने इयत्ता दहावी, बारावीच्या उन्हाळी परीक्षा ऑफलाईन घेण्याचा निर्णय जारी केला आहे. त्यामुळे या परीक्षा केंद्रावर होतील, हे निश्चित झाले आहे. मात्र, गतवर्षी मार्चपासून प्रारंभ झालेला कोविड-१९ आजतागायत कायम आहे. हल्ली शाळा, महाविद्यालये बंद आहेत. विशेषत: दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. २३ नोव्हेंबर २०२० पासून नववी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. यात शहरी भागातील विद्यार्थ्यांनी ऑनलाईन, ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीच्या शिक्षणाला प्राधान्य दिले. मात्र, ग्रामीण, डोंगराळ भागातील आश्रमशाळा सुरू झाल्या. मात्र, आदिवासी विद्यार्थी शाळांमध्ये पोहोचले नाही, असे सर्वदूर चित्र आहे. त्यामुळे दहावी, बारावीतील आश्रमशाळांचे आदिवासी विद्यार्थ्यांचे

अभ्यासक्रम पूर्ण झाले अथवा नाही, याचा लेखाजोखा शिक्षकांकडेही नाही. दहावी, बारावीच्या परीक्षा एप्रिलमध्ये प्रस्तावित आहे. अभ्यासक्रम पूर्ण झालाच नाही, तर आश्रमशाळांचे आदिवासी विद्यार्थी परीक्षा कशी देणार, हा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. अमरावती अपर आयुक्त कार्यालय अंतर्गत सात प्रकल्पांत अनुदानित आश्रमशाळा १२१, तर विद्यार्थिसंख्या ४६ हजार ८०७ आहे. शासकीत आश्रमशाळा ८२ असून, विद्यार्थिसंख्या २७ हजार १९५ आहे.

------------------------------------

अपर आयुक्त अंतर्गत शासकीय आश्रमशाळांची स्थिती

प्रकल्पाचे नाव संख्या विद्यार्थी

धारणी २० ९४५७

पांढरकवडा १८ ३१११

किनवट १६ ५७०८

अकोला ८ २६६३

औरंगाबाद ८ २३१३

पुसद ७ २११५

कळमनुरी ५ १८२८

-----------------------

‘ट्रायबल’मध्ये अगोदर अनलॉक शिक्षण सुरू झाले. त्यानंतर पुन्हा शाळा सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला. आता लॉकडाऊन घोषित आहे. कोविड-१९ मुळे अध्ययन-अध्यापनात अनियमितता आली असून, दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसण्याची दाट शक्यता आहे.

- विजय पांडे, प्रभारी सहायक आयुक्त, (प्रशासन) अपर आयुक्त, अमरावती