शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

कोरोनाने राज्यातील भ्रष्टाचारही आणला नियंत्रणात; दोन महिन्यांत फक्त १३ ट्रॅप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 18:24 IST

कोरोना कालावधीत राज्यातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये कमालीची घट झाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी)कडे प्राप्त तक्रारींनुसार दोन महिन्यांत टाकलेल्या १३ सापळ्यांमध्ये १६ जण जाळ्यात अडकल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

ठळक मुद्देलॉकडाऊनचा परिणाम शासकीय कार्यालयांतील भ्रष्टाचारही थांबला

संदीप मानकरलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोना कालावधीत राज्यातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये कमालीची घट झाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी)कडे प्राप्त तक्रारींनुसार दोन महिन्यांत टाकलेल्या १३ सापळ्यांमध्ये १६ जण जाळ्यात अडकल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यापैकी एप्रिल महिन्यात सात आणि मे महिन्यात १३ तारखेपर्यंत सहा ट्रॅप यशस्वी झाले आहेत.लॉकडाऊनमध्ये सर्व शासकीय कार्यालयांमध्ये फक्त पाच ते १० टक्केच कर्मचारी कर्तव्यावर येत आहेत. नागरिकांचा फारसा संपर्क अधिकाऱ्यांशी या दिवसांत आलेला नाही. नागरिक घरातच असल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून कामे करून देण्यासाठी पैशांची मागणी आणि परिणामी शासकीय कार्यालयांतील भ्रष्टाचारही थांबला आहे.गतवर्षी २०१९ मध्ये एप्रिल महिन्यांत ५८ ट्रॅपमध्ये शासकीय कार्यालयांशी संबंधित ७७ जण अडकले होते. मे महिन्यात ३५ सापळ्यांमध्ये ४५ जण अडकले होेते. लॉकडाऊनपूर्वी मार्च २०२० मध्ये ५८ ट्रॅपमध्ये ८६ जण अडकल्याची माहिती एसीबीच्या अहवालात नमूद आहे. मात्र, कोरोनाने गत दोन महिन्यांत अधिकारी-कर्मचाऱ्यांना लाचखोरीची संधीच दिली नाही. वर्षभर कारवाईत व्यस्त राहणाऱ्या राज्यातील लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांवरील ताणही यानिमित्त कमी झाला आहे.पाच महिन्यांत २११ सापळेराज्यातील विविध जिल्ह्यांतील विविध विभागांत एसीबीने केलेल्या कारवाईत पाच महिन्यांत २११ सापळे यशस्वी झाले असून, २९४ आरोपी निष्पन्न झाले. गत वर्षी पाच महिन्यांत ३२९ सापळ्यांमध्ये ४३५ जण अडकले होते. यंदा जानेवारी महिन्यांत ६८, फेब्रुवारीमध्ये ७२, मार्चमध्ये ५८, एप्रिलमध्ये सात आणि मे महिन्यांत सहा सापळे एसीबीने टाकले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस