शहरं
Join us  
Trending Stories
1
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
2
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
3
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
4
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
5
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
6
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
7
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
8
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
9
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
10
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
11
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
12
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
13
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
14
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
15
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
16
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
17
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
18
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
19
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
20
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!

कोरोनाने राज्यातील भ्रष्टाचारही आणला नियंत्रणात; दोन महिन्यांत फक्त १३ ट्रॅप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 18:24 IST

कोरोना कालावधीत राज्यातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये कमालीची घट झाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी)कडे प्राप्त तक्रारींनुसार दोन महिन्यांत टाकलेल्या १३ सापळ्यांमध्ये १६ जण जाळ्यात अडकल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

ठळक मुद्देलॉकडाऊनचा परिणाम शासकीय कार्यालयांतील भ्रष्टाचारही थांबला

संदीप मानकरलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोना कालावधीत राज्यातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये कमालीची घट झाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी)कडे प्राप्त तक्रारींनुसार दोन महिन्यांत टाकलेल्या १३ सापळ्यांमध्ये १६ जण जाळ्यात अडकल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यापैकी एप्रिल महिन्यात सात आणि मे महिन्यात १३ तारखेपर्यंत सहा ट्रॅप यशस्वी झाले आहेत.लॉकडाऊनमध्ये सर्व शासकीय कार्यालयांमध्ये फक्त पाच ते १० टक्केच कर्मचारी कर्तव्यावर येत आहेत. नागरिकांचा फारसा संपर्क अधिकाऱ्यांशी या दिवसांत आलेला नाही. नागरिक घरातच असल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून कामे करून देण्यासाठी पैशांची मागणी आणि परिणामी शासकीय कार्यालयांतील भ्रष्टाचारही थांबला आहे.गतवर्षी २०१९ मध्ये एप्रिल महिन्यांत ५८ ट्रॅपमध्ये शासकीय कार्यालयांशी संबंधित ७७ जण अडकले होते. मे महिन्यात ३५ सापळ्यांमध्ये ४५ जण अडकले होेते. लॉकडाऊनपूर्वी मार्च २०२० मध्ये ५८ ट्रॅपमध्ये ८६ जण अडकल्याची माहिती एसीबीच्या अहवालात नमूद आहे. मात्र, कोरोनाने गत दोन महिन्यांत अधिकारी-कर्मचाऱ्यांना लाचखोरीची संधीच दिली नाही. वर्षभर कारवाईत व्यस्त राहणाऱ्या राज्यातील लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांवरील ताणही यानिमित्त कमी झाला आहे.पाच महिन्यांत २११ सापळेराज्यातील विविध जिल्ह्यांतील विविध विभागांत एसीबीने केलेल्या कारवाईत पाच महिन्यांत २११ सापळे यशस्वी झाले असून, २९४ आरोपी निष्पन्न झाले. गत वर्षी पाच महिन्यांत ३२९ सापळ्यांमध्ये ४३५ जण अडकले होते. यंदा जानेवारी महिन्यांत ६८, फेब्रुवारीमध्ये ७२, मार्चमध्ये ५८, एप्रिलमध्ये सात आणि मे महिन्यांत सहा सापळे एसीबीने टाकले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस