शहरं
Join us  
Trending Stories
1
Aaditya Thackeray : "साधुग्राम, तपोवन हवा पण भाजपाच्या बिल्डर मित्रांची दादागिरी नाही", आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
2
महामानवाला अभिवादन! CM फडणवीसांनी केली सरणत्तयं प्रार्थना; PM मोदींनीही वाहिली आदरांजली
3
IND VS SA 3rd ODI : कुलदीप यादवसह प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! दक्षिण आफ्रिकेचा संघ २७० धावांत आटोपला
4
"आमच्या बॅगा कुठायत? घराची चावी त्यात आहे, भिकारी वाटलो का..."; मुंबई एअरपोर्टवर तुफान राडा
5
'रुपयाबद्दल जास्त काळजी करण्याची गरज नाही..,' घसरत्या चलनावर निर्मला सीतारमण काय म्हणाल्या?
6
हुमायूं कबीर यांनी मुर्शिदाबादमध्ये केली बाबरी मशिदीची पायाभरणी, भाजपा-तृणमूलचे एकमेकांवर आरोप प्रत्यारोप  
7
२०२६ला ६ महिन्यातच सगळी संकटे समस्या दूर होतील; संकष्ट चतुर्थीपासून ‘ही’ उपासना सुरू करा!
8
IND vs SA : जड्डूच्या गोलंदाजीवर फसला बावुमा! कॅच घेतल्यावर कोहलीनं अशी घेतली मजा (VIDEO)
9
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; कॅन्सरसह 'या' आजारांचा धोका, आताच बदला सवय
10
अमेरिका सोडून भारतात परत का आली माधुरी दीक्षित? म्हणाली, "बऱ्याच गोष्टी घडल्या..."
11
'कल्कि'च्या सीक्वेलमध्ये दीपिका पादुकोणच्या जागी प्रियंका चोप्रा?, 'देसी गर्ल'नेही ठेवली 'ही' अट
12
२०२५ ची शेवटची संकष्ट चतुर्थी: ५ उपाय अवश्य करा, चिंतामुक्त व्हा; बाप्पाची अपार कृपा लाभेल!
13
Video - गेमर नवरा! विधी राहिल्या बाजुला 'तो' फोनमध्ये मग्न: लग्नमंडपात खेळत होता फ्री फायर
14
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: विशेष व्रत करा; वर्षभर पुण्य-लाभ, विनायक कल्याण-मंगल करेल!
15
Travel : लग्नानंतर मालदीवला फिरायला जायचा प्लॅन करताय? राहणं, खाणं आणि फिरण्यासाठी किती खर्च येईल?
16
इंडिगोच्या गोंधळामध्ये वाढत्या विमान भाड्यांवर सरकारची कडक कारवाई, घेतला 'हा' मोठा निर्णय
17
मार्गशीर्ष संकष्ट चतुर्थी २०२५: उपास सोडताना ‘या’ चुका होत नाही ना? अन्यथा उपासना वाया; पाहा
18
Zepto IPO ला मिळाला हिरवा झेंडा; शेअरहोल्डर्सच्या मंजुरीनंतर कंपनी तयार, केव्हा होणार लिस्टिंग?
19
रात्रभर गोळीबार! पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर तणाव, युद्धबंदी तुटली; नेमकी चूक कोणाची?
20
  द ग्रेट खलीच्या जमिनीवर बेकायदेशीर कब्जा, तहसीलदारांनी हेराफेरी केल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाने राज्यातील भ्रष्टाचारही आणला नियंत्रणात; दोन महिन्यांत फक्त १३ ट्रॅप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 18:24 IST

कोरोना कालावधीत राज्यातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये कमालीची घट झाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी)कडे प्राप्त तक्रारींनुसार दोन महिन्यांत टाकलेल्या १३ सापळ्यांमध्ये १६ जण जाळ्यात अडकल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

ठळक मुद्देलॉकडाऊनचा परिणाम शासकीय कार्यालयांतील भ्रष्टाचारही थांबला

संदीप मानकरलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : कोरोना कालावधीत राज्यातील भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमध्ये कमालीची घट झाली आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (एसीबी)कडे प्राप्त तक्रारींनुसार दोन महिन्यांत टाकलेल्या १३ सापळ्यांमध्ये १६ जण जाळ्यात अडकल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यापैकी एप्रिल महिन्यात सात आणि मे महिन्यात १३ तारखेपर्यंत सहा ट्रॅप यशस्वी झाले आहेत.लॉकडाऊनमध्ये सर्व शासकीय कार्यालयांमध्ये फक्त पाच ते १० टक्केच कर्मचारी कर्तव्यावर येत आहेत. नागरिकांचा फारसा संपर्क अधिकाऱ्यांशी या दिवसांत आलेला नाही. नागरिक घरातच असल्याने अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून कामे करून देण्यासाठी पैशांची मागणी आणि परिणामी शासकीय कार्यालयांतील भ्रष्टाचारही थांबला आहे.गतवर्षी २०१९ मध्ये एप्रिल महिन्यांत ५८ ट्रॅपमध्ये शासकीय कार्यालयांशी संबंधित ७७ जण अडकले होते. मे महिन्यात ३५ सापळ्यांमध्ये ४५ जण अडकले होेते. लॉकडाऊनपूर्वी मार्च २०२० मध्ये ५८ ट्रॅपमध्ये ८६ जण अडकल्याची माहिती एसीबीच्या अहवालात नमूद आहे. मात्र, कोरोनाने गत दोन महिन्यांत अधिकारी-कर्मचाऱ्यांना लाचखोरीची संधीच दिली नाही. वर्षभर कारवाईत व्यस्त राहणाऱ्या राज्यातील लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांवरील ताणही यानिमित्त कमी झाला आहे.पाच महिन्यांत २११ सापळेराज्यातील विविध जिल्ह्यांतील विविध विभागांत एसीबीने केलेल्या कारवाईत पाच महिन्यांत २११ सापळे यशस्वी झाले असून, २९४ आरोपी निष्पन्न झाले. गत वर्षी पाच महिन्यांत ३२९ सापळ्यांमध्ये ४३५ जण अडकले होते. यंदा जानेवारी महिन्यांत ६८, फेब्रुवारीमध्ये ७२, मार्चमध्ये ५८, एप्रिलमध्ये सात आणि मे महिन्यांत सहा सापळे एसीबीने टाकले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस