शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
3
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
4
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
5
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
6
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
7
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
8
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
9
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
10
शाम्पू, लोशन आणि बॉडी सोपमध्ये असतात कॅन्सर होणारे केमिकल्स; धडकी भरवणारा रिसर्च
11
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
12
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
13
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
14
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
15
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
16
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
17
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
18
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
19
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
20
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...

कोरोनाच्या भीतीने उष्माघातही पळाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:14 IST

अमरावती : कोरोना संर्सगामुळे दोन वर्षांत उन्हाळ्याच्या काळात सतत संचारबंदी असल्यामुळे नागरिक घराबाहेर पडले नाहीत. विविध आजारांचे रुग्णदेखील घरीच ...

अमरावती : कोरोना संर्सगामुळे दोन वर्षांत उन्हाळ्याच्या काळात सतत संचारबंदी असल्यामुळे नागरिक घराबाहेर पडले नाहीत. विविध आजारांचे रुग्णदेखील घरीच असल्यामुळे या दोन्ही वर्षांत उष्माघातामुळे एकाही नागरिकांचा बळी गेला नसल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.

दरवर्षी मार्च महिन्यापासून दिवसाच्या तापमानात वाढ व्हायला सुरुवात होते व आरोग्य विभागाद्वारा उन्हापासून स्वत:ला कसे जपावे, याच्या टिप्स दिल्या जातात. गावापर्यंत जनजागृती केली जाते. उन्हाळ्याची दाहकता साधारणपणे एप्रिल ते मे महिन्यात अधिक असते व जिल्हा सामान्य रुग्णालयात दरवर्षी उष्माघात कक्ष तयार केला जातो. ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय आदी रुग्णालयांत उष्माघाताचा रुग्ण आल्यास कसे उपाय करावे, याविषयीचे मार्गदर्शन केले जातात. मात्र, यंदा तापमान ४० अंशांवर गेल्यानंतरही उष्माघात कक्ष तयार करण्यात आलेला नाही. २२ फेब्रुवारीपासून जिल्ह्यात संचारबंदी असल्याने सकाळी ११ वाजतापासून रस्ते शुकशुकाट दिसून येतात. नागरिक देखील विनाकारण घराबाहेर पडत नाही. त्यामुळे दोन वर्षांपासून जिल्ह्यात उष्माघाताचा बळी गेलेला नाही.

बॉक्स

ऊन वाढले तरी...

जिल्ह्यात एप्रिल महिन्यात ४० ते ४२ अंशापर्यंत व मे महिन्यात यापूर्वी ४६ अंशांपर्यंत तापमान गेलेले आहे. मात्र, यंदा हवामान बदलामुळे उन्हाची दाहकता वाढलीच नाही. ४२ अंशांवर तापमान गेलेच नाही. त्यामुळे उष्माघाताच्या घटना झालेल्या नाहीत. ऊन लागल्यास अनेकजन घरगुती उपायांवरही भर देत असल्याचे दिसून आले.

बॉक्स

उन्हाळा घरातच !

जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट फेब्रुवारीपासून सुरू झाली, ती अद्यापही सुरूच आहे. त्यामुळे जिल्ह्यात २२ फेब्रुवारीनंतर संचारबंदी लागू करण्यात आली, ती कमी-अधिक प्रमाणात आताही सुरूच आहे. सकाळी ७ ते ११ पर्यंतच घराबाहेर पडण्याची मुभा असल्याने नागरिक ११ च्या आत घरात आहेत.

कोट

संचारबंदी व कोरोना संसर्गात्या भीतीने नागरिक शक्यतोवर दुपारी घराबाहेर पडतच नाही. त्यामुळे दोन वर्षांपासून उष्माघाताचे रुग्ण दिसून आलेले नाही.

- डॉ श्यामसुंदर निकम,

जिल्हा शल्यचिकित्सक

पाईंटर

तीन वर्षांतील उष्माघाताचे बळी

२०१९ : ०५

२०२० : ००

२०२१ : ००