शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

कोरोनाने लग्नासाठीच्या अपेक्षाही बदलल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:26 IST

अमरावती : कोरोनाकाळापूर्वी लग्न ही बडेजाव मिरवण्याची बाब होती. मात्र, कोरोना आला नि मोठ्या प्रमाणात होणाऱ्या लग्नसोहळ्यांनाही बंदिस्त करून ...

अमरावती : कोरोनाकाळापूर्वी लग्न ही बडेजाव मिरवण्याची बाब होती. मात्र, कोरोना आला नि मोठ्या प्रमाणात होणाऱ्या लग्नसोहळ्यांनाही बंदिस्त करून टाकले. काय राजा नि काय रंक, सर्वांना मॅरेज हॉलचे बूकिंग मोडून वधुमंडपी लग्न लावून एकाच वाहनापुरतेच वऱ्हाडी घेऊन परतावे लागले. ना बँड, ना जेवणावळी, ना नाच-गाणे, ना वऱ्हाडींची धूमधाम. अशा स्थितीत वर-वधुमंडपी लग्नासाठीच्या अपेक्षाही बदलल्या आहेत. सुरुवातीच्या काळात जेव्हा कोरोनाबाबत जनजागरण झाले नव्हते, तोपर्यंत लग्नमंडप म्हणून महागड्या मॅरेज हॉलचा विचार केला जायचा. मात्र, जसजसे कोरोनाने विकराल रूप धारण केले, तसतसे वधुमंडपी लग्न व इतर गोष्टींना फाटा या बाबी जनमानसाने स्वीकारल्या. वऱ्हाडींची संख्या बोटावर मोजण्याएवढी, फार तर ५० च्या थोडे पुढे अशी नियंत्रित झाली. या काळात शेतीला फार महत्त्व आले आहे. कारण पुण्या-मुंबईच्या ठिकाणी नोकरीला असलेले बहुतांश तरुण हे गावी परतले. अशावेळी ज्यांच्याकडे शेती होती, त्यांनी हा व्यवसाय अंगीकारला व समाधानाने कोरोनाच्या तीव्रतेशी सामना केला. त्यामुळे वधुमंडळीकडून किती मिळवतो, यापेक्षा शेती आहे की नाही, हा विषय प्राधान्याचा झाला आहे. मुलींबाबतही तीच गोष्ट. आधी कुटुंबवत्सल हा गुण आवर्जून पाहिला जात असे. तथापि, वाढत्या महागाईशी ‘ॲडजस्ट’ होण्यासाठी संसार नेटका चालविण्यासोबतच एखादा हुनर आहे का, हेही पाहिले जात आहे. स्त्रीमुक्तीकडे वाटचाल करणाऱ्या महिला वर्गाच्या दृष्टीने ही बाब स्वागतार्ह आहे. कमावत्या मुलीकडे रूप नसले तरी संसार सुखाचा होईल, याची हमी मध्यस्थ मंडळींकडून वरपक्षाला देण्यात येते. -----------------

मुलांपेक्षा वधुपक्षाच्या अपेक्षा बदलल्या आहेत. पूर्वी खासगी असो वा शासकीय नोकरी, पगाराच्या आकड्यावर लक्ष ठेवून वधुपक्षाकडून होकार मिळत असे. मात्र, कोरोनाकाळापासून मुलाकडे शेती आहे की नाही, हे आवर्जून विचारले जाते.

- अशोक उल्हे, वधू-वर सूचक मंडळ

------------------

मुलींच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील मुलांचे लग्न जुळवणे कठीण झाले आहे. ग्रामीण भागातील मुली शहरात जाण्यास उत्सुक आहेत. तथापि, शहरातील मुली ग्रामीण भागात नांदावयास इच्छुक नसतात, हे बहुतांश पाहायला मिळत आहे.

- रामेश्वर मुंदे, वधू-वर सूचक मंडळ

---------------

या अपेक्षा वाढल्या

मुलगी आपल्या नजरेआड राहील एवढ्या लांब जायला नको.

मुलाकडे नोकरी हवी. याशिवाय पुरेशी शेतीदेखील हवी.

सासू-सासरे वा इतर नातेवाइकांची जास्त लुडबूड नको.

मुलगा वा मुलगी ही पुरेशी शिकलेली असावी व हनहुन्नरी असावी.

मुलगा वा मुलगी ही कमावती असावी.

---------------

या अपेक्षा झाल्या कमी

मुलगी ही खटल्यातील अर्थात कुटुंबवत्सल असावी.

मुलाला अजिबात व्यसन नको.

मुलाकडे मोठे कुटुंब. अर्थात कुटुंबाचे मोठे पाठबळ असावे.

कमावती असल्यास मुलीचे देखणेपण ही बाब गौण ठरली आहे.

--------------------