शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
2
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
3
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
4
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
5
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
6
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
7
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
8
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
9
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
10
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
11
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
12
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
13
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
14
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
15
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
16
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
17
टीम इंडियाचा ICC क्रमवारीत धुमधडाका! एक-दोन नव्हे, तब्बल ५ स्टार क्रिकेटर रँकिंगमध्ये अव्वल
18
अतिशय गुप्तपणे भारताने बंगालच्या खाडीत केला मोठा धमाका; कित्येक किमी पसरला आवाज, चीनला धडकी
19
"भगवा झेंडा पाहून TMC चा लाठीचार्ज, गुंडांना पोलिसांच्या मागे लपवणं..."; ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
20
Viral Video: भगवान विष्णूची कंबोडियातील मूर्ती लष्कराने पाडली, व्हायरल होत असलेला व्हिडीओचे सत्य काय?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाने लग्नासाठीच्या अपेक्षाही बदलल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:26 IST

अमरावती : कोरोनाकाळापूर्वी लग्न ही बडेजाव मिरवण्याची बाब होती. मात्र, कोरोना आला नि मोठ्या प्रमाणात होणाऱ्या लग्नसोहळ्यांनाही बंदिस्त करून ...

अमरावती : कोरोनाकाळापूर्वी लग्न ही बडेजाव मिरवण्याची बाब होती. मात्र, कोरोना आला नि मोठ्या प्रमाणात होणाऱ्या लग्नसोहळ्यांनाही बंदिस्त करून टाकले. काय राजा नि काय रंक, सर्वांना मॅरेज हॉलचे बूकिंग मोडून वधुमंडपी लग्न लावून एकाच वाहनापुरतेच वऱ्हाडी घेऊन परतावे लागले. ना बँड, ना जेवणावळी, ना नाच-गाणे, ना वऱ्हाडींची धूमधाम. अशा स्थितीत वर-वधुमंडपी लग्नासाठीच्या अपेक्षाही बदलल्या आहेत. सुरुवातीच्या काळात जेव्हा कोरोनाबाबत जनजागरण झाले नव्हते, तोपर्यंत लग्नमंडप म्हणून महागड्या मॅरेज हॉलचा विचार केला जायचा. मात्र, जसजसे कोरोनाने विकराल रूप धारण केले, तसतसे वधुमंडपी लग्न व इतर गोष्टींना फाटा या बाबी जनमानसाने स्वीकारल्या. वऱ्हाडींची संख्या बोटावर मोजण्याएवढी, फार तर ५० च्या थोडे पुढे अशी नियंत्रित झाली. या काळात शेतीला फार महत्त्व आले आहे. कारण पुण्या-मुंबईच्या ठिकाणी नोकरीला असलेले बहुतांश तरुण हे गावी परतले. अशावेळी ज्यांच्याकडे शेती होती, त्यांनी हा व्यवसाय अंगीकारला व समाधानाने कोरोनाच्या तीव्रतेशी सामना केला. त्यामुळे वधुमंडळीकडून किती मिळवतो, यापेक्षा शेती आहे की नाही, हा विषय प्राधान्याचा झाला आहे. मुलींबाबतही तीच गोष्ट. आधी कुटुंबवत्सल हा गुण आवर्जून पाहिला जात असे. तथापि, वाढत्या महागाईशी ‘ॲडजस्ट’ होण्यासाठी संसार नेटका चालविण्यासोबतच एखादा हुनर आहे का, हेही पाहिले जात आहे. स्त्रीमुक्तीकडे वाटचाल करणाऱ्या महिला वर्गाच्या दृष्टीने ही बाब स्वागतार्ह आहे. कमावत्या मुलीकडे रूप नसले तरी संसार सुखाचा होईल, याची हमी मध्यस्थ मंडळींकडून वरपक्षाला देण्यात येते. -----------------

मुलांपेक्षा वधुपक्षाच्या अपेक्षा बदलल्या आहेत. पूर्वी खासगी असो वा शासकीय नोकरी, पगाराच्या आकड्यावर लक्ष ठेवून वधुपक्षाकडून होकार मिळत असे. मात्र, कोरोनाकाळापासून मुलाकडे शेती आहे की नाही, हे आवर्जून विचारले जाते.

- अशोक उल्हे, वधू-वर सूचक मंडळ

------------------

मुलींच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील मुलांचे लग्न जुळवणे कठीण झाले आहे. ग्रामीण भागातील मुली शहरात जाण्यास उत्सुक आहेत. तथापि, शहरातील मुली ग्रामीण भागात नांदावयास इच्छुक नसतात, हे बहुतांश पाहायला मिळत आहे.

- रामेश्वर मुंदे, वधू-वर सूचक मंडळ

---------------

या अपेक्षा वाढल्या

मुलगी आपल्या नजरेआड राहील एवढ्या लांब जायला नको.

मुलाकडे नोकरी हवी. याशिवाय पुरेशी शेतीदेखील हवी.

सासू-सासरे वा इतर नातेवाइकांची जास्त लुडबूड नको.

मुलगा वा मुलगी ही पुरेशी शिकलेली असावी व हनहुन्नरी असावी.

मुलगा वा मुलगी ही कमावती असावी.

---------------

या अपेक्षा झाल्या कमी

मुलगी ही खटल्यातील अर्थात कुटुंबवत्सल असावी.

मुलाला अजिबात व्यसन नको.

मुलाकडे मोठे कुटुंब. अर्थात कुटुंबाचे मोठे पाठबळ असावे.

कमावती असल्यास मुलीचे देखणेपण ही बाब गौण ठरली आहे.

--------------------