शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Railway Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, पाच जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
सोनम, सुपारी अन् सरेंडर, समोर आला लव्ह ट्रँगल...! कोण आहे राज कुशवाह? याच्यामुळेच तर झाला नसेल राजाचा 'मर्डर'?
3
दारावर लटकून प्रवास, समोरच्या ट्रेनमधील प्रवाशांना धडक अन्...; मुंब्रामधील रेल्वे दुर्घटनेचे कारण समोर
4
"मी सिनेइंडस्ट्रीतला नाही...", मुंबई सोडून गावाला का स्थायिक झाले नाना पाटेकर?, बिग बींना सांगितलेलं कारण
5
'आम्ही कोणत्याही पक्षाशी...' ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले!
6
Mumbai Local: नव्या लोकलचे दरवाजे आपोआप बंद होणार, मुंबई रेल्वे अपघातानंतर प्रशासनाला जाग!
7
Raja Raghuvanshi : सोनम बेवफा! ११ मे ला लग्न, २० ला हनिमून, २३ ला हत्या; १७ दिवसांनी कोणाला केला पहिला फोन?
8
Vat Purnima 2025: सावित्रीने सत्यवानाचे प्राण वाचवले, तेव्हा यमाशी कसा झाला होता अखेरचा संवाद? वाचा!
9
अहिल्यानगर : एमपीएल क्रिकेट सामना बघून परताना गाडीचा भीषण अपघात; जळगावमधील दोन ठार, ११ जखमी
10
मुलाचा जन्म, पण उपचारादरम्यान मातेचा मृत्यू; छत्रपती संभाजीनगरात पुण्याच्या घटनेची पुनरावृत्ती
11
"मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला", २५ वर्ष लहान अभिनेत्रीने मिथुन चक्रवर्तींवर केलेला आरोप
12
पोलिस मेघालय-मध्य प्रदेशात शोधत राहिले; 'बेवफा' सोनम प्रियकरासोबत युपीत सापडली...
13
Vat Purnima 2025: वडाची पूजा झाल्यावर 'हा' श्लोक म्हणायला विसरू नका, तरच पूर्ण होईल व्रत!
14
Vat Purnima 2025: केवळ सौभाग्यासाठी नाही, तर दीर्घायुष्यासाठी करा वटवृक्षाची पुजा!
15
भारतात पहिल्यांदाच MCX नं केलं असं काम की विक्रमी उच्चांकी स्तरावर पोहोचले शेअर्स, जाणून घ्या
16
"आमची मुलगी असं का करेल? असं करायचं असतं, तर ती..."; सोनमच्या वडिलांची पहिली प्रतिक्रिया काय?
17
"गेल्या १० वर्षांपासून मी मानसोपचार...", अमृता सुभाषने केला खुलासा; कारणही सांगितलं
18
अनिल अंबानींची कंपनी करणार ₹५००० कोटींची गुंतवणूक; संरक्षण क्षेत्रात इतिहास रचण्यास तयार
19
७ वर्षांत एफडीआयमध्ये महाराष्ट्र टॉप, परदेशातील सर्वाधिक गुंतवणूक राज्यात; पायाभूत सुविधांतील सुधारणा ठरतेय मोठ्या फायद्याची

कोरोनाचे १२ मृत्यू, ६३६ संक्रमित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:21 IST

अमरावती : जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असतानाच रुग्णांच्या मृत्यूचे सत्र सुरूच आहे. मंगळवारी १२ जणांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत ५३३ ...

अमरावती : जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असतानाच रुग्णांच्या मृत्यूचे सत्र सुरूच आहे. मंगळवारी १२ जणांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत ५३३ रुग्ण कोरोनाचे बळी ठरले आहेत. २,२७६ चाचण्यांमधून ६३६ अहवाल पॉझिटिव्ह आल्याने कोरोनाग्रस्तांची संख्या ३६,४५२ झाली आहे. पॉझिटिव्हिटीचे प्रमाण २७.९४ टक्के राहिले.

कोरोना संक्रमितांची संख्या दररोज ६०० ते ९०० च्या सुमारास निघत असल्याने त्याच्या तुलनेत मृतांची टक्केवारी कमी असली तरी दररोज १० ते १२ मृत्यूने जिल्ह्याची चिंता वाढली आहे. तरीदेखील नागरिकांमध्ये कोरोनाप्रति गांभीर्य दिसत नाही, ही शोकांतिका आहे. महिनाभरात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दोन पथकांद्वारे जिल्ह्यातील कोविड स्थितीचा आढावा घेतला. जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभागाचा ‘क्लास’ या अधिकाऱ्यांनी घेतला. त्यानंतरही आकडेवारीत फारसा काही बदल झाल्याचे दिसून आले नाही.

विभागीय आयुक्त पीयूष सिंह व जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी मंगळवारी कोरोनाचा ‘हॉट स्पॉट’ ठरलेल्या दर्यापूर व कंटेनमेंट झोन असलेल्या अंजनगाव सुर्जीला भेट दिली. कोरोना प्रतिबंधासाठी सर्व नियमांचे पालन होण्यासाठी आरोग्य, पोलीस, नगरपालिका या यंत्रणांनी सजग राहून कामे करावी, असे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले. अंजनगाव सुर्जी येथील कोविड केअर सेंटर व दर्यापूर ग्रामीण रुग्णालयालाही त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी डॉक्टर, पारिचारिका यांच्यासह रुग्णांशीही संवाद साधला. बाधित क्षेत्रात तपासण्यांची संख्या वाढवा. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर द्या. गृह विलगीकरणातील व्यक्तींकडून नियम काटेकोरपणे पाळले जातील, याकडे कटाक्ष ठेवा, असे निर्देश त्यांनी दिले.

बॉक्स

मंगळवारचे कोरोना मृत्यू

०००००००००००

०००००००००००००००००००००

००००००००००००००००००००००

बॉक्स

होम आयसोलेशनच्या रुग्णाला २५ हजारांचा दंड (फोटो)

महापालिका क्षेत्रात ज्योती कॉलनीतील होम आयसोलेशनची सुविधा घेतलेले एक रुग्ण घराबाहेर दुचाकीने फिरताना आढळला. त्याच्या घराबाहेर बोर्डदेखील लावलेले नाही. त्यामुळे पथकाने २५ हजारांचा दंड करून २४ तासांच्या आत भरणा करण्याचे आदेश दिले. दंड न भरल्यास कलम १८८ अन्वये फौजदारी कारवाईची नोटीस पथकाद्वारे बजावण्यात आली. या रुग्णाची होम आयसोलेशनची सुविधा रद्द करून त्याला संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात येणार आहे.

पाॅईंटर

१ फेब्रुवारीपासून ३० दिवसांतील जिल्हा सद्यस्थिती

* कोरोनाग्रस्त :१४,४७३

* कोरोनामुक्त : ८,६३१

* मृत्यू : ११५

* चाचण्या : ५०,११७

* पॉझिटिव्हिटी : २८.५३