शहरं
Join us  
Trending Stories
1
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
2
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
3
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
4
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्राललयाने दिली महत्त्वाची सूचना
5
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
6
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."
7
T20 World Cup: बलाढ्य ऑस्ट्रेलियाने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्या खेळाडूला मात्र डच्चू
8
दिल्लीत काँग्रेसला धक्का! आधी लवली यांनी प्रदेशाध्यक्षपद सोडले, आता दोन माजी आमदारांचा राजीनामा 
9
'तुम्ही मनापासून त्यांना देव मानतच नव्हता'; दानवेंचा अजितदादांना टोला
10
Rule Change: LPG सिलिंडरच्या दरापासून ते क्रेडिट कार्ड बिल पेमेंटपर्यंत; आजपासून झाले 'हे' ५ मोठे बदल
11
"होय, छगन भुजबळांचा नावाचा प्रस्ताव होता पण तडजोडीत ही जागा शिवसेनेला गेली"
12
दिल्ली, नोएडात खळबळ! एकाचवेळी ५० शाळांना बॉम्ब ठेवल्याचे मेल; विद्यार्थ्यांना सोडले
13
ठाणे, कल्याणमध्ये शिंदेंचे उमेदवार जाहीर; नरेश म्हस्केंना उमेदवारी, नाशिक अद्याप गुलदस्त्यातच
14
'एकेकाळी मी शरद पवारांना दैवत मानायचो, आता मी वेगळा मार्ग स्वीकारला आहे', अजित पवार यांचं विधान
15
Fact Check : राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला?; जाणून घ्या 'त्या' व्हायरल Video मागचं 'सत्य'
16
Fact Check: राहुल गांधींना अमेठीतून, तर प्रियंका गांधींना रायबरेलीतून उमेदवारी दिल्याचं ते पत्र खोटं; जाणून घ्या सत्य
17
माझं सत्त्व, माझं तत्त्व आणि सर्वस्व 'महाराष्ट्रधर्म', महाराष्ट्र दिनानिमित्त राज ठाकरेंची पोस्ट!
18
'सगळं माहिती असताना मोदींनी प्रज्ज्वल रेवन्नासाठी मतं मागितली'; ओवेसींचा आरोप
19
AI च्या माध्यमातून लक्ष्मीकांत बेर्डे परत येणार? महेश कोठारे करणार हा भन्नाट प्रयोग
20
Akhilesh Yadav : "कोरोना लसीवरून वाद, लोकांना येतोय हार्ट अटॅक"; अखिलेश यादव यांचं भाजपावर टीकास्त्र

जखमी वन्यप्राण्यांसाठी लावले कुलर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2019 10:31 PM

वडाळी वनपरिक्षेत्रांतर्गंत येणाऱ्या वन्यप्राणी मदत केंद्रात पाच काळविट, तीन माकड असे आठ जखमी वन्यप्राणी आहेत.उन्हाचा पारा ४२ अंशावर गेल्याने त्यांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. त्याअनुषंगाने त्यांच्याकरिता कुलरची व्यवस्था करण्यात आली आहे.

ठळक मुद्देवन्यप्राणी मदत केंद्र : वडाळी वनपरिक्षेत्र कार्यालयाचा उपक्रम, पारा ४२ अंशांवर

अमोल कोहळे ।लोकमत न्यूज नेटवर्कपोहरा बंदी : वडाळी वनपरिक्षेत्रांतर्गंत येणाऱ्या वन्यप्राणी मदत केंद्रात पाच काळविट, तीन माकड असे आठ जखमी वन्यप्राणी आहेत.उन्हाचा पारा ४२ अंशावर गेल्याने त्यांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. त्याअनुषंगाने त्यांच्याकरिता कुलरची व्यवस्था करण्यात आली आहे.वन्यप्राणी मदत केंद्रात वाहनाच्या धडकेत जखमी झालेले, पाण्यासाठी भटकणारे, कुत्र्यापासून बचावलेले वन्यप्राणी ठेवले जातात. त्यांची वैद्यकीय तपासणी करून त्यांचा प्राण वाचविण्याचे प्रयत्न या वन्यप्राणी मदत केंद्रात केले जाते. सध्या कडाक्याचे उन तापत असल्याने मनुष्याप्रमाणेच वन्यजीवांची होरपळ होत आहे. त्यावर उपाय म्हणून वडाळीचे वनपरिक्षेत्र अधिकारी कैलास भुंबर व वर्तुळ अधिकारी राजेश घागरे यांनी जखमी वन्यप्राण्यांना थंडावा मिळावा यासाठी रेस्क्यू सेंटरमध्ये कुलरची व्यवस्था केली आहे. वडाळी वनपरिक्षेत्रात वन्यप्राणी मदत केंद्रात वडाळी वर्तुळाचे वन कर्मचारी नित्यनेमाने जखमी वन्यप्राण्यांना पाणी, गवत, भाजीपाला, दूध पाजण्याचे कार्य पार पाडतात. तालुक्यातील जखमी झालेले वन्यप्राण्यांना दररोज वेळोवेळी लागणारे खाद्य व त्यांची जोपासना या कामात किशोर डाहाके यांनी स्वत:ला झोकून दिले आहे. वन्यप्राणी मदत केंद्रात वन्य प्राण्यांकरिता ग्रीन नेट लावण्यात आली आहे. नवीन पिंजरे लावण्यात आले. या पिंजºयामध्ये उपचार पिंजरा, आमिष पिंजरा, वाहतूक पिंजरा याशिवाय पक्षी, लहानमोठे पक्षी याशिवाय तृणभक्षी वन्यप्राण्यांकरिता व्यवस्था केली आहे. मृत वन्यप्राण्यांचे पंचनामे करून येथे दफनविधी करण्यात येते. तसेच वनविभागाचे वाहन ‘वन्यप्राणी वाहिका’ कार्यरत आहे. या उपक्रमाबद्दल उपवनसंरक्षक गजेंद्र नरवणे यांनी वडाळी वर्तुळाचे वनपाल, वनरक्षक, वनमजूर यांचे कौतुक केले. सोबतच वनविभागाने जंगलातील वन्यप्राण्यांसाठी कृत्रिम पाणवठ्यांची अधिकाधिक निर्मितीची अपेक्षा आहे.या रेस्क्यू सेंटरमध्ये लावण्यात आलेल्या कुलरची व्यवस्था राखण्यासाठी स्वत’त्र यंत्रणा कार्यान्वित आहे. जखमी हरिण व अन्य वन्यप्राण्यांची तापत्या उन्हामुळे प्रकृती बिघडू नये, याकडे वनकर्मचाऱ्यांचे पुर्ण लक्ष आहे.