शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Maharashtra Nagar Palika Election Result: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
3
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
4
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
5
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
6
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
7
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
8
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
9
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
10
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
11
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
12
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
13
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
14
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
15
Maharashtra Nagar Palika Election Result: अमरावतीत १२ पैकी ४ निकाल हाती, बच्चू कडूंच्या 'प्रहार', भाजपचं काय झालं?
16
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
17
धोक्याची घंटा! डिजिटल युगाचा 'सायलेंट किलर'; १८ हजार वृद्ध विसरले घरचा पत्ता, ५०० जणांचा मृत्यू
18
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
19
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
Daily Top 2Weekly Top 5

शंकर महाराजांच्या सिद्धीबाबत पदाधिकाऱ्यांमध्येच मतभेद

By admin | Updated: September 7, 2016 00:09 IST

शंकर महाराज यांना अष्टसिध्दी प्राप्त असण्याच्या मुद्यावर आश्रम ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांमध्येच मतभेद...

गाजली पत्रपरिषद : आत्मसाक्षात्कारी असल्याचा मात्र दावाअमरावती : शंकर महाराज यांना अष्टसिध्दी प्राप्त असण्याच्या मुद्यावर आश्रम ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांमध्येच मतभेद आणि संभ्रम असल्याचे मगंळवारी आयोजित पत्रपरिषदेदरम्यान उघड झाले. शंकर महाराज आश्रम ट्रस्टच्यावतीने पत्रपरिषद आयोजित करण्यात आली होती. आश्रमात नरबळी हल्ल्याचा प्रयत्न झाल्यानंतर तब्बल महिनाभरानंतर ही पत्रपरिषद घेण्यात आली. त्यामुळे या पत्रपरिषदेबाबत पत्रकारांमध्ये उत्सुकता होती. अद्यापही अनुत्तरित असलेल्या अनंत प्रश्नांची उत्तरे पत्रकारांना हवी होती. पत्रकारांनी अनेक प्रश्न उपस्थित केल्यावर बहुतांश प्रश्नांची उत्तरे आश्रम ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी गोलमाल पध्दतीने दिलीत. चौकशी सुरू आहे, सत्य बाहेर येईलच, हे खोटे आहे, माहिती नाही, तुम्ही घडवून आणले, अशी उत्तरे आयोजकांकडून दिली जात होती. मुद्देसूद आणि बाजू मांडण्याच्या हेतूने पत्रकारांच्या प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी पत्रकारांनाच हिंदू धर्माचा अभ्यास विचारण्यात आला. अभ्यास असेल त्यानेच पुस्तकाबाबत बोलावे, अशी अट एका पत्रकाराच्या उत्तरादाखल राजेश मेंढे यांनी घातली. शंकर महाराज यांनी लिहिलेल्या ग्रंथात अष्टसिद्धी सांगितल्या आहेत. त्या त्यांनी स्वानुभवातून लिहिल्या असल्याचा उल्लेख ग्रंथ प्रस्तावनेत आहे. रहस्य जाणून घेतल्यास सामान्यांचे आयुष्य सुखमय होईल, असे खुद्द महाराजांनी म्हटले आहे - या मुद्दाचा हवाला देऊन महाराजांना ग्रंथात उल्लेखित सिद्धी प्राप्त आहेत काय? ते आत्मसाक्षात्कारी आहेत काय? या प्रश्नांची उत्तरे पत्रकारांनी मागितली. आयोजक या प्रश्नांच्या उत्तरादाखल बोलले खरे; परंतु त्यांच्यात मतभेद होते. आश्रम ट्रस्टचे सदस्य असलेले राजेश मेंढे यांच्या मते शंकर महाराजांना अष्टसिद्धी प्राप्त आहे. थेट उत्तर देण्याऐवजी अष्टसिद्धी प्राप्त झाल्याशिवाय आत्मसाक्षात्कार होत नाही.पत्रकारांशी अरेरावीअमरावती : महाराजांना आत्मसाक्षात्कार प्राप्त झालेला आहे, असे उत्तर त्यांनी दिले. आश्रम ट्रस्टचे कार्यकारी अध्यक्ष शिरीष चौधरी यांनी महाराजांना अष्टसिद्धी प्राप्त नसल्याचे उत्तर दिले. दोघांच्याही परस्परविरोधी उत्तरानंतर गुरुंच्या क्षमतांबाबत आयोजकांनी एक उत्तर देण्याची सूचना पत्रकारांनी केली. महाराजांना आत्मसाक्षात्कारी असल्याच्या मुद्यावर त्यांचे एकमत झाले, सिद्धीच्या मुद्द्यावर मात्र थेट आणि आत्मविश्वासी भाष्य करण्यास आयोजक कचरले. ‘लोकमत’ने या प्रकरणाला वाचा फोडल्यामुळे ‘लोकमत’ने अनेक प्रश्न विचारले. जसे- आर्वीतून स्वयंपाकी का आणला? त्याला आणायला आश्रमातील चार जण का गेले ? अजय आणि प्रथमेशसंबंधी पोलीस तक्रार का केली नाही? प्रथमेशच्या नातेवाईकांना धमक्या कशासाठी? आतापर्यंत पत्रपरिषद का नाही? शंकर महाराजांनी प्रथमेशची भेट का घेतली नाही? प्रथमेशसाठी किमान संदेश का दिला नाही? यापैकी एकाही प्रश्नाला मुद्देसूद उत्तर कार्यकारी अध्यक्ष शिरीष चौधरी यांनी दिले नाही. ‘लोकमत’कडे असलेल्या एकूण २८ प्रश्नांपैकी सर्वच प्रश्न अनुत्तरित राहिले. ‘लोकमत’च्या प्रश्नांना उत्तरे न देण्याची भूमिका चौधरी आणि इतरांची होती. पत्रपरिषदेचा शिष्टाचार टाळून ‘लोकमत’शी बोलायचे नसल्याचे आश्चर्यकारक प्रतिपादन मंचावरुन करण्यात आले. पत्रपरिषद महिनाभरानंतर घेतली खरी, परंतु ती देखील ‘लोकमत’वर आरोप करण्यासाठीच. पत्रकारांना दिलेल्या लेखी निवेदनातही जिल्हाधिकारी, एसपी, यांना दिलेल्या निवेदनाप्रमाणे केवळ आरोप लावण्यात आलेत. खरे तर महिनाभराने का होईना, या पत्रपरिषदेसाठी ‘लोकमत’न आश्रम ट्रस्टचे सुरुवातीलाच अभिनंदन केले. तथापि लोकशाहीचा सन्मान राखून संवाद करण्याचे यावेळीही आश्रम ट्रस्टने टाळलेच. पत्रकारांचा बहिष्कार अन् निषेधनेमकी आणि मुद्देसूद उत्तरे देण्याऐवजी आयोजकांनी पत्रकारांनाच उलट प्रश्न विचारणे सुरु केले. त्यांचा अभ्यास आणि धर्म विचारला. आयोजकांनी विचारलेल्या एका उलट प्रश्नाला पत्रकार कक्षात नियमबाह्यरित्या जमलेल्या भरमसाठ भक्तांनी टाळ्या वाजविल्या. भक्त येथे कसे, टाळ्यांचा अर्थ काय, प्रश्नांची उत्तरे टाळता का, असे नाना प्रश्न विचारुन पत्रकार उभे झाले. भक्तांना बाहेर काढण्यास सांगण्यात आले. मंचाजवळ गर्दी करुन पत्रकारांनी आश्रम पदाधिकाऱ्यांना जाब विचारला. हे भक्त आमच्यासोबत नाहीत, असे खोटे उत्तर शिरीष चौधरी यांनी दिले. पत्रकारांनी त्यानंतर पत्रपरिषदेवर बहिष्कार घातला. निषेधही केला.