शहरं
Join us  
Trending Stories
1
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
2
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
3
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
4
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
5
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
6
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
7
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
8
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
9
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
12
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
13
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
14
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
15
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
16
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
17
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
18
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
19
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
20
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)

कंत्राटी ग्रामसेवकांना मिळाली तीन वर्षांनंतर रक्कम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:25 IST

खात्यावर वर्ग परताव्याचीदेखील तरतूद अमरावती : जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची संख्या व त्या मानाने ग्रामसेवकांची रिक्त असलेली पदे पाहता त्यांच्यावरील ...

खात्यावर वर्ग परताव्याचीदेखील तरतूद

अमरावती : जिल्ह्यातील ग्रामपंचायतीची संख्या व त्या मानाने ग्रामसेवकांची रिक्त असलेली पदे पाहता त्यांच्यावरील कामाचा ताण कमी करण्यासाठी शासनाने सरळ सेवेने ग्रामसेवकांची भरती न करता कंत्राटी पद्धतीने भरती करण्याचा निर्णय घेतला. सलग तीन वर्षे काम करणार्‍या कंत्राटी ग्रामसेवकांच्या कामगिरीचा आढावा घेऊन त्यांना सेवेत कायम केले जाते.मागील काही वर्षांपासून राज्य सरकारने आर्थिक परिस्थितीची कारणे देत नोकर भरतीवर बंदी घातल्यामुळे बरीच ग्रामसेवकांची पदे रिक्त होती परिणामी ग्रामपंचायतीच्या कामकाजावर त्याचा परिणाम होत असल्याचे पाहून कंत्राटी पद्धतीने ग्रामसेवकाचे नियुक्तीचा निर्णय घेण्यात आला. अवघे ७,१०० रुपयांवर या ग्रामसेवकाकडून कामे करून घेण्यात येत असून, तत्पूर्वी त्यांची नेमणूक करताना दहा हजार रुपयांची अनामत रक्कम घेतली जाते. विशेष म्हणजे कंत्राटी ग्रामसेवक तीन वर्षांनंतर सेवेत कायम झाल्यावर त्यांना परतावा देण्याची तरतूद आहे.

कोट

ग्रामसेवक युनियनच्या प्रयत्नाने कंत्राटी ग्रामसेवकांना त्वरित अर्ज करून जिल्हा परिषदेतील सुरक्षा ठेव परत मिळून देण्यात आली. आता ज्या ग्रामसेवकांची सुरक्षा ठेव परत करावयाची आहे ती रक्कम सेवेत कायम झाल्यांतर झेडपी प्रशासनाकडून वेळेवर मिळेल अशी अपेक्षा आहे.

कमलाकर वनवे

जिल्हाध्यक्ष, ग्रामसेवक युनियन

कोट

कंत्राटी ग्रामसेवकांना नियुक्ती दिलेल्यानंतर त्यांच्याकडून दहा हजार रुपये अनामत रक्कम भरून घेतले जाते. ते नियमित सेवेत दाखल झाल्यास संबंधितांना सदरची रक्कम झेडपीकडून परत केली जाते. जिल्ह्यात सेवेत कायम झालेल्यांना आतापर्यंत अनामत रक्क परत करण्यात आली आहे.

दिलीप मानकर

उपमुख्य कार्यकारी अधिकारी, ग्रामपंचायत

जिल्ह्यातील एकूण ग्रामसेवक ४३५

कंत्राटी ग्रामसेवक ०८

बॉक्स

जिल्ह्यातील१४ तालुक्यात ८४० ग्रामपंचायती असून, यामध्ये ५१० ग्रामसेवक कार्यरत आहेत. जिल्ह्यात २००९ ते आतापर्यंत १२२ कंत्राटी ग्रामसेवकांना जिल्हा परिषद पंचायत विभागाकडून अनामत रकमेचा परतावा करण्यात आला आहे. आठ नवीन कंत्राटी ग्रामसेवक गतवर्षी ग्रामपंचायत कंत्राटी म्हणून ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमधून भरण्यात आले त्यांचा परतावा सेवा तीन वर्षांपेक्षा जास्त न झाल्यामुळे परत करण्यात आला नाही.