शहरं
Join us  
Trending Stories
1
अयोध्येमध्ये सिलेंडरचा भीषण स्फोट, घर कोसळून ५ जणा्ंचा  मृत्यू, अनेक जण अडकल्याची भीती  
2
ओवेसींच्या सभेतून वारिस पठाण यांचं नितेश राणेंना आव्हान, म्हणाले, ‘दोन पायांवर येशील, पण…’ 
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्या गळ्यात शांततेचं नोबेल, नेतन्याहू यांनी शेअर केला असा फोटो, म्हणाले…
4
"सामाजिक विषमता निर्माण करण्याला शरद पवार जबाबदार', मनोज जरांगेंच्या भेटीनंतर राधाकृष्ण विखेंचा आरोप 
5
आठव्या क्रमांकाच्या बॅटरनं वाचवलं; पण तोच डाव उलटा फिरला!.. अन् टीम इंडियासमोर आफ्रिकेनं मारली बाजी
6
'हो, ते प्रवासी विमान आम्ही पाडलं होतं', अनेक महिन्यांनंतर व्लादिमीर पुतीन यांची कबुली
7
मनात नसताना रोहित-विराट 'तो' निर्णय घेणार? मोठी माहिती आली समोर
8
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
9
महिलेने रडत रडत केला फोन, पोलिसांना सांगितलं पतीचं गुपित, घराची झडती घेताच बसला धक्का 
10
क्रिकेटच्या मैदानात AI ची ‘बोलंदाजी’! मिताली राजनं पिच रिपोर्टसाठी घेतली गुगल ‘जेमिनी’ची मदत, अन्...
11
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
12
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
13
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
14
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
15
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
16
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
17
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
18
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
19
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
20
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक

तूरडाळ खरेदीच्या सक्तीमुळे ग्राहकांची कोंडी

By admin | Updated: September 27, 2016 00:19 IST

बाजारपेठेत तूरडाळीचे भाव वाढल्याने ८ जुलै २०१६ च्या शासन निर्णयानुसार गरिबांना स्वस्तात तूरडाळ मिळण्याच्या ...

रेशन दुकानदारही अडचणीत : दरांमधील तफावत भोवतेय मनोज मानतकर नांदगाव खंडेश्वरबाजारपेठेत तूरडाळीचे भाव वाढल्याने ८ जुलै २०१६ च्या शासन निर्णयानुसार गरिबांना स्वस्तात तूरडाळ मिळण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाकडून तूरडाळ खरेदी करण्यासंदर्भात परिपत्रक काढले. बाजारपेठेतील तूरडाळीच्या दरात व स्वस्त धान्य दुकानातील दरातील तफावतीमुळे शासकीय स्वस्त धान्य दुकानदारांनी स्वस्त धान्य दुकानात तूरडाळ विक्रीस ठेवावीच, असे फर्मान सोडले. त्यामुळे स्वस्त धान्य दुकानदारांची पंचाईत झाली. बाजारपेठेत तूरडाळ ९५ रुपये किलो व स्वस्त धान्य दुकानात १०३ रुपये किलो असल्याने बीपीएल व अंत्योदय कार्डधारकांना स्वस्त धान्य दुकानातून डाळ घेणे परवडत नाही. परंतु तूरडाळ घेतली तरच स्वस्त धान्य मिळेल, अशी सक्ती स्वस्त धान्य दुकानदार करीत आहे! त्यामुळे बीपीएल व अंत्योदय कार्डधारकांवर उपासमारीची वेळ आली आहे. तालुक्यात एकूण १३४ शासकीय स्वस्त धान्य दुकान आहे. त्याद्वारे तालुक्यातील हजारो बीपीएल, अंत्योदय कार्डधारकांना धान्याची शासकीय योजना कार्यान्वित आहे. परंतु शासनाच्या तुघलकी निर्णयाने जर गरिबांवर उपासमारीची वेळ येत असेल तर मग शासकीय योजनांचा फायदा काय, असा प्रश्न निर्माण होत आहे. स्वस्त धान्य दुकानात तूरडाळ विक्रीस ठेवावीच लागेल, या पुरवठा विभागाच्या तोंडी आदेशाची स्वस्त धान्य दुकानदारांना अंमलबजावणी करावी लागत आहे. परंतु दर बाजारापेक्षा अधिक असल्याने स्वस्त धान्य दुकानदार व कार्डधारकांमध्ये वाद होत आहेत. स्वस्त धान्य दुकानदाराने तूरडाळीचे वाटप न केल्यास त्याचा फटका दुकानदाराला सोसावा लागतो. त्यामुळे एकीकडे प्रशासनाचा दबाव, तर दुसरीकडे ग्राहकांशी वाद अशी दुहेरी कोंडी स्वस्त धान्य दुकानदाराची झाली आहे. अशा स्थितीत शासनाने तूरडाळीचे भाव बाजारभावापेक्षा कमी करणे गरजेचे आहे. अन्यथा धान्य दुकानदार व कार्डधारकांमध्ये वाद पेटरणार आहेतूरडाळीची बाजारपेठेपेक्षा स्वस्त धान्य दुकानात अधिक दराने विक्री होत आहे. त्यामुळे कार्डधारक व स्वस्त धान्य दुकानदारांत सतत वाद होत आहे. तूरडाळीचा पुरवठा करण्यात येऊ नये, असे निवेदन तहसीलदार यांच्यामार्फत शासनाला दिले आहे. अद्याप यावर तोडगा न निघाल्याने पेच कायम आहे. - विनोद कडू, सचिव, स्वस्त धान्य दुकानदार संघटनाशासनाच्या आदेशानुसार जिल्हा पुरवठा विभागांतर्गत तालुक्याच्या नियमानुसार जेवढा धान्याचा पुरवठा मंजूर होतो तेवढेच धान्य दुकानदारास वितरित केले जाते. जिल्हा पुरवठा विभागामार्फत पाठविलेलाच साठा तालुक्यातील १३४ दुकानदारांना दिला जातोे. - गजानन भेंडेकर,तालुका पुरवठा निरीक्षक