शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

बांधकाम विभाग ‘बेवारस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 10:34 PM

महापालिकेचा बांधकाम विभाग कार्यकारी आणि शहर अभियंत्याविना पांगळा झाला आहे. बांधकाम विभागाशी संबंधित तीनही खुर्च्या अधिकाऱ्यांविना खाली असल्याने कुणाचा पायपोस कुणाच्या पायात राहिलेला नाही.

ठळक मुद्देपोतदार रजेवर : कर्मचारी, अधिकारी सुसाट

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : महापालिकेचा बांधकाम विभाग कार्यकारी आणि शहर अभियंत्याविना पांगळा झाला आहे. बांधकाम विभागाशी संबंधित तीनही खुर्च्या अधिकाऱ्यांविना खाली असल्याने कुणाचा पायपोस कुणाच्या पायात राहिलेला नाही.शहर अभियंता, कार्यकारी अभियंता १ व २ या तीनही महत्त्पूर्ण पदांचा कार्यभार सेवानिवृत्त अभियंता अनंत पोतदार यांच्याकडे देण्यात आला आहे. ते मागील आठवड्यात रजेवर गेल्याने बांधकाम विभागातील बहुतांश कामे रखडली आहेत. बांधकाम व अन्य बाबतीतल्या साºया योजनांचे कार्यान्वयन शहर अभियंता, कार्यकारी अभियंता १ व २ कडे आहे. तूर्तास नगरोत्थान, डीपीसीतून मिळालेल्या ७.३६ कोटीच्या कामांसह राजापेठ उड्डाणपूल, छत्रीतलाव, ट्रान्सपोर्टनगर व्यापारी संकुलाचे काम सुरू आहे. आरोग्य, नगररचना, कर या विभागांसोबतच बांधकाम विभागाचे महत्त्व सर्वाधिक आहे. मात्र, मागील साडेतीन वर्षांपासून या महत्त्वपूर्ण विभागाला कंत्राटीचे ग्रहण लागले आहे. तत्कालीन आयुक्त हेमंत पवार यांचे सेवानिवृत्त अभियंता जीवन सदार यांच्यावर अधिक जीव असल्याने मागील तीन वर्षात गहरवार, संतोष जाधव, सोनवणे व पवार हे चार अभियंते महापालिकेतून परत गेले. ज्यांना बेकायदा नियुक्ती दिली, त्या सदारांचा कंत्राटी कार्यकाळही जूनमध्ये संपला. त्यानंतरही पूर्णवेळ प्रतिनियुक्तीचा शहर अभियंता महापालिकेला न मिळाल्याने पुन्हा ते पद कंत्राटी पोतदारांकडे देण्यात आले. पोतदारांच्या मर्यादा स्पष्ट आहेत. अनेक उपअभियंते, सहायक अभियंते व कर्मचारी शोधूनही बांधकाम विभागात सापडत नाहीत. एकंदर मागील तीन वर्षांत प्रतिनियुक्तीवर अभियंता नसल्याने बांधकाम विभागाची रया गेली आहे.नव्या आयुक्तांकडून हवा पाठपुरावासदारांच्या कंत्राटी कार्यकाळात सार्वजनिक बांधकाम विभागाने चार कार्यकारी अभियंता महापालिकेत प्रतिनियुक्तीवर पाठविले. मात्र, सदार स्थानापन्न असल्याने पवारांनी त्यांच्याकडे कार्यकारी अभियंता-२ पदभार दिला. शहर अभियंता हे पद प्रतिनियुक्तीचे असल्यानंतरही चार ज्येष्ठ अभियंत्यांना संधी नाकारली गेली. त्यामुळे आता नवे आयुक्त संजय निपाणे यांनी शासनस्तरावरून पाठपुरावा करून शहर अभियंता आणावा, अशी अपेक्षा आहे.जाधव रूजू झालेच नाहीतमागील आठ महिन्यांपूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाने संतोष जाधव या कार्यकारी अभियंत्याची महापालिकेत बदली केली. मात्र, सदारांच्या आधीचा त्यांचा अनुभव फारसा चांगला नसल्याने आणि गहरवार, सोनवणे आणि पवारांशी महापालिकेने काय केले, हे ज्ञात असल्याने जाधव रुजूच झाले नाही. रुजू झाल्यास आपल्याकडेही शौचालय, घरकुल योजनांचे कार्यान्वयन दिले जाईल, अशी खात्री असल्याने जाधवांनी परस्पर अन्यत्र बदली करून घेतली.