शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

निम्न पेढी प्रकल्पबाधितांनी रोखले धरणाचे बांधकाम!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2021 05:01 IST

अमरावती प्रकल्प बांधकाम विभागाने संबंधित कंत्राटदाराला काम पूर्ववत सुरू करण्याचे आदेेश दिले. त्यामुळे शुक्रवारपासून अळणगावनजीकच्या प्रकल्प भिंतीजवळ कामाला सुरुवात होणार होती. मात्र, ती माहिती अळणगाव, गोपगव्हान, कु्ंड खुर्द, कुंड सर्जापूर, हातुर्णा सातुर्णा या प्रकल्पबाधित गावांना समजताच गुरुवारी सकाळी ११ वाजता त्यांनी धरणाची भिंत गाठली. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत काम सुरु होऊ देणार नाही, असा पवित्रा घेण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अळणगाव व गोपगव्हाण येथील प्रकल्पबाधितांच्या पुनर्विचार याचिका रद्दबातल ठरविल्या. सबब, निम्न पेढी प्रकल्पाच्या बांधकामास ३० डिसेंबरपासून नव्याने सुरुवात करण्यात आली. मात्र, ते काम सुरू होण्यापूर्वी पेढी प्रकल्पबाधितांनी शेकडोंच्या संख्येत बांधकामस्थळी धाव घेतली. काम रोखले. त्यामुळे मोठा गहजब उडाला. भातकुली तालुक्यातील निंभा येथे पेढी नदीवर निम्न पेढी सिंचन प्रकल्प निर्माणाधीन आहे. १६१ कोटींची मूळ प्रशासकीय मान्यता असलेल्या या प्रकल्पाची किंमत १६३९ कोटी रुपयांवर पोहोचली आहे. या प्रकल्पाचे बांधकाम ७५ टक्क्यांपर्यंत पोहोचले. मात्र, वाढीव मोबदल्यासाठी अळणगाव व गोपगव्हाण येथील ३०० लोकांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे प्रकल्पाचे काम थांबले होते. दरम्यान, २३ डिसेंबर रोजी उच्च न्यायालयाने दोन्ही पुनर्विचार याचिका रद्द केल्याने अमरावती प्रकल्प बांधकाम विभागाने संबंधित कंत्राटदाराला काम पूर्ववत सुरू करण्याचे आदेेश दिले. त्यामुळे शुक्रवारपासून अळणगावनजीकच्या प्रकल्प भिंतीजवळ कामाला सुरुवात होणार होती. मात्र, ती माहिती अळणगाव, गोपगव्हान, कु्ंड खुर्द, कुंड सर्जापूर, हातुर्णा सातुर्णा या प्रकल्पबाधित गावांना समजताच गुरुवारी सकाळी ११ वाजता त्यांनी धरणाची भिंत गाठली. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत काम सुरु होऊ देणार नाही, असा पवित्रा घेण्यात आला. त्यामुळे तेथे मोठा तणाव निर्माण झाला होता. दुपारी २ वाजेपर्यंत हे आंदोलन सुरू होते. अखेर कंत्राटदाराने कामास सुरुवात केली नाही. घटनास्थळी अधीक्षक अभियंता आकेवार व कार्यकारी अभियंता गणेश कथले यांनी भेट दिली. मध्यस्थीचा प्रयत्नदेखील केला. यात साहेबराव विधळे, मनोज चव्हाण, गौतम खंडारे, अविनाश सनके, विलास गावनेर, श्रीकृष्ण बैलमारे आदी ग्रामस्थ व महिला सहभागी झाल्या.

प्रकल्पबाधितांच्या आंदोलनामुळे काम थांबविले आहे. त्यांच्या मागण्या शासनस्तरावरील आहेत. विधायक मार्गाने मागण्या मांडाव्यात. मात्र, काम थांबविणे योग्य नाही. न्यायालयाने दोन्ही याचिका रद्द केल्याने काम सुरू करण्याचा निर्णय घेतला होता.गणेश कथले, कार्यकारी अभियंताअमरावती प्रकल्प बांधकाम विभाग

 

टॅग्स :Damधरण