शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

प्रलोभन देऊन मिळविली संमती; बालविवाहानंतर जबरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2022 05:01 IST

पैशाचे आमिष देऊन अमोल सोळंके याने मुलीच्या नातेवाईकांची संमती मिळविली. त्या बालविवाहासाठी अल्पवयीन मुलीला अकोला जिल्हयातील एका गावात महिलेच्या घरी नेण्यात आले. तेथे अन्य पाच आरोपींनी त्या मुलीचा अमोल सोळंके सोबत जबरीने बालविवाह करून दिला. त्यानंतर तिला भातकुली तालुक्यातील एका गावी नेण्यात आले. तेथे ती अमोल सोळंके याच्या घरी एक ते दीड महिना राहिली. त्या कालावधीत आरोपी अमोल सोळंके याने त्या मुलीशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. 

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अल्पवयीन मुलीच्या पालकांना पैशाचे प्रलोभन देऊन तिच्याशी लग्न केल्यानंतर तिचा लैंगिक छळ करण्यात आला. चार ते पाच महिन्यांपूर्वी अकोला जिल्ह्यातील एका गावात ही घटना घडली. याप्रकरणी वलगाव पोलिसांनी २८ मे रोजी रात्री १२.२३ वाजता एका महिलेच्या तक्रारीवरून चार पुरुष व दोन महिलांविरुद्ध भादंविचे कलम ३७६ (२), (एन), ३२३, ५०६, ३४, पोस्को व बालविवाह प्रतिबंधक कायद्याच्या कलम ९, १०, ११ अन्वये गुन्हा दाखल केला.  तक्रारीनुसार,  एका अल्पवयीन मुलीवर हा प्रसंग उद्भवला.  तक्रारकर्ता महिलेच्या एका नातेवाईकास फोन करून मला तुमच्या नातेवाईक मुलीशी लग्न करायचे आहे, असे आरोपी अमोल सोळंके (३५, ता. भातकुली) याने कळविले. मात्र, त्या लग्नाला अल्पवयीन मुलीने नकार दिला. त्यावेळी पैशाचे आमिष देऊन अमोल सोळंके याने मुलीच्या नातेवाईकांची संमती मिळविली. त्या बालविवाहासाठी अल्पवयीन मुलीला अकोला जिल्हयातील एका गावात महिलेच्या घरी नेण्यात आले. तेथे अन्य पाच आरोपींनी त्या मुलीचा अमोल सोळंके सोबत जबरीने बालविवाह करून दिला. त्यानंतर तिला भातकुली तालुक्यातील एका गावी नेण्यात आले. तेथे ती अमोल सोळंके याच्या घरी एक ते दीड महिना राहिली. त्या कालावधीत आरोपी अमोल सोळंके याने त्या मुलीशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. 

मारहाणीमुळे परतली तर म्हणाला जीव देतोदारू पिऊन अमोलने त्या अल्पवयीन मुलीला मारहाण केली. कुठल्याही कारणावरून होत असलेल्या मारहाणीमुळे ती माहेरी परतली. त्यावर त्याने मोबाईल कॉल करून तू घरी परत ये, अन्यथा तेथे येऊन स्वत:च्या जिवाचे बरेवाईट करण्याची धमकी दिली. याप्रकरणी अखेर तिने २८ मे रोजी वलगाव पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी अमोल सोळंके (३५), अंबादास सोळंके (५७), गजानन चंपत पवार (४०), विजय चंपत पवार व एक महिला (सर्व रा. ता. भातकुली) यांच्यासह अकोला जिल्ह्यातील महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला. बालविवाह प्रतिबंधक कायद्यातील तरतुदीचाही समावेश आहे.

काय म्हणतो कायदा'बालविवाह प्रतिबंध कायदा' हा महत्त्वाचा आणि मुलींना संरक्षण देणारा कायदा आहे. या कायद्याप्रमाणे १८ वर्षांहून लहान मुलगी व २१ वर्षांहून कमी वयाचा मुलगा कायदेशीर विवाहासाठी योग्य नाहीत. वर किंवा वधू यांच्यातील एक जरी अल्पवयीन असेल, तरी तो बालविवाह ठरतो. असा विवाह करणारी सज्ञान व्यक्ती, लग्न ठरवणारे, पार पाडणारे, हजर असलेले सर्व या कायद्यानुसार गुन्हेगार आहेत. ज्या बालक वा बालिकेचा विवाह झाला आहे; त्यांना तो मान्य नसल्यास न्यायालयात अर्ज करून रद्दबादल ठरवता येतो. बालवधूला पतीकडून किंवा तो अज्ञान असल्यास सासऱ्याकडून पोटगी मिळू शकते.

 

टॅग्स :marriageलग्न