शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
2
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
3
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
4
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
5
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
6
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
7
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
8
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
9
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
10
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
13
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
14
SMS Fraud Detection : SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
15
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
16
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
17
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
18
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
19
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
20
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!

प्रलोभन देऊन मिळविली संमती; बालविवाहानंतर जबरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2022 05:01 IST

पैशाचे आमिष देऊन अमोल सोळंके याने मुलीच्या नातेवाईकांची संमती मिळविली. त्या बालविवाहासाठी अल्पवयीन मुलीला अकोला जिल्हयातील एका गावात महिलेच्या घरी नेण्यात आले. तेथे अन्य पाच आरोपींनी त्या मुलीचा अमोल सोळंके सोबत जबरीने बालविवाह करून दिला. त्यानंतर तिला भातकुली तालुक्यातील एका गावी नेण्यात आले. तेथे ती अमोल सोळंके याच्या घरी एक ते दीड महिना राहिली. त्या कालावधीत आरोपी अमोल सोळंके याने त्या मुलीशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. 

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अल्पवयीन मुलीच्या पालकांना पैशाचे प्रलोभन देऊन तिच्याशी लग्न केल्यानंतर तिचा लैंगिक छळ करण्यात आला. चार ते पाच महिन्यांपूर्वी अकोला जिल्ह्यातील एका गावात ही घटना घडली. याप्रकरणी वलगाव पोलिसांनी २८ मे रोजी रात्री १२.२३ वाजता एका महिलेच्या तक्रारीवरून चार पुरुष व दोन महिलांविरुद्ध भादंविचे कलम ३७६ (२), (एन), ३२३, ५०६, ३४, पोस्को व बालविवाह प्रतिबंधक कायद्याच्या कलम ९, १०, ११ अन्वये गुन्हा दाखल केला.  तक्रारीनुसार,  एका अल्पवयीन मुलीवर हा प्रसंग उद्भवला.  तक्रारकर्ता महिलेच्या एका नातेवाईकास फोन करून मला तुमच्या नातेवाईक मुलीशी लग्न करायचे आहे, असे आरोपी अमोल सोळंके (३५, ता. भातकुली) याने कळविले. मात्र, त्या लग्नाला अल्पवयीन मुलीने नकार दिला. त्यावेळी पैशाचे आमिष देऊन अमोल सोळंके याने मुलीच्या नातेवाईकांची संमती मिळविली. त्या बालविवाहासाठी अल्पवयीन मुलीला अकोला जिल्हयातील एका गावात महिलेच्या घरी नेण्यात आले. तेथे अन्य पाच आरोपींनी त्या मुलीचा अमोल सोळंके सोबत जबरीने बालविवाह करून दिला. त्यानंतर तिला भातकुली तालुक्यातील एका गावी नेण्यात आले. तेथे ती अमोल सोळंके याच्या घरी एक ते दीड महिना राहिली. त्या कालावधीत आरोपी अमोल सोळंके याने त्या मुलीशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. 

मारहाणीमुळे परतली तर म्हणाला जीव देतोदारू पिऊन अमोलने त्या अल्पवयीन मुलीला मारहाण केली. कुठल्याही कारणावरून होत असलेल्या मारहाणीमुळे ती माहेरी परतली. त्यावर त्याने मोबाईल कॉल करून तू घरी परत ये, अन्यथा तेथे येऊन स्वत:च्या जिवाचे बरेवाईट करण्याची धमकी दिली. याप्रकरणी अखेर तिने २८ मे रोजी वलगाव पोलीस ठाणे गाठले. पोलिसांनी अमोल सोळंके (३५), अंबादास सोळंके (५७), गजानन चंपत पवार (४०), विजय चंपत पवार व एक महिला (सर्व रा. ता. भातकुली) यांच्यासह अकोला जिल्ह्यातील महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला. बालविवाह प्रतिबंधक कायद्यातील तरतुदीचाही समावेश आहे.

काय म्हणतो कायदा'बालविवाह प्रतिबंध कायदा' हा महत्त्वाचा आणि मुलींना संरक्षण देणारा कायदा आहे. या कायद्याप्रमाणे १८ वर्षांहून लहान मुलगी व २१ वर्षांहून कमी वयाचा मुलगा कायदेशीर विवाहासाठी योग्य नाहीत. वर किंवा वधू यांच्यातील एक जरी अल्पवयीन असेल, तरी तो बालविवाह ठरतो. असा विवाह करणारी सज्ञान व्यक्ती, लग्न ठरवणारे, पार पाडणारे, हजर असलेले सर्व या कायद्यानुसार गुन्हेगार आहेत. ज्या बालक वा बालिकेचा विवाह झाला आहे; त्यांना तो मान्य नसल्यास न्यायालयात अर्ज करून रद्दबादल ठरवता येतो. बालवधूला पतीकडून किंवा तो अज्ञान असल्यास सासऱ्याकडून पोटगी मिळू शकते.

 

टॅग्स :marriageलग्न