शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

नांदगाव तहसीलवर काँग्रेसचा मोर्चा

By admin | Updated: November 17, 2014 22:45 IST

शेतकरी व शेतमजुरांच्या विविध मागण्यांसाठी आ. वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात सोमवारी तहसील कार्यालयावर शेकडो शेतकरी व काँग्रेस मंडळींचा मोर्चा काढण्यात आला.

नांदगाव खंडेश्वर : शेतकरी व शेतमजुरांच्या विविध मागण्यांसाठी आ. वीरेंद्र जगताप यांच्या नेतृत्वात सोमवारी तहसील कार्यालयावर शेकडो शेतकरी व काँग्रेस मंडळींचा मोर्चा काढण्यात आला.यात सोयाबीनची नुकसान भरपाई प्रतिहेक्टरी वीस हजार रूपये याप्रमाणे द्या, सोयाबीनला ४ हजार रूपये व कापसाला ६ हजार रूपये भाव प्रतिक्विंटल द्यावा. यंदा शेती पिकाचे प्रचंड नुकसान लक्षात घेता आणेवारी ५० टक्क्यांचे आत लावा, शेती सिंचनासाठी लोडशेडींग कमी करून वीज द्या, शेतमजुरीसाठी रोहयोची कामे तातडीने सुरू करून ८ दिवसांत कामाची मजुरी द्या आदी प्रमुख मागण्यांचा समावेश होता. तालुक्यातून आलेल्या शेतकरी व शेतमजुरांचा मोर्चा गजानन महाराज मंदिरच्या सभागृहातून निघून तहसीलवर आला. तेथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. यावेळी आ. वीरेंद्र जगताप, देवीदास सुने, अ. सलामभाई, देवरावजी साखरे, दीपक सवाई यांची भाषणे झाली नंतर तहसीलदार शिवाजी जगताप यांना एका शिष्टमंडळाने निवेदन सादर केले. या मोर्चात तालुका काँग्रेसचे अध्यक्ष विनोद चौधरी, तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्ष नीता सावदे, जि. प. सदस्य संगीता सवाई, पद्माताई शिरभाते, विठ्ठलराव चांदणे, पं. स. सदस्य सविता सवाई, सुधीर पाटेकर, अक्षय पारसकर, अमोल धवसे, राजेंद्र सरोदे, सरफराज खाँ, विनोद जगताप, मारोती रामटेके, अमर कणसे, दीपक सवाई, इद्रिसभाई, इसूबभाई, सतीश पोकळे, जयदीप काकडे, रघुपती गावंडे, किशोर गुलालकरी, अशोक खंडार, प्रदीप ब्राम्हणवाडे, अजय चांदणे, रशीदभाई कुरेशी, जमीलभाई, रऊफभाई व तालुक्यातील बरीच मंडळी उपस्थित होती. (तालुका प्रतिनिधी)