शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
4
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
5
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
6
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
7
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
8
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
9
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
10
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
11
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
12
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
13
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
14
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
15
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
16
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
18
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
19
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
20
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
Daily Top 2Weekly Top 5

१३४ ग्रामपंचायतींवर काँग्रेसचा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 23:51 IST

जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या यशानंतर काँग्रेसने जिल्ह्यातील ग्रामपंचायतींवरदेखील झेंडा फडकविला आहे.

ठळक मुद्देबबलू देशमुख : भाजपला अमरावतीतून धक्का

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या यशानंतर काँग्रेसने जिल्ह्यातील ग्रामपंचायतींवरदेखील झेंडा फडकविला आहे. जिल्ह्यातील २५५ ग्रामपंचायतींचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. त्यापैकी १३४ ग्रामपंचायती काँग्रेसच्या ताब्यात गेल्या आहेत. भाजप सरकारने गत तीन वर्षांपासून शेतकरी सर्वसामान्यांची केलेली दिशाभूल पुढे येत असून, खºया अर्थाने ही पुढील विधानसभेची कलचाचणी असल्याचे मत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी व्यक्त केले आहे.जिल्ह्यातील २५५ ग्रामपंचायतींकरिता १६ आॅक्टोबर रोजी निवडणुका पार पडल्या. मंगळवारी दुपारपर्यंत सर्वच ग्रामपंचायतींचे निकाल हाती आले. या निवडणुकीमध्ये काँग्रेसने आपले वर्चस्व सिद्ध करीत २४९ पैकी १३४ ग्रामपंचायतींवर कब्जा केला. या निवडणुकीतून गेल्या तीन वर्षांपासून जनतेची दिशाभूल करणाºया भाजपला त्यांची जागा मतदारांनी आता खºया अर्थाने दाखवून दिलेली आहे. ग्रामस्तरावर अत्यंत महत्त्वाच्या समजल्या जाणाºया ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला धक्का देत काँग्रेस पहिल्या क्रमांकावर आली आहे. १३४ सरपंच काँग्रेसचे निवडून आले असून, उर्वरित ग्रामपंचायतींमध्ये मोठ्या संख्येने सदस्य निवडून आले आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या यशानंतर काँग्रेसने ग्रामपंचायतींवरदेखील कब्जा करीत आपला झेंडा कायम ठेवला आहे.भाजप शासनाने आतापर्यंत जनतेची फसवणूकच केली आहे. थेट सरपंचपदाची निवडणूक भाजपने ज्यासाठी लावली होती, तो डाव मतदारांनी धुळीस मिळविला. यापूर्वीच या शासनाचा परतीचा प्रवास सुरू झाला होता. नांदेड महानगरपालिकेमध्ये मतदारांनी यावर शिक्कामोर्तब केले, तर आता अमरावती जिल्ह्याच्या मतदारांनी भाजपला धक्का देऊन त्यांचा परतीचा मार्ग प्रशस्त केला आहे. कर्जमाफी, महागाई, जीएसटी याचाच जाब जनतेने दिल्याचे मत जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी व्यक्त केले.ग्रामपंचायत निवडणूक ही विधानसभेची कलचाचणी असून, येणाºया विधानसभेच्या निवडणुकांमध्ये संपूर्ण जिल्हाच काँग्रेसमय होईल, असा दावा बबलू देशमुख यांनी यावेळी केला. ग्रामपंचायत निवडणुकीच्या यशानंतर त्यांनी लोकांचे आभार मानले आहे.