शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी काँग्रेसची तहसीलवर धडक

By admin | Updated: December 28, 2016 01:35 IST

शेतकऱ्यांची सध्या अत्यंत दैनावस्था झाली आहे. शासनाच्या उपेक्षेच्या धोरणामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.

तिवस्यात आंदोलन : तहसीलदारांना पिकांचा अहेर तिवसा : शेतकऱ्यांची सध्या अत्यंत दैनावस्था झाली आहे. शासनाच्या उपेक्षेच्या धोरणामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकरिता मंगळवारी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांची जयंती विदर्भात सर्वदूर उत्साहात साजरी करण्यात येत असताना तालुक्यातील काँग्रेसजनांनी नगरपंचायत उपाध्यक्ष वैभव वानखडे यांच्या नेतृत्त्वात तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढला. शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव, पणन् महासंघाचे कापूस खरेदी केंद्र सुरू करणे, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, पिकविम्याची रक्कम तातडीने शेतकऱ्यांना मिळावी आदी मागण्यांचे निवेदन तिवसा येथील तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी तहसीलदारांना तूर, संत्रा, कापूस, सोयाबीन, आदी पिकांचा प्रतिकात्मक अहेर करण्यात आला. सततची नापिकी, दुष्काळी परिस्थिती यामुळे शेतकरी, शेतमजूर हवालदिल झाले आहेत. सोेबतच नोटाबंदीच्या निर्णयाने सोयाबीन, संत्रा, तूर कपाशी या विविध शेतमालाला व अन्य पिकांना हमीभावाचा फटका बसला आहे. नफा आणि वार्षिक ताळमेळ बसविणाऱ्या मुख्य पिकांमध्ये संत्रा सोयाबीन, कापूस, तूर या पिकांना बाजारभाव नाही, हमीभावाची आशाही नोटाबंदीमुळे मावळली आहे. सन २०१४-२०१५ व सन २०१५-१६ मध्ये सोयाबीनला ३५०० ते ४ हजार रूपये दर होता. आज केवळ २७०० रूपये दर आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यासर्व पिकांचा हमीभाव २० टक्के कमी झाला आहे. पणन् महासंघाने कापसाची खरेदी सुरू केल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात ज्येष्ठ नागरिक गंगाराम अडसोड, शिरजगाव मोझरी आणि महिला काँग्रेस तालुका अध्यक्ष कविता पचलोरे, तालुकाध्यक्ष मुकुंद देशमुख, रामराव तांबेकर, कमलाकर वाघ, अभिजित बोके, मंगेश भगोले, उज्ज्वला पांडव, लुकेश केने, हरिश मोरे, सागर राऊत, दिलीप वानखडे आदींची उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)