शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
3
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
4
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
7
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
8
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
9
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
10
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
11
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
12
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
13
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
14
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
15
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
16
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
17
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
18
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
19
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
20
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी काँग्रेसची तहसीलवर धडक

By admin | Updated: December 28, 2016 01:35 IST

शेतकऱ्यांची सध्या अत्यंत दैनावस्था झाली आहे. शासनाच्या उपेक्षेच्या धोरणामुळे शेतकरी हैराण झाले आहेत.

तिवस्यात आंदोलन : तहसीलदारांना पिकांचा अहेर तिवसा : शेतकऱ्यांची सध्या अत्यंत दैनावस्था झाली आहे. शासनाच्या उपेक्षेच्या धोरणामुळे शेतकरी हैराण झाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकरिता मंगळवारी डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांची जयंती विदर्भात सर्वदूर उत्साहात साजरी करण्यात येत असताना तालुक्यातील काँग्रेसजनांनी नगरपंचायत उपाध्यक्ष वैभव वानखडे यांच्या नेतृत्त्वात तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढला. शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमीभाव, पणन् महासंघाचे कापूस खरेदी केंद्र सुरू करणे, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती, पिकविम्याची रक्कम तातडीने शेतकऱ्यांना मिळावी आदी मागण्यांचे निवेदन तिवसा येथील तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी तहसीलदारांना तूर, संत्रा, कापूस, सोयाबीन, आदी पिकांचा प्रतिकात्मक अहेर करण्यात आला. सततची नापिकी, दुष्काळी परिस्थिती यामुळे शेतकरी, शेतमजूर हवालदिल झाले आहेत. सोेबतच नोटाबंदीच्या निर्णयाने सोयाबीन, संत्रा, तूर कपाशी या विविध शेतमालाला व अन्य पिकांना हमीभावाचा फटका बसला आहे. नफा आणि वार्षिक ताळमेळ बसविणाऱ्या मुख्य पिकांमध्ये संत्रा सोयाबीन, कापूस, तूर या पिकांना बाजारभाव नाही, हमीभावाची आशाही नोटाबंदीमुळे मावळली आहे. सन २०१४-२०१५ व सन २०१५-१६ मध्ये सोयाबीनला ३५०० ते ४ हजार रूपये दर होता. आज केवळ २७०० रूपये दर आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यासर्व पिकांचा हमीभाव २० टक्के कमी झाला आहे. पणन् महासंघाने कापसाची खरेदी सुरू केल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो. या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चात ज्येष्ठ नागरिक गंगाराम अडसोड, शिरजगाव मोझरी आणि महिला काँग्रेस तालुका अध्यक्ष कविता पचलोरे, तालुकाध्यक्ष मुकुंद देशमुख, रामराव तांबेकर, कमलाकर वाघ, अभिजित बोके, मंगेश भगोले, उज्ज्वला पांडव, लुकेश केने, हरिश मोरे, सागर राऊत, दिलीप वानखडे आदींची उपस्थिती होती. (तालुका प्रतिनिधी)