शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?...
2
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
3
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
4
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
5
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
6
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
7
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
8
"म्हणून पुन्हा एकदा सांगतो, शून्य अधिक शून्य...", निकाल लागताच भाजपचा उद्धव ठाकरेंवर पहिला प्रहार
9
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
10
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
11
Muktainagar Nagar Panchayat Election Result 2025: “रक्षा खडसे भाजपात एकाकी पडल्या”; मुक्ताईनगरातील शिंदेसेनेच्या विजयानंतर एकनाथ खडसेंचा दावा
12
"पैसे भरा, मृतदेह न्या", पोटच्या पोरासाठी बापाने मागितली भीक; घर गहाण ठेवलं, कर्ज काढलं, पण...
13
धारुरमध्ये हे काय घडलं? भाजपचे सर्व उमेदवार आपटले...! पंकजा मुंडे यांना मोठा धक्का, म्हणाल्या...
14
रेल्वे प्रवासासाठी आता मोजावे लागणार जादा पैसे! जास्त सामान नेण्यावरही अतिरिक्त शुल्क लागू होणार
15
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
16
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
17
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
18
Amul: नोकरीची चिंता सोडा आणि स्वतःच मालक व्हा! अमूलसोबत दरमहा कमवा १.५ लाख रुपये, कसे?
19
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
20
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांसाठी काँग्रेस आक्रमक

By admin | Updated: January 8, 2017 00:04 IST

सर्वसामान्य लोकांना वेठीस धरून नोटबंदी केवळ उद्योगपतींकडून पैसा मिळविण्यासाठी करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसच्या जनाक्रोश आंदोलनातून शनिवारी करण्यात आला.

जनाक्रोश आंदोलन : एकजूट दखलनीय, जिल्हाधिकाऱ्यांवर प्रश्नांची सरबत्तीअमरावती : सर्वसामान्य लोकांना वेठीस धरून नोटबंदी केवळ उद्योगपतींकडून पैसा मिळविण्यासाठी करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसच्या जनाक्रोश आंदोलनातून शनिवारी करण्यात आला. नोटबंदीने देशात आर्थिक अराजकता निर्माण केल्याची टीका यावेळी काँग्रेस नेत्यांनी केली. शहर तथा जिल्हा काँग्रेसकडून शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारोंचा जनाक्रोश मोर्चा धडकला. मोदी सरकारविरुद्ध देशात सर्वदूर उसळलेल्या असंतोषाला वाचा फोडण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आल्याचे काँग्रेस नेत्यांनी सांगितले.यंदा कापूस असो वा सोयाबीन, कांदा असो वा टोमॅटो साराच शेतमाल मातीमोल भावाने विकला जात आहे. मात्र मुख्यमंत्र्यांना शेतकऱ्यांच्या भावनेशी कुठलेही सोयरसुतूक नाही. शासन अस्तित्वातच नसावे, अशी स्थिती आहे. अद्यापपर्यंत कोलमडलेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळालेली नाही. मुख्यमंत्र्यांच्या भावावर करवाई केव्हा?- यशोमतीआ.यशोमती ठाकूर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या शिक्षक मामेभावाच्या प्रकरणाचा जाब विचारला. अंजनगाव बारी येथील शाळेत शिक्षक असलेले मुख्यमंत्र्यांचे मामेभाऊ राहुल कलोती हे तीन वर्षांपासून शाळेत गैरहजर आहेत. त्यांच्यावर काय कारवाई करण्यात आली, अशी विचारणा आ.ठाकूर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. सीईओंकडे अहवाल आला आहे. ते कारवाई करतीलच. त्यांनी न केल्यास मी करेन, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. भाजप सरकारकडून भ्रमनिरास : आ. जगतापतूर, सोयाबीन आणि कापसाची विक्री बेभाव होत आहे. १२ हजारांची तूर ३६०० वर आलीय. तिकडे काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नोटाबंदी करण्यात आल्याचा दावा पीएम करतात. किती काळा पैसा जमा झाला, असा सवाल आ. वीरेंद्र जगताप यांनी उपस्थित केला. नोटबंदीच्या काळात भाजप नेत्यांचा भ्रष्टाचार उघड झाला. जिल्ह्यात किती काळा पैसा जमा झाला, अशी विचारणा त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केली. तीन वर्षानंतर पहिल्यांदाच बरे पीक आले असताना भाव नसल्याने शेतकरी आत्महत्यांकडे वळलाय, मात्र सीएम, पीएमला उसंत नसल्याची टीका त्यांनी केली. -तर मोदीच सुपरस्टार असते : खोडकेमोदी १५-२० वर्षे आधी पंतप्रधान झाले असते, तर अमिताभऐवजी तेच सुपरस्टार असते, अशी खोचक टीका काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस संजय खोडके यांनी केली. जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात खोडके यांनी कामगारांचा मुद्दा लावून धरला. नोटाबंदीनंतर कामगारवर्ग किती कमी झाला, कितीजण बेरोजगार झालेत, याची माहिती आपण शासनाला पाठविली काय? असा सवाल त्यांनी केला. नोटबंदीमुळेच रेमण्डचा प्रोजेक्ट सहा महिने पुढे ढकलला गेल्याची माहिती त्यांनी दिली. जनधन खात्यातूनही विथ्ड्रॉल होत नसल्याचे वास्तव त्यांनी मांडले.ग्रामीण जनता हवालदील- देशमुखकापूस, सोयाबीन उत्पादकांसह ग्रामीण जनता नोटबंदीमुळे हैराण झाली असताना त्यांच्यावर आता आत्महत्येची वेळ येऊन ठेपली आहे. शेतकऱ्यांची दुरवस्था, त्यांच्या शेतमालाला मिळत असलेला अत्यल्प भाव, बँकांमधील खोळंबलेले व्यवहार यामुळे ग्रामिणांचे कंबरडे मोडले आहे. जिल्हा बँकेवर मर्यादा घातल्याने सहकार क्षेत्रावर सुल्तानी संकट कोसळले असताना मोदी, फडणवीस सरकार आश्वासनांच्या फैरी झाडत असल्याचा आरोप जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी केला. त्यांनी आक्रमक शैलीमध्ये सरकारचा निषेध केला.मायक्रो फायनांसचा अहवाल आरबीआयकडेआ. वीरेंद्र जगताप, आ. यशोमती ठाकूर, बबलू देशमुख यांनी मायक्रो फायनांसच्या पठाणी वसुलीचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर मायक्रो फायनांस बाबतचा अहवाल आरबीआयकडे पाठविल्याचे गित्ते यांनी स्पष्ट केले. याशिवाय तूर पिकाचे जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान असून त्याबाबत सर्वेक्षण करण्याचे आदेश ५ जानेवारीलाच दिल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.टाळ-मृंदगाचे भजनकाँग्रेसच्या मोर्चाला इर्विन चौकातून दुपारी १२ च्या सुमारास सुरुवात झाली. येथे ज्ञानबा रुखमाईसह, विठ्ठल माझा ही भजने गायली गेली. टाळ-मृंदगाच्या साथीने मोर्चाच्या मार्गावर विविध भजने करण्यात आली. २० ते २५ काँग्रेसी कार्यकर्त्यांनी एक सूर एक ताल धरत हरिनामाचा गजर करून मोर्चाला वेगळीच रंगत आणली.मोदी सरकार चोर है....आ. यशोमती ठाकूर यांनी हुंकार भरत मोर्चात रंगत आणली. प्रश्नोत्तराच्या सुरात त्यांनी कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांकडून समस्या जाणून घेतल्यात. 'गली गली में शोर है, मोदी सरकार चोर है पासून मोदी सरकारचं करायचं काय, खाली मुंडकं वरती पाय, जयहिंद, शेतकरी उपाशी सरकार तुपाशी, अशा गगनभेदी घोषणा देत काँग्रेसजनांनी मोर्चा गाजवला.