शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

शालेय व्यवस्थापन समिती स्थापनेबाबत संभ्रम

By admin | Updated: October 1, 2014 23:16 IST

राज्यात विधानसभेची आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने यावर्षी स्थापन करण्यात येणाऱ्या शालेय व्यवस्थापन समितीसंदर्भात स्पष्ट निर्देश मिळाले नाही. त्यामुळे मुख्याध्यापकांसह शिक्षक संभ्रमावस्थेत आहेत.

अमरावती : राज्यात विधानसभेची आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने यावर्षी स्थापन करण्यात येणाऱ्या शालेय व्यवस्थापन समितीसंदर्भात स्पष्ट निर्देश मिळाले नाही. त्यामुळे मुख्याध्यापकांसह शिक्षक संभ्रमावस्थेत आहेत. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील भाग चार, कलम २१ नुसार प्रत्येक प्राथमिक शाळेत (विना अनुदानित वगळून) शाळा व्यवस्थापन समिती ३० सप्टेंबरपूर्वी स्थापन करणे अनिवार्य आहे. या समितीकडे शाळेच्या कामकाजाचे सनियंत्रण सोपविण्यात आले होते. ३० सप्टेंबर २०१० पूर्वी कार्यरत ग्राम शिक्षण समिती, वॉर्ड शिक्षण समिती, शालेय समितीच्या रचनेत बदल करुन नवीन शिक्षण कायद्याप्रमाणे शालेय व्यवस्थापन समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार पहिल्यांदा ३० सप्टेंबर २०१० मध्ये राज्यातील सर्व शाळांमध्ये शाळा व्यवस्थापन समिती अस्तित्वात आल्या. या समिती स्थापन करण्याची प्रक्रिया वेळखाऊ असून पालक ग्रामसभेद्वारे समिती स्थापन केली जाते. समितीचा कार्यक्रम दोन वर्षांचा आहे. त्यात ५० टक्के महिला सदस्यांसोबतच स्थानिक शिक्षण तज्ज्ञ स्थानिक प्राधिकरण सदस्यांचा समावेश असतो. ७५ टक्के सदस्य पालकांमधून निवडले जातात. समितीकडे शालेय विकास आराखडा तयार करणे, शाळेत आलेल्या निधीच्या विनियोगावर देखरेख, शालेय पोषण आहार, मुख्याध्यापकांची रजा मंजूर करणे या महत्वाच्या जबाबदाऱ्या आहेत.शालेय अवस्थापन समीत्या राज्यात पहिल्यांदा २०१० त्यानंतर २०१२ मध्ये अस्तीत्वात आल्या.यावर्षी राज्यातील सर्व शाळांमध्ये कार्यरत समित्यांचा कालावाधी ३० सप्टेंबर २०१४ ला संपली आहे. त्यापूर्वी नविन समित्या स्थापन करणे अनिवार्य आहे. परंतु राज्यात आचारसंहिता लागु असल्याने या समित्या स्थापन कराव्यात की नाही या संदर्भात शिक्षण विभागातर्फे कुठलेच निर्देश सुचना, आदेश न आल्याने सर्वत्र संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. निवडणुकीनंतर समिती स्थापन झाल्या तर पुढील समितीस दोन वर्षांपेक्षा कमी कालावधी प्राप्त होईल. त्यामुळे या संदर्भात तत्काळ निर्णय घ्यावा, अशी मागणी मुख्याध्यापकांनी केली आहे.