शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

बहुपक्षीय सदस्यांवर भिस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 22:10 IST

अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत विजयासमीप पोहचविणारे गठ्ठा मतदान कुणा एका पक्षाकडेच नसल्याने बहुपक्षीय सदस्यांवर उमेदवारांची भिस्त आहे.

ठळक मुद्देमहापालिकेत खलबते : जि.प., नगर पंचायतींवर लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत विजयासमीप पोहचविणारे गठ्ठा मतदान कुणा एका पक्षाकडेच नसल्याने बहुपक्षीय सदस्यांवर उमेदवारांची भिस्त आहे.२१ मे रोजी ही निवडणूक होऊ घातली आहे. विद्यमान आमदार प्रवीण पोटे यांनी शुक्रवारी नामांकन दाखल केले. विधानसभेतील भाजप आमदाराला बाजूला सारत पोटेंनी मंत्रिपद पटकावले. मागील चार वर्षांपासून ते राज्यमंत्री आहेत. भाजपने त्यांनाच उमेदवारी बहाल करून भूमिका स्पष्ट केली आहे. या मतदारसंघाची एकूण मतदारसंख्या ४८९ अशी आहे. यात महापालिकेतील ९२, १० नगर परिषदांमधील २४९ नगरसेवक, चार नगरपंचायतींतील ७५ सदस्य, अमरावती जिल्हा परिषदेतील ५९ व १४ पंचायत समिती सभापतींचा समावेश आहे. या मतदारसंघातून विजयी होण्यासाठी उमेदवाराला २४५ मते हवेत. हे गठ्ठा मतदान मिळविण्यासाठी उमेदवारांनी बहुपक्षीय सदस्यांच्या गाठीभेटीस भर दिला आहे.प्रवीण पोटे यांच्या रूपात भाजपने उमेदवार दिल्यानंतरही काँग्रेसच्या उमेदवाराचा शोध संपलेला नाही. त्यांनी नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व भाजप आमदारांच्या उपस्थितीत नामांकन दाखल केले. पाटलांच्या नामांकनानंतर विधान परिषद निवडणुकीचा ज्वर तापू लागला आहे. ४८९ एकूण मतदारांपैकी सर्वाधिक २०० मतदार भाजपकडे आहेत, तर काँग्रेसकडे १२८, शिवसेनेकडे २८, राष्टÑवादी काँग्रेसकडे ४०, प्रहारकडे १८, रिपाइंकडे ४, अपक्ष ३०, समाजवादी पार्टी १, एमआयएम १४, इतर आघाडी पक्षाकडे १ असे पक्षीय बलाबल आहे. यात भाजपकडे महापालिकेत ४८, तर नगरपालिकांमध्ये १२३ असे गठ्ठा मतदान आहे. नगर पंचायतीत ९, जिल्हा परिषदेत १४ व ६ सभापती आहेत. त्यापाठोपाठ काँग्रेस मनपात १६, नगरपालिकांमध्ये ५३, नगरपंचायतींमध्ये २९, जिल्हा परिषदेत २६, पंचायत समिती सभापती ४ आहेत. शिवसेना, राष्टÑवादी व अपक्षांची संख्या निर्णायक असल्याने बहुपक्षीय सदस्यांच्या भूमिकेवर विजयाचे गणित अवलंबून असेल.जिल्ह्यात राजकीय धुराळागतवर्षी जिल्हा परिषद, नगर परिषद, महापालिका निवडणुका झाल्यात. त्यात भाजपला बंपर यश मिळाले. त्यानंतर वर्षभर राजकीय क्षितिजावर शांतता होती. आता विधान परिषद निवडणुकीने राजकीय वातावरण तापले आहे. ४८९ सदस्यच मतदार असल्याने सर्वसामान्यांची निवडणूक जरी नसली तरी लोकप्रतिनिधींना त्यांच्यातून आमदार निवडून द्यावयाचा असल्याने जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत सदस्यांसह सभापतींचे भाव वधारले आहेत.