शहरं
Join us  
Trending Stories
1
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
2
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
3
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
4
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
5
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
6
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
7
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
8
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
9
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
10
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
11
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
12
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
13
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
14
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
15
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
16
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर
17
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
18
Viral Video: ट्रेनमधून प्रवास करताना कधीच 'अशी' चूक करू नका; जीवघेणी घटना कॅमेऱ्यात कैद!
19
Tulsi Vivah 2025 Wishes: तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Images, Whatsapp Status शेअर करून आमंत्रित करा आपल्या नातेवाईकांना
20
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार

बहुपक्षीय सदस्यांवर भिस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2018 22:10 IST

अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत विजयासमीप पोहचविणारे गठ्ठा मतदान कुणा एका पक्षाकडेच नसल्याने बहुपक्षीय सदस्यांवर उमेदवारांची भिस्त आहे.

ठळक मुद्देमहापालिकेत खलबते : जि.प., नगर पंचायतींवर लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत विजयासमीप पोहचविणारे गठ्ठा मतदान कुणा एका पक्षाकडेच नसल्याने बहुपक्षीय सदस्यांवर उमेदवारांची भिस्त आहे.२१ मे रोजी ही निवडणूक होऊ घातली आहे. विद्यमान आमदार प्रवीण पोटे यांनी शुक्रवारी नामांकन दाखल केले. विधानसभेतील भाजप आमदाराला बाजूला सारत पोटेंनी मंत्रिपद पटकावले. मागील चार वर्षांपासून ते राज्यमंत्री आहेत. भाजपने त्यांनाच उमेदवारी बहाल करून भूमिका स्पष्ट केली आहे. या मतदारसंघाची एकूण मतदारसंख्या ४८९ अशी आहे. यात महापालिकेतील ९२, १० नगर परिषदांमधील २४९ नगरसेवक, चार नगरपंचायतींतील ७५ सदस्य, अमरावती जिल्हा परिषदेतील ५९ व १४ पंचायत समिती सभापतींचा समावेश आहे. या मतदारसंघातून विजयी होण्यासाठी उमेदवाराला २४५ मते हवेत. हे गठ्ठा मतदान मिळविण्यासाठी उमेदवारांनी बहुपक्षीय सदस्यांच्या गाठीभेटीस भर दिला आहे.प्रवीण पोटे यांच्या रूपात भाजपने उमेदवार दिल्यानंतरही काँग्रेसच्या उमेदवाराचा शोध संपलेला नाही. त्यांनी नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व भाजप आमदारांच्या उपस्थितीत नामांकन दाखल केले. पाटलांच्या नामांकनानंतर विधान परिषद निवडणुकीचा ज्वर तापू लागला आहे. ४८९ एकूण मतदारांपैकी सर्वाधिक २०० मतदार भाजपकडे आहेत, तर काँग्रेसकडे १२८, शिवसेनेकडे २८, राष्टÑवादी काँग्रेसकडे ४०, प्रहारकडे १८, रिपाइंकडे ४, अपक्ष ३०, समाजवादी पार्टी १, एमआयएम १४, इतर आघाडी पक्षाकडे १ असे पक्षीय बलाबल आहे. यात भाजपकडे महापालिकेत ४८, तर नगरपालिकांमध्ये १२३ असे गठ्ठा मतदान आहे. नगर पंचायतीत ९, जिल्हा परिषदेत १४ व ६ सभापती आहेत. त्यापाठोपाठ काँग्रेस मनपात १६, नगरपालिकांमध्ये ५३, नगरपंचायतींमध्ये २९, जिल्हा परिषदेत २६, पंचायत समिती सभापती ४ आहेत. शिवसेना, राष्टÑवादी व अपक्षांची संख्या निर्णायक असल्याने बहुपक्षीय सदस्यांच्या भूमिकेवर विजयाचे गणित अवलंबून असेल.जिल्ह्यात राजकीय धुराळागतवर्षी जिल्हा परिषद, नगर परिषद, महापालिका निवडणुका झाल्यात. त्यात भाजपला बंपर यश मिळाले. त्यानंतर वर्षभर राजकीय क्षितिजावर शांतता होती. आता विधान परिषद निवडणुकीने राजकीय वातावरण तापले आहे. ४८९ सदस्यच मतदार असल्याने सर्वसामान्यांची निवडणूक जरी नसली तरी लोकप्रतिनिधींना त्यांच्यातून आमदार निवडून द्यावयाचा असल्याने जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत सदस्यांसह सभापतींचे भाव वधारले आहेत.