शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
4
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
5
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
6
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
7
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
8
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
9
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
10
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
11
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
12
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
13
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
14
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
15
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
16
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
17
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
18
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
19
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
20
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?

तंटामुक्त समित्या कागदावरच

By admin | Updated: February 26, 2016 00:27 IST

गावातील शांतता, सुव्यवस्था कायम राहून सौदार्याचे वातावरण राहावे व गावातील लहानसहान तंट्याचा गावातच निपटारा.

गावपातळीवरचे चित्र : थेट पोलीस ठाण्यांतच जातात तंटे, गुन्ह्यांचीही होते नोंदअमरावती : गावातील शांतता, सुव्यवस्था कायम राहून सौदार्याचे वातावरण राहावे व गावातील लहानसहान तंट्याचा गावातच निपटारा. होऊन नागरिकांना पोलीस ठाण्याची पायरी चढावी लागू नये म्हणून शासनाने प्रत्येक गावात तंटामुक्त समित्या गठित करण्यात आल्या हल्ली अनेक गावात लहानमोठ्या कारणावरुन निर्माण होणाऱ्या वादाच्या तक्रारी गावात न मिटता थेट पोलीस ठाण्यात जाऊन गुन्हा नोंदविला जात असल्याने शासनाच्या मूळ उद्देशालाच बगल दिला जात आहे. त्यामुळे तंटामुक्त समित्या कागदावरच अस्तित्वात असल्याचे चित्र सर्वत्र पाहायला मिळत आहे. गावपातळीवर सर्व समाज घटकांनी गुण्यागोविंदाने राहावे, आपसातील तंटे, गाव पातळीवरच निपटारा करुन गावात शांतता व सुव्यवस्था कायम रहावी व यामधून गावाची एकात्मिता कायम राहून गावाचा विकास साधला जावा, यासाठी शासनव्दारा प्रत्येक गावात महात्मा गांधी तंटामुक्ती राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत गावातील तंटे गावातच मिटवून सर्व धार्मिक उत्सव शांततेत पार पाडणाऱ्या गावांना लोकसंख्येनुसार बक्षीस दिले जाते. सुरुवातीला या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनेक वर्षांपासून न्यायप्रविष्ट असणारी प्रकरणे सामोपचाराने मिटवून निकाली काढण्यात आली. अनेक गावांना तंटामुक्ती संदर्भात बक्षीस मिळाले. मात्र अलिकडच्या काळात एक दोन वर्षात तंटामुक्त समिती पदाधिकाऱ्यांच्या निवडीत गावपातळीवर राजकारण घुसले, सक्षम नेतृत्व मिळाले नाही, पोलिसांचे देखील वेळोवेळी मार्गदर्शन नाही, यामुळे या समित्या कागदोपत्रीच अस्तित्वात असल्याचे दिसून येते. अगदी लहानसहान तक्रारी पोलीस ठाण्यापर्यंत जात असून गुन्हे नोंदविल्या जात आहे. पोलिसांनाही आर्थिक लाभ होत असल्याने वाद मिटविल्यापेक्षा गुन्हे नोंदविल्या जात असल्याचा आरोप होत आहे. यामुळे अनेक प्रकरणांचे पर्यावरण मोठ्या बखेड्यामध्ये झाल्याची कित्येक उदाहरणे पोलिसांनीदेखील सकारात्मक भूमिका घेतल्यास गावपातळीवर हे अभियान यशस्वी होऊ शकते. तसेच भविष्यात वाद निर्माण होऊ नये यासाठी स्थानिक तंटामुक्ती समित्यांनीदेखील सक्रीयतेने कार्यान्वित राहण्याची गरज आहे. (प्रतिनिधी)