शहरं
Join us  
Trending Stories
1
कुठल्याही वादापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज ठाकरेंचे संकेत; ६ जुलैला ठाकरे बंधू एकत्र येणार?
2
आयजीच्या जिवावर बायजी उदार...! ज्या रेअर मेटलवर चीनने बंदी आणलीय ते तो म्यानमारमधून आयात करतो
3
'पाणी सोडणार नाही, जे करायचे ते करा...', युद्धाची धमकी देणाऱ्या भुट्टोला भारताचे एका ओळीत उत्तर
4
'रोमान्स' पडला महागात! ४ मुलांच्या आईसोबत पकडलेल्या प्रियकराला गावकऱ्यांनी दिली धक्कादायक शिक्षा
5
गुजरातमध्ये आपला झटका! एक आमदार वाढत नाही तोच दुसरा सोडून गेला; मकवाना यांचा राजीनामा
6
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
7
दुचाकी वाहनांवर टोल आकारण्याचा कोणताही प्रस्ताव नाही; नितीन गडकरी यांचे स्पष्टीकरण
8
संयुक्त निवेदनावर स्वाक्षरीस नकार, राजनाथ सिंहांनी चीन, पाकिस्तानचा तो कुटील डाव पाडला हाणून, अशी आहे Inside story 
9
नौसेनेतील अधिकाऱ्याला पैशांची होती गरज, पाकिस्तानच्या आयएसआय एजंटने संपर्क साधला, देशासोबत गद्दारी केली
10
MNS Morcha: मोर्चाला कोण येणार नाही हेही मला बघायचंय; राज ठाकरेंची हिंदी सक्तीविरोधात भव्य मोर्चाची घोषणा
11
११ लाख देऊन आजीने घेतला फेसबुकवरुन भाऊ, पुढे जे घडलं ते धक्कादायक...!
12
२४ तास नव्हे, अवघ्या 'इतक्या' मिनिटांचा असतो अवकाशातील दिवस! किती वेळा दिसतो सूर्योदय?
13
स्नॅक्स बनवणारी कंपनी देणार एकावर एक फ्री शेअर! तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का? का घेतला निर्णय?
14
Air India Plane Crash: ब्लॅक बॉक्सच्या तपासात यश, डेटा झाला डाउनलोड; अपघाताचे कारण कधी समोर येणार?
15
चीन जगात खळबळ उडवणार! डासांसारखा दिसणारा ड्रोन आणणार, वाचा सविस्तर
16
इराण-इस्त्रायल युद्धातून भारताने घेतला धडा; आता 'ही' क्षमता दुप्पट करण्याची तयारी
17
नोकरीच्या पहिल्याच दिवशी दिला राजीनामा, कारण ऐकून HR भडकली, सोशल मीडियावर चॅट व्हायरल केली
18
'गुगल ताण देतो, देव ताण दूर करतो!' IIT चे बॅचमेट सुंदर पिचाई आणि गौरांग दास यांच्या भेटीत काय घडलं?
19
७२ वर्षांपूर्वी असं काय घडलं की, इराण आणि अमेरिका बनले एकमेकांचे कट्टर शत्रू?

जिल्हा परिषदेच्या चार कोटींच्या कामांवर गंडांतर

By admin | Updated: November 18, 2014 22:47 IST

आघाडी शासनाने निवडणुकीपूर्वी घाईने मंजूर केलेली जिल्ह्यातील ४ कोटी ७२ लाखांची विकास कामे तातडीने थांबविण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी

जितेंद्र दखने - अमरावतीअमरावती : आघाडी शासनाने निवडणुकीपूर्वी घाईने मंजूर केलेली जिल्ह्यातील ४ कोटी ७२ लाखांची विकास कामे तातडीने थांबविण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना केली आहे. ही सर्व कामे जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाशी संबंधित असून आतापर्यंत यातील वर्कआॅर्डर न मिळालेली ३ कोटींची कामे परत पाठविण्यात आली आहेत. वर्कआॅर्डर मिळालेल्या कामांचा अहवाल १५ नोव्हेंबरपर्यंत मागविण्यात आला होता. जी कामे अद्याप सुरू नाहीत तीही थांबविली जाणार आहेत. विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदारांना खुष करण्यासाठी माजी मुख्यमंत्री व माजी पालकमंत्र्यांनी जाता जाता जिल्ह्यात ४.७२ कोटींची विकास कामे मंजूर केली होती. निवडणुकीनंतर पुन्हा आघाडी सरकार येईल आणि हिवाळी अधिवेशनात या कामांना निधी मंजूर करून घेऊन तो डिसेंबरमध्ये उपलब्ध होईल, असा कयास त्यावेळी होता. प्रत्यक्षात आघाडी सरकारची सत्ता गेली आणि भारतीय जनता पक्ष सत्तेवर आले. माजी मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांनी घाईघाईने मंजूर केलेली कामे आता अडचणीत आली आहेत. आघाडी सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार कामे करण्यासाठी तब्बल पाच कोटी रूपये लागणार असल्याने ही कामे निधीअभावी थांबविण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला. जिल्ह्यात ४.७२ कोटीची कामे अंतिम टप्प्यात मंजूर केली होती.