शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
2
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
3
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
4
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
5
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
6
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
7
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
8
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
9
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
10
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
11
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
12
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
13
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
14
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
15
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
16
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
17
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
18
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
19
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
20
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!

डेल्टापेक्षा भयंकर विषाणूने वाढविली चिंता, जिल्ह्यात ९८ गावे लसवंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2021 05:01 IST

 ‘ओमायक्रॉन’ व्हेरिएंट असलेल्या कोरोना विषाणूचा संक्रमणदर डेल्टापेक्षा जास्त असल्याचे जास्त असल्याने लसीकरण हाच प्रभावी उपाय आहे. महिनाभरापासून जिल्ह्यात मिशन ‘कवचकुंडल’ व ‘हर घर दस्तक’ अभियान राबविण्यात येत आहे. त्यामुळे लसीकरणाचा टक्का वाढला आहे. ही मोहीम सध्या निरंतर सुरू राहण्याची आवश्यकता असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी झालेला असताना नवा व्हेरिएंट ‘ओमायक्रॉन’ने सर्वांची चिंता वाढविली आहे. राज्याला अलर्ट मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानद्वारे बैठकी घेतल्या जात आहेत. याशिवाय मंगळवारपासून काही नवे निर्बंध लागू केले आहेत. सध्या लसीकरणावर  अधिक भर दिला जात आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील ९८ गावे लसवंत झालेली आहेत. ‘ओमायक्रॉन’ व्हेरिएंट असलेल्या कोरोना विषाणूचा संक्रमणदर डेल्टापेक्षा जास्त असल्याचे जास्त असल्याने लसीकरण हाच प्रभावी उपाय आहे. महिनाभरापासून जिल्ह्यात मिशन ‘कवचकुंडल’ व ‘हर घर दस्तक’ अभियान राबविण्यात येत आहे. त्यामुळे लसीकरणाचा टक्का वाढला आहे. ही मोहीम सध्या निरंतर सुरू राहण्याची आवश्यकता असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. ओमायक्रॉनच्या धास्तीने दोन दिवसांत लसीकरणाची संख्या वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग कमी होताच नागरिकांची कोरोनाप्रति असलेली भीती काही प्रमाणात कमी झाली होती व याचा परिणाम लसीकरणावर झाल्याचे दिसून येते. १९६५ गावांपैकी ९८ गावांमध्ये १०० टक्के लसीकरण झाल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. सध्या लसीकरणाचा वाढलेला जोर पाहता, लवकरच बहुतेक गावांमध्ये किमान सर्व पात्र नागरिकांचा पहिला डोस पूर्ण होईल, अशी शक्यता आरोग्य विभागाने वर्तविली आहे.

रात्रीच्या वेळीदेखील लसीकरणशहरात रोज १५ ते १६ लसीकरण केंद्रे तसेच ३० पेक्षा अधिक शिबिरांद्वारे लसीकरण केले जात आहे. एखादे केंद्रांवर रात्री ११ पर्यंत लसीकरण केल्याची नोंद आहे. रात्रीच्या लसीकरणाला मनुष्यबळ कमी पडत असल्याने आरोग्य विभागाचा जोर सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेसाठी दिसून येत आहे.

शहरात शतप्रतिशत लसीकरण व्हावे, यासाठी प्रयत्न केले जात आहे. या मोहिमेत सर्वच विभागाचे अधिकारी व कर्मचारी काम करीत आहेत. नागरिकांचे सहकार्यदेखील मिळत आहे.- प्रशांत रोडेआयुक्त महापालिका

विदेशातून कुणी आले तर काय?- जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग व आरोग्य विभागाच्या मदतीने परदेशातून आलेल्या व्यक्तींची माहिती घेतली जाणार आहे. शासनाद्वारेही विदेशातून आलेल्या व्यक्तींची माहिती व नंबर दिला जाणार आहे. - अद्याप अशाप्रकारे कोणी व्यक्ती परदेशातून आल्याची माहिती अद्याप प्राप्त नसल्याचे प्रशासनाने सांगितले. नागरिकांनीदेखील परदेशातून कुणी व्यक्ती आल्यास प्रशासनाला माहिती देणे महत्त्वाचे आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या