शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
3
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
4
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
5
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
6
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
7
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
8
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
9
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
10
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
11
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
12
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
13
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
14
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

डेल्टापेक्षा भयंकर विषाणूने वाढविली चिंता, जिल्ह्यात ९८ गावे लसवंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2021 05:01 IST

 ‘ओमायक्रॉन’ व्हेरिएंट असलेल्या कोरोना विषाणूचा संक्रमणदर डेल्टापेक्षा जास्त असल्याचे जास्त असल्याने लसीकरण हाच प्रभावी उपाय आहे. महिनाभरापासून जिल्ह्यात मिशन ‘कवचकुंडल’ व ‘हर घर दस्तक’ अभियान राबविण्यात येत आहे. त्यामुळे लसीकरणाचा टक्का वाढला आहे. ही मोहीम सध्या निरंतर सुरू राहण्याची आवश्यकता असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले.

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी झालेला असताना नवा व्हेरिएंट ‘ओमायक्रॉन’ने सर्वांची चिंता वाढविली आहे. राज्याला अलर्ट मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनानद्वारे बैठकी घेतल्या जात आहेत. याशिवाय मंगळवारपासून काही नवे निर्बंध लागू केले आहेत. सध्या लसीकरणावर  अधिक भर दिला जात आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील ९८ गावे लसवंत झालेली आहेत. ‘ओमायक्रॉन’ व्हेरिएंट असलेल्या कोरोना विषाणूचा संक्रमणदर डेल्टापेक्षा जास्त असल्याचे जास्त असल्याने लसीकरण हाच प्रभावी उपाय आहे. महिनाभरापासून जिल्ह्यात मिशन ‘कवचकुंडल’ व ‘हर घर दस्तक’ अभियान राबविण्यात येत आहे. त्यामुळे लसीकरणाचा टक्का वाढला आहे. ही मोहीम सध्या निरंतर सुरू राहण्याची आवश्यकता असल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. ओमायक्रॉनच्या धास्तीने दोन दिवसांत लसीकरणाची संख्या वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग कमी होताच नागरिकांची कोरोनाप्रति असलेली भीती काही प्रमाणात कमी झाली होती व याचा परिणाम लसीकरणावर झाल्याचे दिसून येते. १९६५ गावांपैकी ९८ गावांमध्ये १०० टक्के लसीकरण झाल्याचे आरोग्य विभागाने सांगितले. सध्या लसीकरणाचा वाढलेला जोर पाहता, लवकरच बहुतेक गावांमध्ये किमान सर्व पात्र नागरिकांचा पहिला डोस पूर्ण होईल, अशी शक्यता आरोग्य विभागाने वर्तविली आहे.

रात्रीच्या वेळीदेखील लसीकरणशहरात रोज १५ ते १६ लसीकरण केंद्रे तसेच ३० पेक्षा अधिक शिबिरांद्वारे लसीकरण केले जात आहे. एखादे केंद्रांवर रात्री ११ पर्यंत लसीकरण केल्याची नोंद आहे. रात्रीच्या लसीकरणाला मनुष्यबळ कमी पडत असल्याने आरोग्य विभागाचा जोर सकाळी ९ ते सायंकाळी ५ या वेळेसाठी दिसून येत आहे.

शहरात शतप्रतिशत लसीकरण व्हावे, यासाठी प्रयत्न केले जात आहे. या मोहिमेत सर्वच विभागाचे अधिकारी व कर्मचारी काम करीत आहेत. नागरिकांचे सहकार्यदेखील मिळत आहे.- प्रशांत रोडेआयुक्त महापालिका

विदेशातून कुणी आले तर काय?- जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग व आरोग्य विभागाच्या मदतीने परदेशातून आलेल्या व्यक्तींची माहिती घेतली जाणार आहे. शासनाद्वारेही विदेशातून आलेल्या व्यक्तींची माहिती व नंबर दिला जाणार आहे. - अद्याप अशाप्रकारे कोणी व्यक्ती परदेशातून आल्याची माहिती अद्याप प्राप्त नसल्याचे प्रशासनाने सांगितले. नागरिकांनीदेखील परदेशातून कुणी व्यक्ती आल्यास प्रशासनाला माहिती देणे महत्त्वाचे आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या