शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
IND vs AUS : बढती मिळताच अय्यरनं टीम इंडियाला जिंकून दिली ट्रॉफी; घरच्या मैदानात कांगारुंची शिकार
5
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
6
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
7
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
8
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
9
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
10
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
11
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
12
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
13
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
14
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
15
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
16
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
17
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
18
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
19
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
20
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार

कापूस उत्पादकांवर चिंतेचे सावट

By admin | Updated: December 15, 2015 00:15 IST

वरुड तालुक्यात सततच्या नापिकीमुळे शेतकरी त्रस्त आहे. परंतु शेतीशिवाय पयार्य नसल्याने मिळेल तेथून कर्ज घेऊन पुन्हा नव्या आशेने शेती केली.

दरात घसरण : पांढऱ्या सोन्याची कडू कहाणी! वरुड : वरुड तालुक्यात सततच्या नापिकीमुळे शेतकरी त्रस्त आहे. परंतु शेतीशिवाय पयार्य नसल्याने मिळेल तेथून कर्ज घेऊन पुन्हा नव्या आशेने शेती केली. परंतु यावर्षी दिवाळीत दिव्याच्या वातीला कापूस तर राशीला धान्य नव्हते, तर आता कर्ज फेडण्यास घरात कापूस नाही. शेतीने दगा दिल्याने हिरवे स्वप्न भंगले असल्याने शेतकऱ्यांवर चिंतेचे सावट पसरले आहे. कापसाला भाव नसल्याने उत्पादन खर्चसुध्दा काढणे जड होत आहे. वरुड तालुका देश विदेशात प्रसिध्द आहे. सतत कधी ओला दुष्काळ, तर कधी कोरडा एवढ्यावरच हा प्रकोप थांबला नसून गारपिटीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. बहुगुणी संत्राचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र नैसर्गिक आपत्तीने संत्र्याचे पीक हातातून गेले. यंदा मृगात पावसाने दडी मारल्याने पिकांची पेरणी उशिरा झाली. तब्बल एक महिना उशिरा कपाशी, मिरची, तूर, ज्वारी सह आदी पिकांची लागवड करण्यात आली. सोयाबीननेसुध्दा दगा दिल्याने दिवाळीच्या राशीकरिता सोयाबीन घरात आले नाही. सोयाबीन उत्पादनामध्ये कमालीची घट झाल्याने सोयाबीन उत्पादकांना लाखोंचा फटका बसला. संत्रा आंबिया बहरसुध्दा गळाल्याने ५० ते ६० टक्के संत्रा उत्पादकांचे नुकसान झाले. मृगबहर आलाच नाही. यामुळे संत्रा उत्पादकांनासुध्दा मोठा फटका बसला. कपाशी, मिरचीचे पीकसुध्दा बुडाले, मिरचीवर कोकड्या रोगासह अज्ञात रोगाने थैमान घातल्याने शेकडो हेक्टर जमिनीतील मिरचीचे पीक बुडाले. त्यामुळे मिरची पीक नेस्तनाबूत झाले. लाखो रुपयांचा फटका मिरची उत्पादकांना बसला. पुन्हा शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा ठाकला आहे. यामुळे मार्चमध्ये कर्जाचा भरणा कसा करावा, हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. कापसाला पणन महासंघाकडून ४ हजार १०० रुपये तर खासगी व्यापारी सुध्दा तेवढाच भाव देत आहे. त्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांचे बुरे दिन सरू झाल्याची कुजबूज सुरू झाली आहे. नापिकी आणि भावात घसरण असल्याने कापूस उत्पादकांचे कंबरडे मोडले आहे. उत्पादन खर्चसुध्दा निघत नसल्याने कपाशीला शासनाने सात हजार रुपये प्रतिक्विंटल भाव द्यावा, अशी मागणी केली आहे.