शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प तोंडघशी पडले, कसले सीझफायर? इराणकडून इस्रायलवर मिसाईलचा वर्षाव; तिघांचा मृत्यू...
2
"मी विसरूनच गेलो होतो की..."; 'शतकवीर' केएल राहुलचा टीम मॅनेजमेंटला खोचक टोला?
3
Mumbai: मुंबईतील भांडूप परिसरात घराची भिंत कोसळली; दोन चिमुकल्यांसह वृद्ध महिला जखमी
4
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं निवडीसाठी डेडलाईन वाढवली, का घेतला निर्णय?
5
"आमचा देश शरणागती पत्करणाऱ्यातला नाही"; युद्धबंदीच्या घोषणेनंतर खामेनी यांचे मोठे विधान
6
दहशतवादाविरोधात चीन देणार भारताला साथ?; अजित डोवाल यांनी घेतली चिनी परराष्ट्र मंत्र्यांची भेट
7
Pune Railway Station: पुणे रेल्वे स्थानकाच्या नामांतरावरून वाद, राजकारण्यांची चढाओढ, कोणी काय मागणी केली? वाचा
8
धक्कादायक! एकतर्फी प्रेम, तरुणाचं लग्न, तरुणीने १२ राज्याच्या पोलिसांना लावले कामाला, अहमदाबाद विमान क्रॅश केल्याचा दावा
9
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
10
६० वर्ष इराणमधून व्यवसाय चालवायचं हे भारतीय औद्योगिक घराणं; आता आहे ब्रिटनचं सर्वात श्रीमंत कुटुंब
11
Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना
12
पंढरपूरला पुराचा धोका, उजनीतून भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेकचा विसर्ग
13
"मला भीती वाटतेय...", 'रामायण'मध्ये हनुमानाच्या भूमिकेबाबत सनी देओलचं वक्तव्य, म्हणाला...
14
Iran-Israel Ceasefire: इराणच्या हल्ल्यानंतर बंद केलेले कतारचे हवाई क्षेत्र पुन्हा सुरू; इंडिगोने दिली माहिती
15
बीड: पालकांचे पैसे वाचणार; गावातच शिकणाऱ्या विद्यार्थ्यांच्या घरची घरपट्टी, नळपट्टी माफ
16
Stock Market Today: 'या' वृत्तानं शेअर बाजारात उत्साह; ६३२ अंकांच्या तेजीसह सेन्सेक्स खुला, Midcap शेअर्समध्ये खरेदी
17
सौरव गांगुलीला अजूनही खटकते करियमधली 'ती' एक गोष्ट; निवृत्तीच्या १७ वर्षानंतर व्यक्त केल्या भावना
18
"...तरच आम्ही हल्ले थांबवू’’, युद्धविरामावर इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
19
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
20
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story

कापूस उत्पादकांवर चिंतेचे सावट

By admin | Updated: December 15, 2015 00:15 IST

वरुड तालुक्यात सततच्या नापिकीमुळे शेतकरी त्रस्त आहे. परंतु शेतीशिवाय पयार्य नसल्याने मिळेल तेथून कर्ज घेऊन पुन्हा नव्या आशेने शेती केली.

दरात घसरण : पांढऱ्या सोन्याची कडू कहाणी! वरुड : वरुड तालुक्यात सततच्या नापिकीमुळे शेतकरी त्रस्त आहे. परंतु शेतीशिवाय पयार्य नसल्याने मिळेल तेथून कर्ज घेऊन पुन्हा नव्या आशेने शेती केली. परंतु यावर्षी दिवाळीत दिव्याच्या वातीला कापूस तर राशीला धान्य नव्हते, तर आता कर्ज फेडण्यास घरात कापूस नाही. शेतीने दगा दिल्याने हिरवे स्वप्न भंगले असल्याने शेतकऱ्यांवर चिंतेचे सावट पसरले आहे. कापसाला भाव नसल्याने उत्पादन खर्चसुध्दा काढणे जड होत आहे. वरुड तालुका देश विदेशात प्रसिध्द आहे. सतत कधी ओला दुष्काळ, तर कधी कोरडा एवढ्यावरच हा प्रकोप थांबला नसून गारपिटीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. बहुगुणी संत्राचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र नैसर्गिक आपत्तीने संत्र्याचे पीक हातातून गेले. यंदा मृगात पावसाने दडी मारल्याने पिकांची पेरणी उशिरा झाली. तब्बल एक महिना उशिरा कपाशी, मिरची, तूर, ज्वारी सह आदी पिकांची लागवड करण्यात आली. सोयाबीननेसुध्दा दगा दिल्याने दिवाळीच्या राशीकरिता सोयाबीन घरात आले नाही. सोयाबीन उत्पादनामध्ये कमालीची घट झाल्याने सोयाबीन उत्पादकांना लाखोंचा फटका बसला. संत्रा आंबिया बहरसुध्दा गळाल्याने ५० ते ६० टक्के संत्रा उत्पादकांचे नुकसान झाले. मृगबहर आलाच नाही. यामुळे संत्रा उत्पादकांनासुध्दा मोठा फटका बसला. कपाशी, मिरचीचे पीकसुध्दा बुडाले, मिरचीवर कोकड्या रोगासह अज्ञात रोगाने थैमान घातल्याने शेकडो हेक्टर जमिनीतील मिरचीचे पीक बुडाले. त्यामुळे मिरची पीक नेस्तनाबूत झाले. लाखो रुपयांचा फटका मिरची उत्पादकांना बसला. पुन्हा शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा ठाकला आहे. यामुळे मार्चमध्ये कर्जाचा भरणा कसा करावा, हा प्रश्न शेतकऱ्यांपुढे आहे. कापसाला पणन महासंघाकडून ४ हजार १०० रुपये तर खासगी व्यापारी सुध्दा तेवढाच भाव देत आहे. त्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांचे बुरे दिन सरू झाल्याची कुजबूज सुरू झाली आहे. नापिकी आणि भावात घसरण असल्याने कापूस उत्पादकांचे कंबरडे मोडले आहे. उत्पादन खर्चसुध्दा निघत नसल्याने कपाशीला शासनाने सात हजार रुपये प्रतिक्विंटल भाव द्यावा, अशी मागणी केली आहे.