शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

गतिमानतेसाठी ई-आॅफिस संकल्पना महत्त्वाची

By admin | Updated: May 2, 2015 00:26 IST

प्रशिक्षणामुळे कामकाजात सुधारणा होते. गतिमानता येते, ...

विभागीय आयुक्त : संगणक प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटनअमरावती : प्रशिक्षणामुळे कामकाजात सुधारणा होते. गतिमानता येते, यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी ई-आॅफिस संकल्पना आत्मसात करावी, असे प्रतिपादन विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांनी केले.येथील सहसंचालक लेखा व कोषागारे विभागाच्यावतीने लेखा कोषभवन येथे आयोजिलेल्या संगणक प्रशिक्षण केंद्र व 'टेक डे' चे उद्घाटन विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजूरकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी उपस्थित होते. स्थानिक निधी लेखा सहसंचालक बी. व्ही. तांबडे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. राजूरकर म्हणाले की, शासनाची कामकाजातील पारदर्शकता आणि गतिमानता यावर विशेष भर आहे. यासाठी प्रशिक्षणावर भर देण्यात येत आहे. ई-आॅफिससंदर्भात बैठका होत आहेत. संपूर्ण कामकाज अद्यापही १०० संगणकांवर झालेले नाही. प्रशिक्षणामुळे कामकाजात सुधारणा होते. अर्थ विभागामुळे शासनाच्या सर्वच विभागात शिस्त आहे. त्यामुळे लेखा व कोषागारे विभाग हा महत्त्वाचा आहे. प्रशिक्षणासाठी वयाची आणि पदाची गरज नाही. सर्वांनीच संगणकाचे ज्ञान आत्मसात करावे आणि ई-आॅफिस संकल्पना आत्मसात करावी, असे आवाहन केले. लेखा कोषभवन इमारतीत प्रशिक्षणाच्या चांगल्या सोयी उपलब्ध आहेत. यासाठी महसूल विभागातील अधिकाऱ्यांनाही याठिकाणी प्रशिक्षण देण्यात यावे.सीईओ भंडारी यांनी लेखा व प्रशिक्षणाचे कामकाजातील महत्त्व सांगून सेवापुस्तके आॅनलाईन करण्याचा प्रयत्न करावा. काही ठिकाणी हा प्रयोग होत असून अशा कामाची गती वाढविण्याची त्यांनी गरज प्रतिपादित केली.सहसंचालक बी. व्ही. तांबडे म्हणाले की, येथे दर शुक्रवारी विना मोबदला दोन तास प्रशिक्षण देण्यात येते याचा सर्वांनी लाभ घ्यावा. प्रास्ताविकात सहसंचालक सुधाकर सिद्धेवाड म्हणाले की, आॅगस्ट २०१४ पासून या कार्यालयास प्रशिक्षण संस्था म्हणून घोषित केले आहे. याच कोषागारे, ५० उपकोषागारांमार्फत येणारा सर्व निधी आहारित केला जातो. जमेच्या बाजू सर्व कोषागारामार्फत होतात. मनुष्यबळाची अडचण असली तरी सर्व कोषागारांचे पेमेंट सीएमपीद्वारे होते. तसेच ३९ उप कोषागारांमार्फतही सीएमपीद्वारे पेमेंट होते. सर्वांनी सीएमपी करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले. या कार्यालयाकडून ११ प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आलेत. ७१४१४ निवृत्तीवेतन धारकांना १ तारखेस सीएमपीद्वारे पेमेंट करण्यात येते. सेवानिवृत्तांच्या अडचणी सोडविण्यासाठी कॉल सेंटर फॉर पेन्शनर्स उपक्रमही राबविला जातो. २४ तासांच्या आत आॅनलाईन तक्रार सोडविण्यात येते. (प्रतिनिधी)