शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
2
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
3
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
4
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
5
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
6
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
7
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
8
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण
9
“राज ठाकरेंच्या मविआतील सहभागावर अद्याप चर्चा नाही”; रमेश चेन्नीथला यांनी केले स्पष्ट
10
पोलीस अधिकाऱ्यानं चोरला ट्रेनमध्ये झोपलेल्या प्रवाशाचा मोबाईल, जवळ उभे असलेले फक्त बघतच राहिले; VIDEO व्हायरल
11
योगी सरकारमधील महिला मंत्र्यांच्या ताफ्याला मोठा अपघात, झाल्या गंभीर जखमी  
12
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
13
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
14
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
15
अंधश्रद्धेचा कळस! ११ वर्षे मूल नाही, मांत्रिकाची महिलेला मारहाण; पाजलं घाणेरडं पाणी, झाला मृत्यू
16
नाशिकच्या सिडकोत भर रस्त्यात वृद्धाचा खुन; दहा दिवसांत दुसरी घटना 
17
Sonu Sood : बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
18
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
19
'पंचायत'च्या प्रधानजींचे होते विवाहबाह्य संबंध, 'या' अभिनेत्याच्या पत्नीसोबत चाललं अफेअर
20
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?

संगणक प्रशिक्षणाचा जिल्हा परिषदेत खेळखंडोबा

By admin | Updated: July 9, 2015 00:23 IST

जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत ग्रामीण भागातील मुलींना दरवर्षी संगणक प्रशिक्षण दिले जाते.

स्थायी समिती सभा : प्रशासनाचा नाकर्तेपणा कारणीभूत असल्याचा आरोपअमरावती : जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत ग्रामीण भागातील मुलींना दरवर्षी संगणक प्रशिक्षण दिले जाते. मात्र सन २०१४/१५ मधील संबंधित विभागाकडून पुरता योजनेचा खेळखंडोबा करण्यात आल्याने ग्रामीण भागातील मुली प्रशिक्षणा पासून वंचित असल्याचा मुद्दा जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत बुधवारी सदस्य रविंद्र मुंदे यांनी रेटून अधिकाऱ्यांना धारेवर धरले.महिला व बालकल्याण विभागा तर्फे ग्रामीण भागातील मुलींना ‘ट्रिबल थ्री’ संगणक प्रशिक्षण देण्यासाठी मागील वर्र्षी जिल्हा परिषद निधी मधून सर्वसाधारण गटा करिता १३ लाख ७३ हजार, अनुसूचित जाती साठी ८ लाख ५० हजार, आणि अनुसुचित जमाती करिता ४ लाख या प्रमाणे सुमारे २५ लाख ७२ हजार रूपयाची तरतूद करण्यात आली होती. त्यानुसार सदर योजनेतून मार्च २०१५ पर्यत जिल्हा परिषद महिला व बालकल्याण विभागाने प्रशासकीय कारवाई करून मुलींना संगणक प्रशिक्षण देणे अनिवार्य असतांना तांत्रीक अडचणीचे कारण पुढे करीत महिला व बालकल्याण विभागाचे उममुख्यकार्यकारी अधिकारी कै लास घोडके यांनी ही प्रक्रिया या कालावधीत होऊ शकली नसल्याचे सभागृहात सांगितले. मात्र यानंतर ४ एप्र्रिल रोजी निविदा काढून प्रक्रिया केली असता त्यामध्येही अडचणी आल्याने प्रशिक्षण कालावधीचा अवधी निघून गेला असेही सांगितले. परंतु यावर सदस्य रविंद्र मुंदे, अभिजित ढेपे यांनी आक्षेप घेत अधिकाऱ्यांना कोंडीत पकडत जिल्हा निधीचा पैसा असतानाही सभागृहाची परवानगी पाहीजे होती. तर मागील दोन महिन्यात प्रशासनाने कारवाई का केली नाही, असा प्रश्न उपस्थित करीत अधिकाऱ्याला जाब विचारला. यावर अधिकारी समाधानकारक उत्तर देऊ न शकल्याने केवळ अधिकारी व प्रशासनाच्या चुकीनेच ग्रामीण भागातील शेतकरी व गोरगरीबांच्या मुली संगणक प्रशिक्षणापासून वंचित असल्याने दोषी अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी सभागृहात मुंदे यांनी केली . यावर सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश अध्यक्ष सतीश उईके यांनी सभेच्या सचिवांना दिलेत. यावेळी सभेत शालेय प्रवेशासाठी नामांकीत शाळाकडून शिक्षण शुल्काचे नावावर हजारो रूपये घेतले जात असल्याचा मुद्दा सुधीर सुर्यवंशी यांनी उपस्थित केला. दरम्यान अशा मनमानीपणे शुल्क वसुल करणाऱ्या शाळांवर कारवाई केली जाईल, असे आश्वासन शिक्षणाधिकारी पानझाडे यांनी सभागृहात दिले. यावेळी आरोग्य, शिक्षण, सिंचन, बांधकाम आदी विभागाच्या प्रश्नावरही वादळी चर्चा करण्यात झाली.यावेळी सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष सतीश उईके उपाध्यक्ष सतीश हाडोळे, सभापती गिरीष कराळे, अरूणा गोरले, सरीता मकेश्र्वर, काँग्रेसचे गटनेता बबलू देशमुख, सदस्य रवींद्र मुंदे, सुधीर सुर्यवंशी, प्रताप अभ्यंकर, अभिजित ढेपे, चित्रा डहाणे, खाते प्रमुख के. एम अहमद, कैलास घोडके, भाऊराव चव्हाण, उदय काथोडे, रंगराव काळे, नितीन भालेराव व पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उपस्थित होते.डिएचओंना सुनावले खडेबोलस्थायी समितीच्या सभेत धामक आरोग्य केंद्रातील अधिकारी व कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने रूग्णांची गैरसोय होत असल्याचा मुद्दा रवींद्र मुंदे यांनी उपस्थित केला. याबाबत आरोग्य सभापती तथा उपाध्यक्ष सतीश हाडोळे यांनी भ्रमणध्वनीवर माहिती दिली होती. यानुसार हाडोळे यांनी डीएचओ नितीन भालेराव यांना धामक येथे जाण्याची सूचना दिली होती. मात्र यानंतर आरोग्य अधिकारी दोन दिवसांनी या ठिकाणी गेल्याने पदाधिकारी यांच्या आदेशाची अशा प्रकारची अवहेलना करणे कितीपत योग्य आहे, असा सवाल करीत बबलू देशमुख यांनी डिएचओना खडेबोल सुनावले.