शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

संगणक परिचालकांचे कामबंद, ग्रामपंचायतीचे कामकाज ठप्प

By admin | Updated: April 11, 2015 00:20 IST

संपूर्ण देशात ई-पंचायत प्रकल्पामध्ये महाराष्ट्राला सलग तीन वर्षे प्रथम क्रमांक ठेवणारे राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये संग्राम कक्ष अंतर्गत काम करणारे..

समस्या : प्रलंबित वेतनासह मागण्या पूर्ण करण्याची मागणीअमरावती : संपूर्ण देशात ई-पंचायत प्रकल्पामध्ये महाराष्ट्राला सलग तीन वर्षे प्रथम क्रमांक ठेवणारे राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये संग्राम कक्ष अंतर्गत काम करणारे संगणक परिचालक हे विविध मागण्यासंदर्भात २३ मार्चपासून राज्यभरात आंदोलन करत आहे. आंदोलनात २७ हजार संगणक परिचालकांनी कामबंद आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटना यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवलेल्या निवेदनात म्हटले की, ३१ मार्च १५ ला संगणक कक्ष चालवणाऱ्या महाआॅनलाईन कंपनीचा करार समाप्त झाला. राज्य शासनाने याबाबत कोणताही ठोस निर्णय घेतला नाहीत. आम्ही आमच्या मागण्या न्याय मिळण्यासाठी लोकशाही पद्धतीने आंदोलन, मोर्चा व आमरण उपोषणे केलीत. त्या दरम्यान ग्रामविकास राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी धोरणात्मक निर्णय घेऊन संघटनेला विचारात घेतले जाईल, असे लेखी आश्वासन दिले होते. पण, अद्यापपर्यंत कोणताच विचार झाला नाही. उलट शासन संगणक परिचालकांबाबत उदासीनता दाखवत आहे. या गोष्टींचा फायदा घेत संबंधित कंपनीचे संगणक परिचालक अन्याय करीत आहे. तसेच आजपर्यंत कंपनीचे संचालक परिचालकांनी माहे आॅक्टोबर २०१४ पासून आजपर्यंतचे मानधन दिले नाही. संगणक परिचालकांवर व त्यांच्या परिवारावर उपासमारीची वेळ आलेली आहे. तसेच ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिवाचे पत्र असतानाही राज्यातील काही संगणक परिचालकांना अद्याप कामावर घेतले नाही. महाआॅनलाईनचा करार रद्द करून संगणक परिचालकांना शासन सेवेत घेणे, प्रकल्पाच्या सुरुवातीपासून मार्च २०१५ अखेरपर्यंत थकित असलेले संगणक परिचालकांना जाचक असलेली आॅर्डर रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर संगणक परिचालक संघटनेचे पदाधिकारी सहभागी झाले आहेत. (प्रतिनिधी)संगणक परिचालकांच्या मागण्या शासन व प्रशासन स्तरावर सोडविण्यासाठी पाठपुरावा केला जात आहे. मात्र याची दखल घेतली जात नसल्याने आंदोलन करावे लागत आहे- अमोल वाडी, कार्याध्यक्ष संगणक परिचालक संटघना.