शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

संगणकावरील दाखले बंधनकारक

By admin | Updated: May 31, 2014 23:09 IST

पंचायत प्रकल्पांतर्गत सुरू केलेल्या संग्राम केंद्रांतर्गत दिले जाणार्‍या दाखल्यांपैकी १९ दाखले संगणकावरीलच असणे ग्रामपंचायतींना बंधनकारक केले आहे. हस्तलिखित व छापील स्वरूपातील दाखले पूर्णत: बंद

शासनाचे आदेश : हस्तलिखित, छापील दाखले बंद, तीन दाखले मिळणार मोफतमोहन राऊत - अमरावतीपंचायत प्रकल्पांतर्गत सुरू केलेल्या संग्राम केंद्रांतर्गत दिले जाणार्‍या दाखल्यांपैकी १९ दाखले संगणकावरीलच असणे ग्रामपंचायतींना बंधनकारक केले आहे. हस्तलिखित व छापील स्वरूपातील दाखले पूर्णत: बंद करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. नवीन निर्णयानुसार पूर्वीचे आकारले जाणारे दर कमी करण्यात आले आहेत. तर १९ पैकी तीन दाखले मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला. ई-पंचायत प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यातील पंचायती राज संस्थांचे संगणकीकरण करण्यात आले. शासन व नागरिकांना द्यावयाच्या सेवा संग्राम केंद्रातून देण्याचा उद्देश त्यामध्ये ठेवण्यात आला. त्यानुसार सर्व दाखले संगणकाच्या माध्यमातून देण्याचा निर्णय २0११ मध्ये झाला. २0१२ च्या निर्णयानुसार दर आकारणी करून नागरिकांना आवश्यक दाखले संग्राम केंद्रातून दिले जाऊ लागले. मात्र त्यासाठी आकारण्यात येणारे शुल्क अधिक असल्याच्या तक्रारी होऊ लागल्या तर संग्राम केंद्रांची सुविधा असतानाही काही ग्रामपंचायतींमध्ये लेखी व छापील स्वरूपाचे दाखले देणे सुरु होते. याबाबतची दखल घेत शासनाने १ नोव्हेंबर २0१३ च्या निर्णयानुसार १९ दाखले संग्राम केंद्रातील संगणकावरून देणे बंधनकारक केले आहे. त्यासाठी आकारल्या जाणार्‍या पूर्वीच्या दरात बदल करून १६ दाखल्यांसाठी २0 रूपये दर आकारला आहे. तसेच दारिद्रय़रेषेखालील दाखला, हयातीचा दाखला तसेच वयाचा दाखला नि:शुल्क देण्याचा निर्णय झाला आहे. संग्राम केंद्रामार्फत दाखल्यांसाठी आवश्यक अद्ययावत दप्तर व अभिलेखे ग्रामसेवकांनी संगणक परिचालकास उपलब्ध करून द्यावे व नागरिकांना सर्व दाखले उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक यांच्यावर सोपविली आहे.