शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

संगणकावरील दाखले बंधनकारक

By admin | Updated: May 31, 2014 23:09 IST

पंचायत प्रकल्पांतर्गत सुरू केलेल्या संग्राम केंद्रांतर्गत दिले जाणार्‍या दाखल्यांपैकी १९ दाखले संगणकावरीलच असणे ग्रामपंचायतींना बंधनकारक केले आहे. हस्तलिखित व छापील स्वरूपातील दाखले पूर्णत: बंद

शासनाचे आदेश : हस्तलिखित, छापील दाखले बंद, तीन दाखले मिळणार मोफतमोहन राऊत - अमरावतीपंचायत प्रकल्पांतर्गत सुरू केलेल्या संग्राम केंद्रांतर्गत दिले जाणार्‍या दाखल्यांपैकी १९ दाखले संगणकावरीलच असणे ग्रामपंचायतींना बंधनकारक केले आहे. हस्तलिखित व छापील स्वरूपातील दाखले पूर्णत: बंद करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. नवीन निर्णयानुसार पूर्वीचे आकारले जाणारे दर कमी करण्यात आले आहेत. तर १९ पैकी तीन दाखले मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला. ई-पंचायत प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्यातील पंचायती राज संस्थांचे संगणकीकरण करण्यात आले. शासन व नागरिकांना द्यावयाच्या सेवा संग्राम केंद्रातून देण्याचा उद्देश त्यामध्ये ठेवण्यात आला. त्यानुसार सर्व दाखले संगणकाच्या माध्यमातून देण्याचा निर्णय २0११ मध्ये झाला. २0१२ च्या निर्णयानुसार दर आकारणी करून नागरिकांना आवश्यक दाखले संग्राम केंद्रातून दिले जाऊ लागले. मात्र त्यासाठी आकारण्यात येणारे शुल्क अधिक असल्याच्या तक्रारी होऊ लागल्या तर संग्राम केंद्रांची सुविधा असतानाही काही ग्रामपंचायतींमध्ये लेखी व छापील स्वरूपाचे दाखले देणे सुरु होते. याबाबतची दखल घेत शासनाने १ नोव्हेंबर २0१३ च्या निर्णयानुसार १९ दाखले संग्राम केंद्रातील संगणकावरून देणे बंधनकारक केले आहे. त्यासाठी आकारल्या जाणार्‍या पूर्वीच्या दरात बदल करून १६ दाखल्यांसाठी २0 रूपये दर आकारला आहे. तसेच दारिद्रय़रेषेखालील दाखला, हयातीचा दाखला तसेच वयाचा दाखला नि:शुल्क देण्याचा निर्णय झाला आहे. संग्राम केंद्रामार्फत दाखल्यांसाठी आवश्यक अद्ययावत दप्तर व अभिलेखे ग्रामसेवकांनी संगणक परिचालकास उपलब्ध करून द्यावे व नागरिकांना सर्व दाखले उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक यांच्यावर सोपविली आहे.