शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
2
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
3
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
4
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
5
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
6
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
7
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
8
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
9
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
10
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
11
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
12
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
13
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
14
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
15
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
16
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
17
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
18
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
19
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
20
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

अपूर्ण पाणीपुरवठा योजनेला पूर्णत्वाचे प्रमाणपत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2018 22:16 IST

पाणीपुरवठा योजनेतील सात कोटी रुपयांची कामे झालेली नसताना, ती योजना पूर्ण झाल्याची बतावणी करून त्याबाबत पूर्णत्वाचे प्रमाणपत्र पाठविण्यात आले. सबब, पालिका प्रशासनाने शासनाची दिशाभूल केल्याची तक्रार नगरसेविका शोभा मुगल यांनी नगर प्रशासन संचालनालयाच्या आयुक्तांकडे केली आहे.

ठळक मुद्देअचलपूर नगर पालिकेकडून दिशाभूलनगरसेविका शोभा मुगल यांची तक्रार

नरेंद्र जावरे ।लोकमत न्यूज नेटवर्कपरतवाडा : पाणीपुरवठा योजनेतील सात कोटी रुपयांची कामे झालेली नसताना, ती योजना पूर्ण झाल्याची बतावणी करून त्याबाबत पूर्णत्वाचे प्रमाणपत्र पाठविण्यात आले. सबब, पालिका प्रशासनाने शासनाची दिशाभूल केल्याची तक्रार नगरसेविका शोभा मुगल यांनी नगर प्रशासन संचालनालयाच्या आयुक्तांकडे केली आहे.केंद्र शासन पुरस्कृत एकात्मिक विकास योजनेंतर्गत सन २००६ मध्ये नगरपालिकेला जवळपास ४० कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर करण्यात आली. त्यामध्ये ३७ कोटी ५० लाख रुपये शासनाने मंजूर केले, तर उर्वरित रक्कम नगर परिषद निधीमधून खर्च करणे आवश्यक होते. मात्र, तसे न करता कर्मचारी निवासस्थान, पाण्याच्या टाकीला आवारभिंत, देवगाव येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या आवारभिंतीवर या योजनेतील निधी खर्च करण्यात आला, अशी तक्रार मुगल यांनी केली आहे. परतवाडा, अचलपूर या जुळ्या शहरांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या चंद्रभागा प्रकल्पावरील ही पाणीपुरवठा योजना सुरुवातीपासूनच भ्रष्टाचाराने पोखरल्याच्या अनेक तक्रारी करण्यात आल्या आहेत.यवतमाळ, वाशिमच्या अभियंत्यांकडून चौकशीकोट्यवधी रुपयांची पाणीपुरवठा योजना अपूर्ण असताना पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्र मार्च २०१८ मध्ये देण्याचा खटाटोप पालिकेच्या संबंधित अधिकाऱ्यांनी का केला, हे अनुत्तरित आहे. माहितीच्या अधिकारात अपीलमध्ये गेल्यानंतरच नगरसेविका शोभा मुगल यांना नगरपालिकेने पूर्णत्वाचे प्रमाणपत्र दिले.दुसरीकडे डीएमएकडे केलेल्या तक्रारीनंतर यवतमाळ येथील नगर अभियंता महेश जोशी व वाशिम येथील प्रफुल्ल सोनवणे यांची चौकशी समिती नेमण्यात आली होती. त्यांनी गत आठवड्यात दोन वेळा भेटी देऊन चौकशी केली. तेव्हा एक्स्प्रेस फीडरसह इतर कामे आढळून आली नसल्याची माहिती आहे.सात कोटींचा वाढीव निधी; कामे अपूर्णचशासनाने यूआयडीएसएसएमटी योजनेंतर्गत काही अपूर्ण कामे करण्यासाठी जवळपास सात कोटी रुपयांचे पूरक वाढीव अनुदान नगर परिषदेला दिले. मात्र, नगर परिषदेच्या अधिकाऱ्यांनी संगनमत करून योजनेतील कामे पूर्ण झाल्याचे कागदोपत्रीच दाखविले. या कामाचे मूळ अंदाजपत्रक मजीप्राने तयार केले होते. त्यास तांत्रिक मंजुरी प्रदान करण्यात आली होती. त्यानुसार वाढीव निधीमधून जलशुद्धीकरण एक्स्प्रेस फीडर, एरिया लायटिंग लावणे, बंधाऱ्यापासून जलशुद्धीकरणापर्यंत पाइप लाइन टाकणे, बंधाºयावर मोटर पंप बसविणे आदी कामे करणे बंधनकारक असताना, ती करण्यात आली नाही. यात अपहार झाल्याचे तक्रारीत नमूद असून, प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींविरुद्ध कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे