शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणमंत्र्यांविरुद्ध अमरावतीतील ‘त्या’ विद्यार्थ्यांची पोलिसांत तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2019 21:55 IST

विद्यार्थ्याच्या अटकेचे आदेश देणारे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी तक्रार युवराज दाभाडे आणि प्रशांत राठोड या विद्यार्थ्यांनी गुरुवारी येथील गाडगेनगर पोलीस ठाण्यात दिली.

ठळक मुद्देपुन्हा तापणार मुद्दाअखेरपर्यंत लढण्याचा निर्धार

गणेश देशमुखलोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : विद्यार्थ्याच्या अटकेचे आदेश देणारे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी तक्रार युवराज दाभाडे आणि प्रशांत राठोड या विद्यार्थ्यांनी गुरुवारी येथील गाडगेनगर पोलीस ठाण्यात दिली. या तक्रारीनंतर हा मुद्दा पुन्हा तापण्याचे संकेत आहेत.युवराज आणि प्रशांत हे अमरावती येथील श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. पत्रकारिता पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाला ते शिकत आहेत. महाविद्यालयीन कार्यक्रमादरम्यान ना. तावडे यांना मोफत उच्चशिक्षण लागू करण्याबाबत प्रशांत राठोड याने प्रश्न विचारला. तो न रुचल्यामुळे ना. तावडे यांनी प्रशांतला नोकरी करण्याचा सल्ला दिला. चित्रीकरण थांबविण्याचा आदेश देऊनही थांबविणार नाही, असे बाणेदार उत्तर दिल्यामुळे युवराजला अटक करण्याचे आदेश दिले गेले. पोलिसांनी युवराजला महाविद्यालय परिसरातच ताब्यात घेतले. नंतर पोलीस वाहनात बसवून नेले. यादरम्यान प्रशांतलादेखील काही पोलिसांनी पकडून ठेवले. युवराजचा मोबाइल पोलिसांनी जप्त केला. युवराजच्या अनुमतीशिवाय त्यातील ती महत्त्वपूर्ण चित्रफीत डिलीट केली. या संपूर्ण घटनेची तक्रार विद्यार्थ्यांनी यापूर्वीही पोलीस आयुक्तांकडे केली आहे. ‘लोकमत’ने यासंबंधी वृत्त सर्वप्रथम प्रसिद्ध केल्यानंतर देशभरातील माध्यमांनी ते उचलून धरले, हे येथे उल्लेखनीय.या कारणांसाठी करा गुन्हे दाखल!विद्यार्थ्याच्या अटकेचे आदेश देणे, दमदाटी करणे, मंत्र्यांनी अधिकाराचा गैरवापर करणे, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणे, बेकायदेशीररीत्या मोबाइल घेणे, परवानगीशिवाय त्यातील मजकूर डिलीट करणे, मंत्र्यांकडून विद्यार्थ्यांबाबत खोटे विधान करणे, त्यामुळे मानसिक त्रास आणि सामाजिक रोषाला बळी पडावे लागणे, शैक्षणिक व आर्थिक नुकसान झेलावे लागणे या कारणांसाठी शिक्षणमंत्र्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, असा आशय तक्रारीचा आहे. दरम्यान, तक्रार प्राप्त झाली आहे, चौकशी केली जाईल, अशी प्रतिक्रिया गाडगेनगरचे ठाणेदार मनीष ठाकरे यांनी ‘लोकमत’ला दिली.जिवाला धोका; पण लढणारच!आम्ही सराईत गुन्हेगार नाहीत, विद्यार्थी आहोत. पोलीस आयुक्तांना यापूर्वी तक्रार दिली. संस्थाध्यक्षांचीही भेट घेतली. त्यांनी काहीच केले नाही. आमच्यावर पाळत ठेवली जात आहे. धमक्या दिल्या जात आहेत. जीविताला धोका निर्माण झाला आहे. सत्तेविरुद्ध न्याय मागणे हे वाळूतून तेल काढण्याइतपत कठीण असल्याची प्रचिती आली आहे. तरीही अखेरपर्यंत लढण्याचा निर्धार आम्ही केला आहे, अशी प्रतिक्रिया युवराज आणि प्रशांत यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडे