शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

अ‍ॅपवर नोंदविता येणार स्वच्छतेविषयक तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2018 23:00 IST

गटर साफ नाही, कचरा उचलला नाही यांसारख्या तक्रारी करण्यासाठी आता महापालिकेत जाण्याची गरज नाही, तर स्वत:च्या मोबाइलवर क्षणात याची तक्रार करता येणार आहे. नगर विकास विभागाने एमओएचयूए अ‍ॅप विकसित केले आहे. ही नागरिकांसाठी मोठी उपलब्धी आहे. ही केंद्र शासनाची प्रणाली असल्याने तक्रारीचा निपटारा विहित कालावधीत करणे प्रशासनाही बंधनकारक आहे.

ठळक मुद्देनागरिकांसाठी उपलब्धी : नगर विकासने विकसित केले स्वच्छता एम.ओ.एच.यू.ए. अ‍ॅप

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : गटर साफ नाही, कचरा उचलला नाही यांसारख्या तक्रारी करण्यासाठी आता महापालिकेत जाण्याची गरज नाही, तर स्वत:च्या मोबाइलवर क्षणात याची तक्रार करता येणार आहे. नगर विकास विभागाने एमओएचयूए अ‍ॅप विकसित केले आहे. ही नागरिकांसाठी मोठी उपलब्धी आहे. ही केंद्र शासनाची प्रणाली असल्याने तक्रारीचा निपटारा विहित कालावधीत करणे प्रशासनाही बंधनकारक आहे.शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रशासनाची तेवढीच नागरिकांची आहे. गटार साफ नाही, कचरा उचलला नाही, सार्वजनिक शौचालय साफ नाही, अशा प्रकारच्या अनेक तक्रारींसाठी आता नागरिकांना महानगरपालिकेत जाण्याची गरज नाही. ही गैरसोय दूर होऊन तक्रार नोंदवणे आता अगदी सोपे झाले आहे. प्रत्येक नागरिक स्मार्ट फोनच्या साहाय्याने अगदी कुठूनही, क्षणार्धात विनासायास तक्रार नोंदवू शकतो.महानगरपालिकेच्या संबंधित कार्यालयाकडे ही तक्रार जाईल आणि तेथून संबंधित क्षेत्राच्या जबाबदार कर्मचाऱ्याकडे तात्काळ पाठविली जाईल. तोच कर्मचारी तक्रार निवारण करून, तक्रार असलेल्या जागेचा फोटो काढेल व पोस्ट करेल आणि तो संबंधित नागरिकांससुद्धा तात्काळ दिसेल. नागरिकांच्या स्वच्छतेच्या संदर्भातील तक्रारींचा निपटारा स्वच्छता अ‍ॅपद्वारे होऊ शकणार असल्याने शहर स्वच्छतेबाबत ही मोठी उपलब्धी ठरणार आहे. हे अ‍ॅप डाऊनलोड करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.अशी करता येईल तक्रारकेंद्र शासनाच्या नगरविकास खात्याने स्वच्छता एम.ओ.एच.यू.ए. अ‍ॅप विकसित केले आहे, जे वापरण्यास अगदी सुलभ आहे. मोबाइलमधील प्ले स्टोअरवर क्लिक करून स्वच्छता एम.ओ.एच.यू.ए. अ‍ॅप डाऊनलोड करा. त्यानंतर पसंतीची भाषा निवडून अ‍ॅप आपला मोबाइल नंबर मागेल त्या योग्य जागी नमूद करा. तुम्हाला लगेच ओ.टी.पी. मिळेल. त्यानंतर पहिली तक्रार पोस्ट करा व क्लिक करा.अस्वच्छतेचा फोटोही पाठविता येणारअस्वच्छतेबाबत जी तक्रार नोंदवायची आहे, त्या जागेचा फोटो काढा. सर्वसाधारणपणे आढळणाºया तक्रारी, जसे मृत प्राणी, कचºयाचा ढीग, कचरागाडी आली नाही, यातील जी तक्रार लागू असेल, त्यावर क्लिक करा. नंतर त्या परिसरातील स्थळ व क्लिक करा.नागरिकांनी जास्तीत जास्त स्वच्छता एम.ओ.एच.यू.ए. अ‍ॅप डाऊनलोड करून रजिस्ट्रेशन करा. तक्रारीवर समाधान झाल्यास लाईक करा. स्वच्छ भारत अभियानामध्ये सहभागी व्हावे.- संजय निपाणे, आयुक्त, महापालिका