शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

मोबदला धनादेशाने; अनादरणाने फसवणूक!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:13 IST

वनोजा बाग : शेतकऱ्यांच्या हलाखीचा गैरफायदा घेत त्यांच्याकडून माल घेऊन महिनोनमहिने पैसे रोखून त्रास देण्याचा प्रकारात अलीकडे ...

वनोजा बाग : शेतकऱ्यांच्या हलाखीचा गैरफायदा घेत त्यांच्याकडून माल घेऊन महिनोनमहिने पैसे रोखून त्रास देण्याचा प्रकारात अलीकडे चांगलीच वाढ झाली आहे.व्यापाऱ्यांविरुद्ध दोन-तीन प्रकरणे पोलीस ठाण्यात पोहोचली तरी शेतकऱ्यांना मात्र त्यांच्या धान्यादी मालाचा मोबदला मिळालेला नाही. त्याला आता व्यापाऱ्यांसोबतच पोलीस ठाणे व बाजार समितीचा उंबरठा झिजवावा लागत आहे. शेतकऱ्यांच्या धान्य व अन्य मालाचा मोबदला धनादेशाने द्यायचा, पुरेशी रक्कम नसल्याने तो बाऊन्स करवून घ्यायचा अन् नंतर शेतकऱ्यांना आपल्या मागे पुढे फिरवायचे, असा नवे प्रकार तालुक्यात कैकदा घडत आहेत.

दोन महिन्यांपूर्वी आकोट येथील पाच शेतकऱ्यांचे उमर जिनिंगच्या मालकाने थकवलेले पैसे बाजार समितीने मध्यस्थी करून मिळवून दिले. त्याला एक महिनाही पूर्ण होत नाही तोवर पुन्हा तालुक्यात त्याच कापूस व्यापाऱ्याने पुन्हा अकोट तालुक्यातीलच चार कापूस उत्पादक शेतकऱ्यांची ११ लाख १८ हजार ७२० रुपयांनी फसवणूक केल्याचे प्रकरण उघड झाले. बाजार समितीच्या वांधा कमिटीसमोर तक्रार दाखल करीत बाजार समिती व शेतकऱ्यांच्यावतीने अंजनगाव सुर्जी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. परंतु, पोलीस विभागातर्फे नेहमीप्रमाणे चौकशीचा फार्स सुरू आहे. फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला नाही. या व्यवहारात दोन्ही पक्ष एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करीत आहेत.

जिनिंग व्यवसायिकाच्या म्हणण्यानुसार, सदर तक्रारदार हे शेतकरी नसून, व्यापारी असल्याचे आरोप करीत आहेत. प्रत्यक्षात लहान व्यापारी गावातील गरजू शेतकऱ्यांकडून कापूस विकत घेतात. काही रक्कमही देतात. ते बड्या व्यापाऱ्यांना विकतात, हीदेखील वस्तुस्थिती आहे. मात्र, माल खरेदी केल्याच्या तारखेनंतर ‘पोस्ट डेटेड चेक’ देऊन प्रत्यक्षात त्या खात्यात पैसे न ठेवण्याचा उद्योग तालुक्यात भरभराटीस आला आहे. त्यात अनेक शेतकरी नाडवले जात आहेत. पोलीस मात्र चौकशीच्या नावावर वेळ दवडत असल्याचा आरोप होत आहे.