शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीची ३ लाख ६६ हजार ९१६ शेतकऱ्यांना भरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:15 IST

अमरावती : गत हंगामात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या जिल्ह्यातील ३ लाख ६६ हजार ९१६ शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपोटी शासनाकडून ३३७ ...

अमरावती : गत हंगामात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या जिल्ह्यातील ३ लाख ६६ हजार ९१६ शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपोटी शासनाकडून ३३७ कोटी ६ लक्ष रुपयांचे अनुदान अदा करण्यात आले. पालकमंत्री शोमती ठाकूर यांनी याकरिता पाठपुरावा केला आहे.

जून ते ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील पीक व फळबागांचे मोठे नुकसान झाले. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे तपशीलवार पंचनामे नोंदविण्याचे आदेश महसूल प्रशासनाला पालकमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार शासनाकडे अहवाल सादर करण्यात आला होता. जिल्ह्यातील बाधित गावांची संख्या १९०३ व शेतकऱ्यांची संख्या ३ लाख ६६ हजार ९१६ इतकी आहे. त्यानुसार जिल्ह्याला पहिल्या टप्प्यात १६८.५३ कोटी व दुसऱ्या टप्प्यात १६८.५३ कोटी अशी एकूण ३३७.०६ लक्ष रुपये अनुदान शासनाकडून वितरित करण्यात आले. त्यापैकी ३ लाख ३१ हजार ८९१ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा झाली आहे. उर्वरित रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

बॉक्स

अशी आहे मदत

अतिवृष्टी व पुरामुळे पीक व बहुवार्षिक पिकांचे नुकसान झाले. या बाधित शेतकऱ्यांना बागायती व सिंचनअंतर्गत प्रतिहेक्टरी १० हजार रुपये व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी प्रतिहेक्टर २५ हजार रुपये दराने दोन हेक्टरपर्यंत मदत शासनाने जाहीर केली. या मदतीचा पहिला हप्ता दिवाळीपूर्वीच जमा करण्यात आला. त्यानंतर दुसरा हप्ताही प्राप्त झाला.