शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
2
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
3
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
4
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
5
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
6
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
7
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
8
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
11
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
12
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
13
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
14
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
15
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
16
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
17
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
18
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
19
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन

अतिवृष्टीची ३ लाख ६६ हजार ९१६ शेतकऱ्यांना भरपाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 04:15 IST

अमरावती : गत हंगामात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या जिल्ह्यातील ३ लाख ६६ हजार ९१६ शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपोटी शासनाकडून ३३७ ...

अमरावती : गत हंगामात अतिवृष्टीने नुकसान झालेल्या जिल्ह्यातील ३ लाख ६६ हजार ९१६ शेतकऱ्यांना नुकसानभरपाईपोटी शासनाकडून ३३७ कोटी ६ लक्ष रुपयांचे अनुदान अदा करण्यात आले. पालकमंत्री शोमती ठाकूर यांनी याकरिता पाठपुरावा केला आहे.

जून ते ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टी व पुरामुळे जिल्ह्यातील पीक व फळबागांचे मोठे नुकसान झाले. अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचे तपशीलवार पंचनामे नोंदविण्याचे आदेश महसूल प्रशासनाला पालकमंत्र्यांनी दिले होते. त्यानुसार शासनाकडे अहवाल सादर करण्यात आला होता. जिल्ह्यातील बाधित गावांची संख्या १९०३ व शेतकऱ्यांची संख्या ३ लाख ६६ हजार ९१६ इतकी आहे. त्यानुसार जिल्ह्याला पहिल्या टप्प्यात १६८.५३ कोटी व दुसऱ्या टप्प्यात १६८.५३ कोटी अशी एकूण ३३७.०६ लक्ष रुपये अनुदान शासनाकडून वितरित करण्यात आले. त्यापैकी ३ लाख ३१ हजार ८९१ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा झाली आहे. उर्वरित रक्कम जमा करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

बॉक्स

अशी आहे मदत

अतिवृष्टी व पुरामुळे पीक व बहुवार्षिक पिकांचे नुकसान झाले. या बाधित शेतकऱ्यांना बागायती व सिंचनअंतर्गत प्रतिहेक्टरी १० हजार रुपये व बहुवार्षिक पिकांच्या नुकसानीसाठी प्रतिहेक्टर २५ हजार रुपये दराने दोन हेक्टरपर्यंत मदत शासनाने जाहीर केली. या मदतीचा पहिला हप्ता दिवाळीपूर्वीच जमा करण्यात आला. त्यानंतर दुसरा हप्ताही प्राप्त झाला.