शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांची नुकसान भरपाई द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:18 IST

वायएसपीची मागणी; आ.रवी राणा यांचे नेतुत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अमरावती : जिल्ह्यात सतत अतिवृषटीमुळे व पावसाने शेती पिकांचे मोठया प्रमाणात ...

वायएसपीची मागणी; आ.रवी राणा यांचे नेतुत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

अमरावती : जिल्ह्यात सतत अतिवृषटीमुळे व पावसाने शेती पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाने अनेक पिके करपली. जमीन खरडून गेली. घरांची पडझड झाली. गुरेही वाहून गेलेत. त्यामुळे या सर्व नुकसानाचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी गुरुवारी युवा स्वाभिमानच्यावतीने आमदार रवि राणा यांच्या नेतृत्वात शेतकरी व कार्यकर्त्यांनी केली. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांना देण्यात आले आहे.

गत काही दिवसांपासून अमरावती, भातकुली तालुक्यासह जिल्हाभरात पावसामुळे शेती पिकांचे, घराची पडझड आणि गुरेढोरेही वाहून गेली आहेत.याचा फटका शेतकरी व नागरिकांना बसला आहे.अनेक गावे जलमय झाले आहेत.या नुकसानामुळे अनेकांची कुटुंब उघड्यावर आली आहेत. त्यामुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानाचे तातडीने पंचनामे करून सरकट ३० हजार रूपये नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यात यावी. पुरात वाहून गेलेल्या कर्जाच्या ओझ्याने आत्महत्या केलेल्या शेतकरी व शेतमजुरांच्या कुटुंबांना शासनाने १० लाख रुपये मदत जाहीर करावी, अशी मागणी युवा स्वाभिमानने केली. यावेळी जिल्हाध्यक्ष जितू दुधाने, ज्याेती सैरीसे, मयुरी कावरे, दिनेश टेकाम, उमेश ढोणे, मीनल डकरे, रश्मी घुले, जया तेलखडे, प्रदीप थोरात, राजू रोडगे, मंगेश पाटील उपस्थित होते.