शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांची नुकसान भरपाई द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:18 IST

वायएसपीची मागणी; आ.रवी राणा यांचे नेतुत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन अमरावती : जिल्ह्यात सतत अतिवृषटीमुळे व पावसाने शेती पिकांचे मोठया प्रमाणात ...

वायएसपीची मागणी; आ.रवी राणा यांचे नेतुत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

अमरावती : जिल्ह्यात सतत अतिवृषटीमुळे व पावसाने शेती पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाने अनेक पिके करपली. जमीन खरडून गेली. घरांची पडझड झाली. गुरेही वाहून गेलेत. त्यामुळे या सर्व नुकसानाचे पंचनामे करून भरपाई द्यावी, अशी मागणी गुरुवारी युवा स्वाभिमानच्यावतीने आमदार रवि राणा यांच्या नेतृत्वात शेतकरी व कार्यकर्त्यांनी केली. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकारी पवनीत कौर यांना देण्यात आले आहे.

गत काही दिवसांपासून अमरावती, भातकुली तालुक्यासह जिल्हाभरात पावसामुळे शेती पिकांचे, घराची पडझड आणि गुरेढोरेही वाहून गेली आहेत.याचा फटका शेतकरी व नागरिकांना बसला आहे.अनेक गावे जलमय झाले आहेत.या नुकसानामुळे अनेकांची कुटुंब उघड्यावर आली आहेत. त्यामुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानाचे तातडीने पंचनामे करून सरकट ३० हजार रूपये नुकसान भरपाई शेतकऱ्यांना देण्यात यावी. पुरात वाहून गेलेल्या कर्जाच्या ओझ्याने आत्महत्या केलेल्या शेतकरी व शेतमजुरांच्या कुटुंबांना शासनाने १० लाख रुपये मदत जाहीर करावी, अशी मागणी युवा स्वाभिमानने केली. यावेळी जिल्हाध्यक्ष जितू दुधाने, ज्याेती सैरीसे, मयुरी कावरे, दिनेश टेकाम, उमेश ढोणे, मीनल डकरे, रश्मी घुले, जया तेलखडे, प्रदीप थोरात, राजू रोडगे, मंगेश पाटील उपस्थित होते.