शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
5
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
6
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
7
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
8
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
9
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
10
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
11
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
12
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
13
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
14
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
15
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
16
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
17
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
18
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
19
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
20
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?

अमरावतीला रोज १५ हजार लोकांसाठी कम्युनिटी किचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:13 IST

अमरावती : सामाजिक बांधिलकीच्या भावनेने लॉकडाऊन व नंतरच्या चार महिन्यांच्या काळात उद्भवलेल्या संकटकाळाची आता वर्षपूर्ती होत आहे. या काळात ...

अमरावती : सामाजिक बांधिलकीच्या भावनेने लॉकडाऊन व नंतरच्या चार महिन्यांच्या काळात उद्भवलेल्या संकटकाळाची आता वर्षपूर्ती होत आहे. या काळात जिल्ह्यातील तब्बल २८८ सामाजिक संस्थांनी निरपेक्ष भावनेने मदतीचा हात दिला. शिवाय महापालिका व अन्य सामाजिक संस्थांनी रोज १५ हजार लोकांसाठी कम्युनिटी किचन व काहींनी स्वतंत्रपणे मदतीचा हात दिला आहे.

कोरोना संकटकाळात २३ मार्चनंतरचे लॉकडाऊन व जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेला कर्फ्यू व कोरोना संसर्गाबाबत उडणाऱ्या वावड्या यामुळे हजारो नागरिक बेरोजगार अन् बेघर झाले. अशा विपरीत परिस्थितीत मदतीचे हजारो हात पुढे आलेत. काही संस्था स्वत:हून, तर काहींनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल व महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांच्या आवाहनानंतर मदतीसाठी हात पुढे केले होते.

जिल्हा सामान्य रुग्णालयात जलाराम ग्रूप, डॉ पंजाबराव देशमुख मेडीकल कॅालेजमध्ये रुग्ण व त्यांचे नातेवाईकांसाठी उमेेश पनपालिया, सिमेश श्रॉफ ग्रुप, जिल्हा स्त्री रुग्णालयात गुरुद्वारा समिती, भक्तीधाममध्ये जयेश राजा, महेश भवन येथे बालाजी ट्रस्ट मंदिर, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात हरिना फाऊंडेशन व रोटरी क्लब, बलगाव व अन्य ठकाणच्या बेघर कामगारांसाठी माहेश्वरीपंचायत, पोफली भवन येथे जेसीआय, सेल्टर होम येथे हॉटेल असोशिएशन तसेच ख्रिश्चन व मिशनरी अलायन्स येथे टी.एस लव्हाळे आदींच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात अन्नछत्र, दैंनंदिन वस्तू यासह बेघरांना निवारा व अन्य राज्यातील लोकांना त्यांच्या घरी पोहचविण्याची व्यवस्था करण्यात आली.

बॉक्स

हरिना फाऊंडडेशन

शहरात शिक्षणासाठी आलेल्या तेलंगना, आंध्र प्रदेशासह अन्य राज्यातील दोन हजारांवर विद्यार्थ्यांसाठी हरिना फाऊंडेरशनने मदतीचा हात दिला. विद्यार्थ्याचे होस्टेल व रुमवर दोन्ही वेळा अन्नाची पाकिटे देण्यात आली. गरजूंना दोन हजारांवर कीट व विद्यार्थ्यांना त्यांच्या राज्यात पोहचवून देण्यात आले.

बॉक्स

माहेश्वरी पंचायत

वलगाव तसेच दर्यापूर फाट्यावर अडकून पडलेले मजूर, पुनर्वसन पांढरी येथील अडकलेले मजूर यांना दोन्ही वेळच्या जेवणासह, शहरातील पीडीएमसी. इर्विन, दयासागर, सुपरस्पेशालिटी रुग्णालयात चहा, खिचडी याशिवाय रस्त्याने दिसणाऱ्या प्रत्येकाला जेवण पुरविण्याचे काम यासंस्थेने केले.

बॉक्स

गुरुद्वारा समिती

२२ मार्च ते ४ जुलै या काळात, जिल्हा स्त्री रुग्णालय व सुपरस्पेशालिटी रुग्णालयासह बिल्डींग कामावर अडकलेले कामगार यांच्या दोन्ही वेळच्या जेवणाची व्यवस्था, राजापेठ, बेलपुरा, झेंडा चौक या ठिकाणांसह झोपडपट्टी भागातील नागरिकांसह बडनेरा येथेही ५०० वर लोकांना अन्नदान करण्यात आले.