शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
2
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
3
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
4
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
5
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
6
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
7
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
8
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
9
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
10
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
11
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
12
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
13
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
14
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
15
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
16
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
17
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
18
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
19
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
20
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...

अमरावतीला रोज १५ हजार लोकांसाठी कम्युनिटी किचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:13 IST

अमरावती : सामाजिक बांधिलकीच्या भावनेने लॉकडाऊन व नंतरच्या चार महिन्यांच्या काळात उद्भवलेल्या संकटकाळाची आता वर्षपूर्ती होत आहे. या काळात ...

अमरावती : सामाजिक बांधिलकीच्या भावनेने लॉकडाऊन व नंतरच्या चार महिन्यांच्या काळात उद्भवलेल्या संकटकाळाची आता वर्षपूर्ती होत आहे. या काळात जिल्ह्यातील तब्बल २८८ सामाजिक संस्थांनी निरपेक्ष भावनेने मदतीचा हात दिला. शिवाय महापालिका व अन्य सामाजिक संस्थांनी रोज १५ हजार लोकांसाठी कम्युनिटी किचन व काहींनी स्वतंत्रपणे मदतीचा हात दिला आहे.

कोरोना संकटकाळात २३ मार्चनंतरचे लॉकडाऊन व जिल्हाधिकाऱ्यांनी जाहीर केलेला कर्फ्यू व कोरोना संसर्गाबाबत उडणाऱ्या वावड्या यामुळे हजारो नागरिक बेरोजगार अन् बेघर झाले. अशा विपरीत परिस्थितीत मदतीचे हजारो हात पुढे आलेत. काही संस्था स्वत:हून, तर काहींनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल व महापालिका आयुक्त प्रशांत रोडे यांच्या आवाहनानंतर मदतीसाठी हात पुढे केले होते.

जिल्हा सामान्य रुग्णालयात जलाराम ग्रूप, डॉ पंजाबराव देशमुख मेडीकल कॅालेजमध्ये रुग्ण व त्यांचे नातेवाईकांसाठी उमेेश पनपालिया, सिमेश श्रॉफ ग्रुप, जिल्हा स्त्री रुग्णालयात गुरुद्वारा समिती, भक्तीधाममध्ये जयेश राजा, महेश भवन येथे बालाजी ट्रस्ट मंदिर, हनुमान व्यायाम प्रसारक मंडळात हरिना फाऊंडेशन व रोटरी क्लब, बलगाव व अन्य ठकाणच्या बेघर कामगारांसाठी माहेश्वरीपंचायत, पोफली भवन येथे जेसीआय, सेल्टर होम येथे हॉटेल असोशिएशन तसेच ख्रिश्चन व मिशनरी अलायन्स येथे टी.एस लव्हाळे आदींच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात अन्नछत्र, दैंनंदिन वस्तू यासह बेघरांना निवारा व अन्य राज्यातील लोकांना त्यांच्या घरी पोहचविण्याची व्यवस्था करण्यात आली.

बॉक्स

हरिना फाऊंडडेशन

शहरात शिक्षणासाठी आलेल्या तेलंगना, आंध्र प्रदेशासह अन्य राज्यातील दोन हजारांवर विद्यार्थ्यांसाठी हरिना फाऊंडेरशनने मदतीचा हात दिला. विद्यार्थ्याचे होस्टेल व रुमवर दोन्ही वेळा अन्नाची पाकिटे देण्यात आली. गरजूंना दोन हजारांवर कीट व विद्यार्थ्यांना त्यांच्या राज्यात पोहचवून देण्यात आले.

बॉक्स

माहेश्वरी पंचायत

वलगाव तसेच दर्यापूर फाट्यावर अडकून पडलेले मजूर, पुनर्वसन पांढरी येथील अडकलेले मजूर यांना दोन्ही वेळच्या जेवणासह, शहरातील पीडीएमसी. इर्विन, दयासागर, सुपरस्पेशालिटी रुग्णालयात चहा, खिचडी याशिवाय रस्त्याने दिसणाऱ्या प्रत्येकाला जेवण पुरविण्याचे काम यासंस्थेने केले.

बॉक्स

गुरुद्वारा समिती

२२ मार्च ते ४ जुलै या काळात, जिल्हा स्त्री रुग्णालय व सुपरस्पेशालिटी रुग्णालयासह बिल्डींग कामावर अडकलेले कामगार यांच्या दोन्ही वेळच्या जेवणाची व्यवस्था, राजापेठ, बेलपुरा, झेंडा चौक या ठिकाणांसह झोपडपट्टी भागातील नागरिकांसह बडनेरा येथेही ५०० वर लोकांना अन्नदान करण्यात आले.