शहरं
Join us  
Trending Stories
1
Bihar Election 2025: बिहार निवडणुकीत प्रशांत किशोर यांच्या पक्षाला किती जागा? कुणाला बसणार फटक? समोर आला धक्कादायक सर्व्हे!
2
“३३ वर्षांनंतर महादेवीला न्याय, जिथे आहे तिकडे सुखरूप”; पेटा इंडियाचे समर्थन, मठाला सल्ला
3
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत
4
मालेगाव बॉम्बस्फोट: निर्दोष मुक्तता झालेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने दिली बढती, कर्नल पदावर केली नियुक्ती
5
ठरलं!! अश्विन भारताबाहेर पाकिस्तानी खेळाडूसोबत एकाच संघात, 'या' नंबरची जर्सी घालणार!
6
पुन्हा एकदा निराशा! गुंतवणूकदारांचे ३.२४ लाख कोटी बुडाले! 'या' कारणांमुळे बाजार धडाम
7
रोहितने ऑस्ट्रेलिया मालिकेआधी कमी केलं १० किलो वजन, फिटनेस पाहून भल्याभल्यांची 'बोलती बंद'
8
मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा...
9
VLF Mobster: इतकी स्वस्त की...; 'या' स्कूटरमुळं इतर दुचाकी निर्माता कंपन्यांना फुटला घाम!
10
२० दिवस अत्यंत धोक्याचे! मंगल-हर्षल षडाष्टक योग; घात-अपघातापासून कसे वाचावे?
11
आर्यन खानच्या 'द बॅड्स ऑफ बॉलिवूड'वर संतापले समीर वानखेडे, गौरी-शाहरूख खानविरोधात मानहानीचा खटला केला दाखल
12
VIRAL : भिंतीसारखं दिसणारं घर आतून आहे आलिशान; व्हिडीओ पाहून लोक थक्क, किंमत ऐकून धक्का बसेल!
13
नवरात्र २०२५: ५ कामे अवश्य करा, नैराश्य दूर होईलच, आनंद वाटेल; भाग्योदय, घरात शुभ तेच घडेल! 
14
‘आमदार फोडण्यासाठी, शक्तीपीठ महामार्गासाठी सरकारकडे पैसे आहेत पण…’, काँग्रेसची बोचरी टीका  
15
कर्जमुक्त होणे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य नव्हे! ३० वर्षीय तरुणाची 'ती' चूक, सीएने सांगितला मोठा धोका
16
फायद्याची गोष्ट! स्टील-अ‍ॅल्युमिनियम की लोखंड? स्वयंपाकासाठी कोणती भांडी सर्वात बेस्ट?
17
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
18
"आई माझ्या आयुष्यातली क्रिटिक...", शंतनू मोघेची प्रतिक्रिया, प्रियाच्या निधनानंतर मालिकेत कमबॅक
19
निवडणूक आयोगाने मतमोजणीबाबत घेतला मोठा निर्णय, आता पोस्टल बॅलेटनंतरच होणार EVM मधील मतांची मोजणी 
20
नाशिक होणार हायटेक सिटी! एनएमआरडीए २ हजार २३० चौ.किमीचा विकास आराखडा, सहा तालुक्यांचा समावेश

मालमत्ता करवसुलीवर आयुक्तांचा ‘सीआर’

By admin | Updated: April 9, 2017 00:06 IST

१ ते ३१ मार्च या कालावधीत विशेष करवसुली मोहीम राबवून १०० टक्के करवसुली करण्याचे निर्देश ‘सरकार’ने दिले होते.

२० एप्रिलनंतर ठरणार भवितव्य : प्रशासकीय कारवाईचे संकेतअमरावती : १ ते ३१ मार्च या कालावधीत विशेष करवसुली मोहीम राबवून १०० टक्के करवसुली करण्याचे निर्देश ‘सरकार’ने दिले होते. या कठीण परीक्षेत किती महापालिका यशस्वी झाल्यात, हे २० एप्रिलनंतर निश्चित होणार आहे. त्यावर संबंधित महापालिका आयुक्तांचा गोपनीय अहवाल ‘सीआर’ ठरणार आहे. अमरावती महापालिकेने ३१ मार्चअखेर ३०.३४ कोटी रूपये मालमत्ता कर वसूल केला. ही वसुली १ एप्रिल ते ३१ मार्च २०१७ या एका आर्थिक वर्षातील आहे. वसुलीची ही टक्केवारी ७२.९६ अशी आहे. मालमत्ता कराच्या पपीक्षेत महापालिकांनी पैकीच्या पैकी गुण मिळवावेत, अशी सक्त ताकिदच नगरविकास विभागाने १ मार्चला दिली होती. त्यात अमरावती महापालिका पहिल्या श्रेणीत आली असली तरी डिस्टींक्शन आणि पैकीच्या पैकी गुण मिळविण्यात अयशस्वी ठरली आहे. त्यामुळे ‘सरकार’च्या महसुली परीक्षेत उत्तीर्ण न होणाऱ्या महापालिकांवर नेमकी कुठली प्रशासकीय कारवाई केली जाते, याकडे संबंधित वर्तुळाचे लक्ष लागले आहे. उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत असलेल्या मालमत्ता कराची वसुली माघारल्याने ‘ड’ वर्ग महापालिकांना आर्थिक अरिष्ठातून जावे लागते. आस्थापना खर्चात झालेल्या बेसुमार वाढीमुळे प्रशासकीय प्रमुखांना आर्थिक गोळाबेरीज करताना नाकीनऊ येतात. मात्र विकासासाठी निधी आवश्यक असल्याने १०० टक्के कर वसुलीसाठी महापालिकांना यथार्थ नियोजन करण्याच्या सूचना नगरविकासने दिल्या होत्या. त्यासाठी एक महत्वाकांक्षी कार्यक्रमही आखून दिला. तथापि १०० टक्के उद्दीष्ठ गाठण्यात महापालिका यशस्वी ठरू शकली नाही. वारंवार बैठकी आणि विशेष शिबिर घेऊनही मालमत्ता कराची वसुली ३० कोटींपर्यंत मर्यादित राहिली. सर्व महापालिकांनी त्यांच्या कार्यक्षेत्रामध्ये ३१ मार्च २०१७ पर्यंत मालमत्ता कर व पाणीपट्टीच्या १०० टक्के वसुलीबाबत कसोशिने प्रयत्न करण्याचे निर्देश नगरविकासने दिले होते. (प्रतिनिधी)महापालिका आयुक्तांना बंधनकारकराज्यातील सर्व महापालिका आयुक्तांना २०१६-१७ साठी ‘की रिझल्ट एरिया’ नेमून देण्यात आला. यात महसूलवाढीसाठी केलेले विशेष प्रयत्न व आधीच्या वर्षाच्या तुलनेत महसुलात झालेली वाढ तसेच ९० टक्क्यांपेक्षा अधिक करवसुलीचे उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. सदर उद्दिष्ठाची पूर्तता करणे महापालिका आयुक्तांवर बंधनकारक आहे. असे होते नगरविकास मंत्रालयाचे निर्देश१ मार्च ते १० मार्च २०१७ या कालावधीत सर्व थकबाकीदार नागरिकांना थकबाकीची रक्कम भरण्याबाबत स्मरण देण्यात यावे, थकबाकीची रक्कम सक्तीच्या उपाययोजनांसह वसूल करताना संबंधित मोठ्या ३० टक्के थकबाकीदारांकडूनच थकीत रकमेची प्राधान्याने वसुली करावी, अन्यथा दंडनीय कारवाई करावी, वसुलीची प्रक्रिया ३१ मार्चअखेर पूर्ण होईल याची सर्व महापालिकांनी दक्षता घेण्याचे निर्देश होते. मालमत्ता कर महापालिकेच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत असल्याने व त्यावर महापालिकांचा आर्थिक डोलारा अवलंबून असल्याने कुठल्याही परिस्थितीत शंभर टक्क्यांचे उद्दीष्ट पूर्ण करण्याचे निर्देश नगरविकास विभागाने १ मार्चला दिले होते.अहवाल २० पर्यंत पाठविणे अनिवार्यनगरपरिषद प्रशासन संचालनालयाचे आयुक्त तथा संचालकांना विशेष वसुली मोहीम संपुष्टात आल्यानंतर संपूर्ण राज्याचा महापालिकानिहाय वसुलीचा एकत्रित अहवाल २० एप्रिलपर्यंत शासनास सादर करणे बंधनकारक आहे. त्यानंतर कमी वसुली करणाऱ्या महापालिकांवर कुठली कारवाई करायची, हे स्पष्ट केले जाणार आहे. वसुली मोहीम काही ठिकाणी अपयशीनागरी स्थानिक संस्थांच्या मालमत्ता कराची व थकबाकीची वसुली प्रभावीपणे झाल्यास त्यांची आर्थिक सक्षमता वाढण्यास व पर्यायाने नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यास मदत होईल. त्यादृष्टीने राज्यातील सर्व महापालिकांनी मालमत्ता व पाणीपट्टीसाठी १०० टक्के वसुलीसाठी विशेष मोहीम राबविली. मात्र त्यात अनेक महापालिका यशस्वी ठरू शकल्या नाहीत.