शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

काऊंटरवर या, सुवर्ण पदके घेऊन जा, ना कौतुक, ना सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:13 IST

अमरावती विद्यापीठाचा अजब-गजब कारभार, गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा पडला विसर अमरावती : महाविद्यालयांना दीक्षांत समारंभाची सक्ती करणारे संत गाडगेबाबा अमरावती ...

अमरावती विद्यापीठाचा अजब-गजब कारभार, गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा पडला विसर

अमरावती : महाविद्यालयांना दीक्षांत समारंभाची सक्ती करणारे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ गुणवंत विद्यार्थ्यांना मात्र काऊंटरवर उभे करून ३१ जुलै रोजी पदके व पारितोषिकांचे वितरण करणार आहे. विद्यापीठाच्यावतीने ना सोहळा, ना कौतुक, रांगेत या आणि पदके घेऊन जा, या आशयाचे पत्र जारी करण्यात आले आहे. त्यामुळे गुणवंतांच्या गुणवत्तेचा जणू विद्यापीठाला विसर पडल्याचे वास्तव आहे. दुसरीकडे ‘नॅक’ मूल्यांकनासाठी अधिकारी जोमाने तयारी करीत असल्याचे चित्र आहे.

विद्यापीठात कोरोनाचा बागुलबुवा करणारे अधिकारी हे अलीकडे सेवानिवृत्तांचा निरोप समारंभ आणि वाढदिवसाचे सेलिब्रेशन करण्यात गर्दी झाली तर चालते, मात्र कोरोना नियमांचे पालन करून गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करावा, यासाठी कुलगुरू, कुलसचिव, प्र-कुलगुरूंना वेळ नाही, असा कारभार सुरू आहे. त्यामुळेच पदके व पारितोषिकांचे मानकरी ठरलेल्या विद्यार्थ्यांना पत्र पाठविले आणि काऊंटरवर पदके व पारितोषिकांचे वितरण होणार, असे पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. ज्या गुणवंतांनी पाच ते सहा सुवर्णपदके, रौप्यपदके मिळविली, त्यांचा गौरव न करता केवळ काऊंटवर पदके वितरण करणे ही बाब त्या विद्यार्थ्यांसाठी क्लेषकारक आहे. विशेषत: पदके, पारितोषिकांच्या वितरणाबाबत प्रसिद्धी माध्यमांना दोन हात दूरच ठेवले आहे. पीएचडीपेक्षाही उच्च कर्तृत्व सिद्ध करणारे गुणवंत मात्र विद्यापीठाच्या या स्वार्थी व आडमुठ्या धोरणासमोर हतबल झाल्याचे वास्तव आहे. मुख्य म्हणजे, या न होणाऱ्या समारंभाची प्रभार असलेल्या विद्यमान कुलगुरूंना काहीच खबरबात नसल्याची चर्चा आहे. दीक्षांत समारंभाचा राहिलेला भाग उरकून टाकावा, या भावनेने सुवर्ण व रौप्य पदके ‘वाटपा’चा हा कार्यक्रम होणार आहे. विद्यापीठातील गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना गुणवत्तेशी काहीच घेणे देणे नसल्याचे पुनः सिद्ध झाले आहे.

-------------

कोरोना संसर्गामुळे दीक्षांत सोहळा घेता येणार नाही, हा निर्णय अगोदर झाला आहे. ३१ जुलै रोजी पदके, पारितोषिकांचे वितरण विद्यार्थ्यांना काऊंटरवरून करण्यात येणार आहे.

- तुषार देशमुख, कुलसचिव, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ

----------------

सुवर्ण, रौप्य पदके मिळविण्याचा क्षण हा मोजक्या विद्यार्थ्यांच्या वाट्याला येतो. त्यामुळे सभागृहात नियमांचे पालन करून गुणवंताचे कौतुक विद्यापीठाने करायलाच पाहिजे. अशा गुणवंताची संख्या बोटावर मोजण्याएवढीच असते. महाविद्यालयांना पदवी वितरणाची सक्ती कशासाठी केली जाते, यामागील कारण जाणून घेणेदेखील महत्त्वाचे आहे.

- प्रवीण रघुवंशी, अध्यक्ष, नुटा संघटना, अमरावती.