शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

काऊंटरवर या, सुवर्ण पदके घेऊन जा, ना कौतुक, ना सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:13 IST

अमरावती विद्यापीठाचा अजब-गजब कारभार, गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा पडला विसर अमरावती : महाविद्यालयांना दीक्षांत समारंभाची सक्ती करणारे संत गाडगेबाबा अमरावती ...

अमरावती विद्यापीठाचा अजब-गजब कारभार, गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा पडला विसर

अमरावती : महाविद्यालयांना दीक्षांत समारंभाची सक्ती करणारे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ गुणवंत विद्यार्थ्यांना मात्र काऊंटरवर उभे करून ३१ जुलै रोजी पदके व पारितोषिकांचे वितरण करणार आहे. विद्यापीठाच्यावतीने ना सोहळा, ना कौतुक, रांगेत या आणि पदके घेऊन जा, या आशयाचे पत्र जारी करण्यात आले आहे. त्यामुळे गुणवंतांच्या गुणवत्तेचा जणू विद्यापीठाला विसर पडल्याचे वास्तव आहे. दुसरीकडे ‘नॅक’ मूल्यांकनासाठी अधिकारी जोमाने तयारी करीत असल्याचे चित्र आहे.

विद्यापीठात कोरोनाचा बागुलबुवा करणारे अधिकारी हे अलीकडे सेवानिवृत्तांचा निरोप समारंभ आणि वाढदिवसाचे सेलिब्रेशन करण्यात गर्दी झाली तर चालते, मात्र कोरोना नियमांचे पालन करून गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करावा, यासाठी कुलगुरू, कुलसचिव, प्र-कुलगुरूंना वेळ नाही, असा कारभार सुरू आहे. त्यामुळेच पदके व पारितोषिकांचे मानकरी ठरलेल्या विद्यार्थ्यांना पत्र पाठविले आणि काऊंटरवर पदके व पारितोषिकांचे वितरण होणार, असे पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. ज्या गुणवंतांनी पाच ते सहा सुवर्णपदके, रौप्यपदके मिळविली, त्यांचा गौरव न करता केवळ काऊंटवर पदके वितरण करणे ही बाब त्या विद्यार्थ्यांसाठी क्लेषकारक आहे. विशेषत: पदके, पारितोषिकांच्या वितरणाबाबत प्रसिद्धी माध्यमांना दोन हात दूरच ठेवले आहे. पीएचडीपेक्षाही उच्च कर्तृत्व सिद्ध करणारे गुणवंत मात्र विद्यापीठाच्या या स्वार्थी व आडमुठ्या धोरणासमोर हतबल झाल्याचे वास्तव आहे. मुख्य म्हणजे, या न होणाऱ्या समारंभाची प्रभार असलेल्या विद्यमान कुलगुरूंना काहीच खबरबात नसल्याची चर्चा आहे. दीक्षांत समारंभाचा राहिलेला भाग उरकून टाकावा, या भावनेने सुवर्ण व रौप्य पदके ‘वाटपा’चा हा कार्यक्रम होणार आहे. विद्यापीठातील गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना गुणवत्तेशी काहीच घेणे देणे नसल्याचे पुनः सिद्ध झाले आहे.

-------------

कोरोना संसर्गामुळे दीक्षांत सोहळा घेता येणार नाही, हा निर्णय अगोदर झाला आहे. ३१ जुलै रोजी पदके, पारितोषिकांचे वितरण विद्यार्थ्यांना काऊंटरवरून करण्यात येणार आहे.

- तुषार देशमुख, कुलसचिव, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ

----------------

सुवर्ण, रौप्य पदके मिळविण्याचा क्षण हा मोजक्या विद्यार्थ्यांच्या वाट्याला येतो. त्यामुळे सभागृहात नियमांचे पालन करून गुणवंताचे कौतुक विद्यापीठाने करायलाच पाहिजे. अशा गुणवंताची संख्या बोटावर मोजण्याएवढीच असते. महाविद्यालयांना पदवी वितरणाची सक्ती कशासाठी केली जाते, यामागील कारण जाणून घेणेदेखील महत्त्वाचे आहे.

- प्रवीण रघुवंशी, अध्यक्ष, नुटा संघटना, अमरावती.