शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांनो काळजी घ्या! पुढील २४ तासांसाठी पावसाचा रेडअलर्ट, हवामान खात्याचा इशारा
2
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
3
इराणच्या हल्ल्यात इस्त्रायली एअर डिफेन्स फेल; मित्राची झाली आठवण, भारताला आला कॉल, आता...
4
जगाला हादरवणारी बातमी! इराणने इस्रायलचा शेअर बाजार उडवला; तुमच्या गुंतवणुकीवर काय परिणाम होणार?
5
Rain Update: रायगडमधील तीन नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी, तीन पर्यटन ठिकाणी जाण्यास बंदी
6
...तर अमेरिका किम जोंग उन यांच्या देशावर अणुबॉम्ब टाकेल; यांनी केला मोठा दावा
7
₹८,००० कोटींची गुंतवणूक... अंबानींनी केली Coca-Cola आणि Pepsi ला टक्कर देण्याची तयारी; काय आहे प्लान?
8
मुंबई, रायगड, रत्नागिरी जिल्ह्यासह पुणे घाट, सातारा घाट परिसरात 24 तासांसाठी ऑरेंज अलर्ट
9
धक्कादायक! "लग्न ठरल्यानंतर सोनम दिवसातून फक्त..."; राजा रघुवंशीच्या मित्राचा मोठा खुलासा
10
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
11
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर: १० राशी मालामाल, इच्छापूर्ती काळ; अचानक पैसे मिळतील, चांगले घडेल!
12
Video: इलॉन मस्क यांना मोठा धक्का; प्रक्षेपणादरम्यान SpaceX च्या स्टारशिप रॉकेटमध्ये स्फोट
13
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
14
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
15
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
16
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
18
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
19
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
20
Air India Plane Crash Insurance Claim : अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?

काऊंटरवर या, सुवर्ण पदके घेऊन जा, ना कौतुक, ना सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:13 IST

अमरावती विद्यापीठाचा अजब-गजब कारभार, गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा पडला विसर अमरावती : महाविद्यालयांना दीक्षांत समारंभाची सक्ती करणारे संत गाडगेबाबा अमरावती ...

अमरावती विद्यापीठाचा अजब-गजब कारभार, गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा पडला विसर

अमरावती : महाविद्यालयांना दीक्षांत समारंभाची सक्ती करणारे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ गुणवंत विद्यार्थ्यांना मात्र काऊंटरवर उभे करून ३१ जुलै रोजी पदके व पारितोषिकांचे वितरण करणार आहे. विद्यापीठाच्यावतीने ना सोहळा, ना कौतुक, रांगेत या आणि पदके घेऊन जा, या आशयाचे पत्र जारी करण्यात आले आहे. त्यामुळे गुणवंतांच्या गुणवत्तेचा जणू विद्यापीठाला विसर पडल्याचे वास्तव आहे. दुसरीकडे ‘नॅक’ मूल्यांकनासाठी अधिकारी जोमाने तयारी करीत असल्याचे चित्र आहे.

विद्यापीठात कोरोनाचा बागुलबुवा करणारे अधिकारी हे अलीकडे सेवानिवृत्तांचा निरोप समारंभ आणि वाढदिवसाचे सेलिब्रेशन करण्यात गर्दी झाली तर चालते, मात्र कोरोना नियमांचे पालन करून गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करावा, यासाठी कुलगुरू, कुलसचिव, प्र-कुलगुरूंना वेळ नाही, असा कारभार सुरू आहे. त्यामुळेच पदके व पारितोषिकांचे मानकरी ठरलेल्या विद्यार्थ्यांना पत्र पाठविले आणि काऊंटरवर पदके व पारितोषिकांचे वितरण होणार, असे पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. ज्या गुणवंतांनी पाच ते सहा सुवर्णपदके, रौप्यपदके मिळविली, त्यांचा गौरव न करता केवळ काऊंटवर पदके वितरण करणे ही बाब त्या विद्यार्थ्यांसाठी क्लेषकारक आहे. विशेषत: पदके, पारितोषिकांच्या वितरणाबाबत प्रसिद्धी माध्यमांना दोन हात दूरच ठेवले आहे. पीएचडीपेक्षाही उच्च कर्तृत्व सिद्ध करणारे गुणवंत मात्र विद्यापीठाच्या या स्वार्थी व आडमुठ्या धोरणासमोर हतबल झाल्याचे वास्तव आहे. मुख्य म्हणजे, या न होणाऱ्या समारंभाची प्रभार असलेल्या विद्यमान कुलगुरूंना काहीच खबरबात नसल्याची चर्चा आहे. दीक्षांत समारंभाचा राहिलेला भाग उरकून टाकावा, या भावनेने सुवर्ण व रौप्य पदके ‘वाटपा’चा हा कार्यक्रम होणार आहे. विद्यापीठातील गलेलठ्ठ पगार घेणाऱ्या एका उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना गुणवत्तेशी काहीच घेणे देणे नसल्याचे पुनः सिद्ध झाले आहे.

-------------

कोरोना संसर्गामुळे दीक्षांत सोहळा घेता येणार नाही, हा निर्णय अगोदर झाला आहे. ३१ जुलै रोजी पदके, पारितोषिकांचे वितरण विद्यार्थ्यांना काऊंटरवरून करण्यात येणार आहे.

- तुषार देशमुख, कुलसचिव, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ

----------------

सुवर्ण, रौप्य पदके मिळविण्याचा क्षण हा मोजक्या विद्यार्थ्यांच्या वाट्याला येतो. त्यामुळे सभागृहात नियमांचे पालन करून गुणवंताचे कौतुक विद्यापीठाने करायलाच पाहिजे. अशा गुणवंताची संख्या बोटावर मोजण्याएवढीच असते. महाविद्यालयांना पदवी वितरणाची सक्ती कशासाठी केली जाते, यामागील कारण जाणून घेणेदेखील महत्त्वाचे आहे.

- प्रवीण रघुवंशी, अध्यक्ष, नुटा संघटना, अमरावती.