शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

शंभर रुपयांत कलेक्टर तर तलाठ्यासाठी हजार रुपये का? शासनाच्या खासगीकरण, कंत्राटीकरणा विरोधात विद्यार्थ्यांचा ‘आगाज मूक मोर्चा’

By उज्वल भालेकर | Updated: October 12, 2023 20:24 IST

राज्य सरकारच्या कंत्राटी नोकरभरतीच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त होत आहे.

अमरावती: राज्य सरकारच्या कंत्राटी नोकरभरतीच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर संताप व्यक्त होत आहे. सरकारच्या खासगीकरण आणि कंत्राटीकरणा विरोधात गुरुवारी संत गाडगेबाबा मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘आगाज मूक मोर्चा’ काढण्यात आला. यावेळी शेकडोच्या संख्येत विद्यार्थी या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते. जर शंभर रुपयाच्या शुल्कामध्ये कलेक्टर होता येते तर मग तलाठीसाठी हजार रुपयांचे शुल्क का असा संप्तत सवालही पोस्टरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी उपस्थित केला.

प्रत्येक पालकाला आपला मुलगा आपली मुलगी ही शासकीय सेवेत रुजु व्हावी अशी इच्छा असते. परंतु दिवसेंदिवस वाढत असलेल्या खासगीकरणामुळे शासकीय नोकऱ्यांचे प्रमाण हे कमी झाले आहे. अशातच आता राज्य सरकारने कंत्राटी पद्धतीने अधिकारी-कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय घेत ६ सप्टेंबरला या संदर्भातील शासननिर्णय देखील काढला आहे. त्यामुळे सरकारच्या या निर्णयाविरोधात राज्यभरातून सरकारी नोकरीसाठी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे गुरुवारी संत गाडगे बाबा मंदीर प्रांगण ते पंचवटी, आरटीओ मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर विदर्भ स्पर्धा परीक्षा शिक्षक, विद्यार्थी संघ कृती समितीच्या वतीने ‘आगाज मुक मोर्चा’ काढण्यात आला. यावेळी शेकडोच्या संख्येने विद्यार्थी या आंदोलनात सहभागी झाले होते. त्यामुळे गाडगे नगर परिसरामध्ये काहीवेळा करीता वाहतूक कोंडीही झाली होती. यावेळी विद्यार्थ्यांच्या हातामध्ये असलेल्या पोस्टरमधून त्यांचे प्रश्न सरकारपुढे मांडण्यात आले होते. यावेळी कृती समितीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांची भेट घेत विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. 

टॅग्स :Amravatiअमरावती