शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
2
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
3
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
4
बिहारमध्ये कुणाचं सरकार, भाजपाला किती जागा मिळणार?; समोर आला ताजा सर्व्हे, वाचा
5
दुबार मतदार दिसले तर तिथेच फोडून काढायचे; राज ठाकरे यांचा घणाघात, पडदा हटवला, पुरावे दाखवले
6
MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’च्या निमित्ताने संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण झाली: शरद पवार
7
Crime: घरात एकटीच होती प्रेयसी, प्रियकर भेटायला गेला, तेवढ्यात आला भाऊ अन्...शेवट भयंकर!
8
प्रीमियम लूक, ड्युअल स्क्रीन, ५००किमी रेंज; तयार रहा मारुतीची पहिली इलेक्ट्रिक एसयुव्ही येतेय!
9
गौरी खानचं 'टोरी' रेस्टॉरंट : ₹१५०० चे मोमोज, ₹११०० चं सॅलड; मॅश बटाट्याची किंमत ऐकून अवाक् व्हाल
10
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहाची तयारी कशी करावी? वाचा तारीख, मुहूर्त, आरती आणि पूजाविधी 
11
रोहित आर्याबाबत मोठा खुलासा! कोथरुडचा घरमालक उलटे १.७५ लाख द्यायला तयार झालेला; शेवटी...
12
मारुतीच्या 'या' SUV नं स्पर्धकांचं टेन्शन वाढवलं, मिळाली 5 स्टार सेफ्टी रेटिंग; ASEAN NCAP क्रॅश टेस्टमध्ये केली कमाल
13
जीएसटी कपात, दसरा अन् दिवाळी; ऑक्टोबरमध्ये पडला 'वाहनांचाही पाऊस'! महिंद्रा, ह्युंदाई, टाटानेच नाही तर स्कोडानेही...
14
दोस्तीतच कुस्ती! ६ महिन्यांपूर्वी लग्न झाले, ५ मिनिटांत घरी पोहोचणार होता; पण रस्त्यातच मित्रांनी संपवले
15
जबरदस्त शक्तीप्रदर्शन होणार...! एकाचवेळी ५५ देश आपल्या युद्धनौका भारताच्या समुद्रात पाठविणार; नौदलाने हुंकार भरला...
16
8th Pay Commission: फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय रे भाऊ? नवीन वेतन कसं ठरणार? जाणून घ्या
17
Retirement: स्टार खेळाडूनं चाहत्यांना दिला मोठा धक्का, अचानक केली निवृत्तीची घोषणा!
18
प्रबोधिनी एकादशी २०२५: देवउठनी एकादशीला विष्णू खरोखरच ४ महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात का?
19
"नरेंद्र मोदींची छाती ११२ इंचाची, अवघ्या ५ तासांत पूर्ण पाकिस्तानवर कब्जा केला असता, पण..."
20
पाच वर्षांत अफाट परतावा देणारे शेअर्स कोणते, गुंतवणूकदारांसाठी संकेत काय? तुमच्याकडे आहे का?

३८२ महाविद्यालयांतून समन्वयकपद रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 01:13 IST

परीक्षा, निकाल, नामांकन आदी शैक्षणिक बाबींविषयीच्या विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयात तीन वर्षांपूर्वी समन्वयकपदांची निर्मिती करण्यात आली. मात्र, परीक्षेशी निगडित विषयांवर समन्वयक म्हणून काम पाहणारे प्राध्यापक अपयशी ठरले आहे.

ठळक मुद्देपरीक्षा व मूल्यमापन मंडळाचा निर्णय : कुचकामी ठरल्याचा ठपका

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : परीक्षा, निकाल, नामांकन आदी शैक्षणिक बाबींविषयीच्या विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयात तीन वर्षांपूर्वी समन्वयकपदांची निर्मिती करण्यात आली. मात्र, परीक्षेशी निगडित विषयांवर समन्वयक म्हणून काम पाहणारे प्राध्यापक अपयशी ठरले आहे. परिणामी महाविद्यालयातून हे पद रद्द करण्याचा निर्णय परीक्षा व मूल्यमापन मंडळाने घेतला आहे.महाविद्यालय स्तरावर विद्यार्थ्यांचे परीक्षेशी निगडित कामे होत नसल्याने हे विद्यार्थी विद्यापीठाकडे धाव घेतात. त्यामुळे नाईलाजास्तव विद्यार्थ्यांना विद्यापीठ गाठून कामे करावी लागतात. यात विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान होत असून, वेळदेखील व्यर्थ जातो. परिणामी सिनेट सभेत तीन वर्षांपूर्वी विद्यापीठ व महाविद्यालय यांच्यात परीक्षेशी निगडित कामकाजाबाबत प्रत्येक महाविद्यालय स्तरावर एका समन्वयकाची नियुक्ती करण्याचा निर्णय अधिसभेत घेण्यात आला. त्यानुसार समन्वयकपदावर कार्यरत व्यक्तीला दरवर्षी पाच हजार रूपये मानधनसुद्धा देण्यात आले. कालातंराने हे पद मानधनापुरते मर्यादित राहिले, ही बाब बीओयूने बैठकीत चर्चेदरम्यान स्पष्ट केली. महाविद्यालय स्तरावर परीक्षा, निकाल, हॉलतिकीट, नामांकन क्रमांक आदी विद्यार्थ्यांशी निगडित बाबी कमी होण्याऐवजी यात वाढ झाली. महाविद्यालय स्तरावर विद्यार्थ्यांना समन्वयकाकडून मार्गदर्शन मिळत नसल्याच्या तक्रारीसुद्धा विद्यापीठाकडे प्राप्त झाल्या. समन्वयक पदाची निर्मिती ज्या हेतूने झाली, यात विद्यापीठाला कोणताही लाभ झाला नाही. त्यामुळे ३८२ महाविद्यालयांत असलेल्या समन्वयकांची निवड रद्द करण्याचा निर्णय बीओयू मंडळाचे अध्यक्ष कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी घेतला आहे.तीन वर्षांत १६१ समन्वयकांना मानधनअमरावती विद्यापीठाने सन २०१५ पासून प्रत्येक महाविद्यालयात समन्वयक पदाची नियुक्ती केली आहे. दरवर्षी पाच हजार रूपये मानधन देण्यात आले. यात सन २०१५-२०१६ मध्ये ९२ समन्वयक, सन २०१६-२०१७ मध्ये ३० तर सन २०१७-२०१८ मध्ये ३९ समन्वकांना मानधन देण्यात आले आहे. आता येत्या शैक्षणिक सत्रापासून महाविद्यालयात समन्वयक पद असणार नाही.

टॅग्स :universityविद्यापीठ