शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

३८२ महाविद्यालयांतून समन्वयकपद रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 01:13 IST

परीक्षा, निकाल, नामांकन आदी शैक्षणिक बाबींविषयीच्या विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयात तीन वर्षांपूर्वी समन्वयकपदांची निर्मिती करण्यात आली. मात्र, परीक्षेशी निगडित विषयांवर समन्वयक म्हणून काम पाहणारे प्राध्यापक अपयशी ठरले आहे.

ठळक मुद्देपरीक्षा व मूल्यमापन मंडळाचा निर्णय : कुचकामी ठरल्याचा ठपका

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : परीक्षा, निकाल, नामांकन आदी शैक्षणिक बाबींविषयीच्या विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयात तीन वर्षांपूर्वी समन्वयकपदांची निर्मिती करण्यात आली. मात्र, परीक्षेशी निगडित विषयांवर समन्वयक म्हणून काम पाहणारे प्राध्यापक अपयशी ठरले आहे. परिणामी महाविद्यालयातून हे पद रद्द करण्याचा निर्णय परीक्षा व मूल्यमापन मंडळाने घेतला आहे.महाविद्यालय स्तरावर विद्यार्थ्यांचे परीक्षेशी निगडित कामे होत नसल्याने हे विद्यार्थी विद्यापीठाकडे धाव घेतात. त्यामुळे नाईलाजास्तव विद्यार्थ्यांना विद्यापीठ गाठून कामे करावी लागतात. यात विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान होत असून, वेळदेखील व्यर्थ जातो. परिणामी सिनेट सभेत तीन वर्षांपूर्वी विद्यापीठ व महाविद्यालय यांच्यात परीक्षेशी निगडित कामकाजाबाबत प्रत्येक महाविद्यालय स्तरावर एका समन्वयकाची नियुक्ती करण्याचा निर्णय अधिसभेत घेण्यात आला. त्यानुसार समन्वयकपदावर कार्यरत व्यक्तीला दरवर्षी पाच हजार रूपये मानधनसुद्धा देण्यात आले. कालातंराने हे पद मानधनापुरते मर्यादित राहिले, ही बाब बीओयूने बैठकीत चर्चेदरम्यान स्पष्ट केली. महाविद्यालय स्तरावर परीक्षा, निकाल, हॉलतिकीट, नामांकन क्रमांक आदी विद्यार्थ्यांशी निगडित बाबी कमी होण्याऐवजी यात वाढ झाली. महाविद्यालय स्तरावर विद्यार्थ्यांना समन्वयकाकडून मार्गदर्शन मिळत नसल्याच्या तक्रारीसुद्धा विद्यापीठाकडे प्राप्त झाल्या. समन्वयक पदाची निर्मिती ज्या हेतूने झाली, यात विद्यापीठाला कोणताही लाभ झाला नाही. त्यामुळे ३८२ महाविद्यालयांत असलेल्या समन्वयकांची निवड रद्द करण्याचा निर्णय बीओयू मंडळाचे अध्यक्ष कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी घेतला आहे.तीन वर्षांत १६१ समन्वयकांना मानधनअमरावती विद्यापीठाने सन २०१५ पासून प्रत्येक महाविद्यालयात समन्वयक पदाची नियुक्ती केली आहे. दरवर्षी पाच हजार रूपये मानधन देण्यात आले. यात सन २०१५-२०१६ मध्ये ९२ समन्वयक, सन २०१६-२०१७ मध्ये ३० तर सन २०१७-२०१८ मध्ये ३९ समन्वकांना मानधन देण्यात आले आहे. आता येत्या शैक्षणिक सत्रापासून महाविद्यालयात समन्वयक पद असणार नाही.

टॅग्स :universityविद्यापीठ