शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
3
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
4
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
5
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
6
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
7
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
8
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
9
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
10
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
11
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
12
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
13
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
14
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
15
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
16
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
17
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
18
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
19
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
20
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
Daily Top 2Weekly Top 5

३८२ महाविद्यालयांतून समन्वयकपद रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 01:13 IST

परीक्षा, निकाल, नामांकन आदी शैक्षणिक बाबींविषयीच्या विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयात तीन वर्षांपूर्वी समन्वयकपदांची निर्मिती करण्यात आली. मात्र, परीक्षेशी निगडित विषयांवर समन्वयक म्हणून काम पाहणारे प्राध्यापक अपयशी ठरले आहे.

ठळक मुद्देपरीक्षा व मूल्यमापन मंडळाचा निर्णय : कुचकामी ठरल्याचा ठपका

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : परीक्षा, निकाल, नामांकन आदी शैक्षणिक बाबींविषयीच्या विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयात तीन वर्षांपूर्वी समन्वयकपदांची निर्मिती करण्यात आली. मात्र, परीक्षेशी निगडित विषयांवर समन्वयक म्हणून काम पाहणारे प्राध्यापक अपयशी ठरले आहे. परिणामी महाविद्यालयातून हे पद रद्द करण्याचा निर्णय परीक्षा व मूल्यमापन मंडळाने घेतला आहे.महाविद्यालय स्तरावर विद्यार्थ्यांचे परीक्षेशी निगडित कामे होत नसल्याने हे विद्यार्थी विद्यापीठाकडे धाव घेतात. त्यामुळे नाईलाजास्तव विद्यार्थ्यांना विद्यापीठ गाठून कामे करावी लागतात. यात विद्यार्थ्यांचे आर्थिक नुकसान होत असून, वेळदेखील व्यर्थ जातो. परिणामी सिनेट सभेत तीन वर्षांपूर्वी विद्यापीठ व महाविद्यालय यांच्यात परीक्षेशी निगडित कामकाजाबाबत प्रत्येक महाविद्यालय स्तरावर एका समन्वयकाची नियुक्ती करण्याचा निर्णय अधिसभेत घेण्यात आला. त्यानुसार समन्वयकपदावर कार्यरत व्यक्तीला दरवर्षी पाच हजार रूपये मानधनसुद्धा देण्यात आले. कालातंराने हे पद मानधनापुरते मर्यादित राहिले, ही बाब बीओयूने बैठकीत चर्चेदरम्यान स्पष्ट केली. महाविद्यालय स्तरावर परीक्षा, निकाल, हॉलतिकीट, नामांकन क्रमांक आदी विद्यार्थ्यांशी निगडित बाबी कमी होण्याऐवजी यात वाढ झाली. महाविद्यालय स्तरावर विद्यार्थ्यांना समन्वयकाकडून मार्गदर्शन मिळत नसल्याच्या तक्रारीसुद्धा विद्यापीठाकडे प्राप्त झाल्या. समन्वयक पदाची निर्मिती ज्या हेतूने झाली, यात विद्यापीठाला कोणताही लाभ झाला नाही. त्यामुळे ३८२ महाविद्यालयांत असलेल्या समन्वयकांची निवड रद्द करण्याचा निर्णय बीओयू मंडळाचे अध्यक्ष कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी घेतला आहे.तीन वर्षांत १६१ समन्वयकांना मानधनअमरावती विद्यापीठाने सन २०१५ पासून प्रत्येक महाविद्यालयात समन्वयक पदाची नियुक्ती केली आहे. दरवर्षी पाच हजार रूपये मानधन देण्यात आले. यात सन २०१५-२०१६ मध्ये ९२ समन्वयक, सन २०१६-२०१७ मध्ये ३० तर सन २०१७-२०१८ मध्ये ३९ समन्वकांना मानधन देण्यात आले आहे. आता येत्या शैक्षणिक सत्रापासून महाविद्यालयात समन्वयक पद असणार नाही.

टॅग्स :universityविद्यापीठ