शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी हमासला दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले, आता आणखी उशीर नको, अन्यथा...
2
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
3
युरोपपर्यंत पोहोचले बंडाचे वारे, या देशात आंदोलक रस्त्यावर, राष्ट्रपती भवनाला घेराव, पोलिसांसोबत संघर्ष
4
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
5
रोहित शर्माच्या कप्तानीसोबत या दोन सिनियर खेळाडूंच्या वनडे कारकिर्दीलाही निवड समितीने दिला पूर्णविराम? 
6
केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांचे शिर्डी विमानतळावर आगमन
7
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
8
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
9
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
10
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
11
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
12
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
13
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

सहकारी संस्था भकास, गर्दी झाली झकास

By admin | Updated: March 15, 2015 00:34 IST

तालुक्यातील ३० सहकारी संस्थांच्या निवडणुका शासनाने घोषित केल्याने एकांतवासात असलेल्या सहायक निबंधक कार्यालयाला यात्रेचे स्वरुप आले आहे.

प्रभाकर भगोले  चांदूररेल्वेतालुक्यातील ३० सहकारी संस्थांच्या निवडणुका शासनाने घोषित केल्याने एकांतवासात असलेल्या सहायक निबंधक कार्यालयाला यात्रेचे स्वरुप आले आहे. सहकारी संस्था लाखो रूपयांनी तोट्यात असताना निवडणुकीसाठी राजकीय कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्याचेही चित्र आहे. सहकारी संस्था डबघाईस आल्या असताना आणि त्या संस्थांत उत्पन्नाचे साधन नसताना एवढी गर्दी कशासाठी हा चर्चेचा विषय आहे. अमरावती जिल्हा सहकारी बँकेवर संचालक निवडताना प्रत्येक सेवा सहकारी सोसायटीचे निवडून दिलेल्या बँक प्रतिनिधींचे सहकारी बँकेच्या निवडणुकीत महत्त्व वाढले आहे. मतदान करण्यासाठी लाखोची उलाढाल होत असते. बँकेच्या निवडणुकीवर डोळा ठेवून या सेवा सहकारी संस्थांच्या निवडणुकीला विशेष महत्त्व आल्याने संस्था कशाही असो पण निवडणुकीची चढाओढ मोठ्या प्रमाणात सुरू आहे. काँग्रेस विरूद्ध भाजप कार्यकर्त्यांत सध्या चढाओढ सुरू आहे. प्राथमिक सेवा सहकारी संस्थांच्या प्राथमिक यादी घोषित केल्यानंतर प्राथमिक यादीवरून मोठा गोंधळ सुरू झाल्याचेही चित्र होते. यात पळसखेड, कवठा (कडू), सोनोरा, राजुरा, सावंगा (विठोबा) सह इतर सोसायट्यांचा समावेश होता. या सोसायटीच्या यादीवरून सर्वच राजकीय नेत्यांच्या पक्षाकडून सहायक निबंधक कार्यालयाचा दूरध्वनी सारखा खणखणत होता. अधिकाऱ्याकडून सारखी यादीची माहितीची विचारणा झाल्याची चर्चा नजीकच्या रेस्टारंटमध्ये घडू लागल्या. यावरून सध्या सेवा सहकारी संस्थांच्या निवडणुकांविषयी राज्य शासनाकडून निवडणुकीसाठी सारखी मनाई होत होती. आता एकाच वेळी निवडणुका लागल्याने कधीही सहायक निबंधक कार्यालयाची पायरी न ओलांडणारे कार्यकर्तेही दिसू लागले आहेत. लाखो रूपयांच्या तोट्यात असलेल्या संस्थांत फक्त निवडणुकीची झकास गर्दी पहावयास मिळत आहे. सहकारी संस्थांची उभारणी कशी करायची. तोट्यात आलेल्या संस्था नफ्यात येण्यासाठी संस्थांच्या सभासदांचा उपयोग कसा होईल, हा उद्देश कोणीच ठेवत नाही. बैद्यनाथन समितीच्या अहवालानुसार संस्थेचे शेअर्स भांडवल वाढविणे, सभासदांच्या ठेवी स्वीकारणे, जमा झालेल्या ठेवीतून व्यापाराची उलाढाल करून सभासदांना उत्तम बियाणे, खते, कीटकनाशक व उत्पादित शेतीमाल तारणावर ठेवणे असे असताना या बाबीकडे सहकारी संस्थांच्या नेत्यांनी दुर्लक्ष केले आहे. शेतमालाचे बाजारात भाव घसरले तर शेतामल तारणावर ठेवून शेतकरी वर्ग नाडविला जात नाही व चढ्या भावात शेतमाल विक्री करण्यासाठी याचा फायदा शेतकऱ्यांना होतो. हाच उद्देश सेवा सहकारी सोसायट्याचा आहे. यामुळे गावातील सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळेल. परंतु या उद्देशाला फाटा देऊन याच वर्षानंतर निवडणुका लावायच्या व चार वर्षे गप्प राहायचे, असा पायंडा सहकारच्या नेत्यांनी पाडला आहे. दिवसेंदिवस सहकारी संस्था डबघाईस येत असल्याने राज्यकर्त्यांनी याची दखल घेणे गरजेचे झाले आहे. सध्या सेवा सहकारी सोसायटीच्या निवडणुकीची तयारी सुरु आहे.