शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

वाढत्या कोरोनाची मुख्यमंत्र्यांकडून दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2021 05:01 IST

 ‘एससीडीसी’चे संचालक सुजित सिंग यांच्या अध्यक्षतेत तीन सदस्यीय समितीने जिल्ह्यात आढावा बैठक घेऊन कोरोना वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर काही सूचना केल्या होत्या. यानंतर त्यांनी मुंबईला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी संवाद साधला होता. यासंदर्भात विभागीय आयुक्त पीयूश सिंह यांच्याशीही संपर्क साधला. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.

ठळक मुद्देकेंद्रीय पथकांचे रिपोर्टींग, विभागीय आयुक्तांना आरोग्यमंत्र्यांच्या सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : जिल्ह्यात तीन दिवसांपूर्वी तीन सदस्यीय केंद्रीय समितीने कोरोना संसर्गवाढीचा आढावा घेतला. पथकाने नोंदविलेल्या निरीक्षणाचे रिपोर्टींग त्यांनी ८ फेब्रुवारीला मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांना केल्यानंतर  अधिक सतर्क राहण्याच्या सूचना विभागीय आयुक्तांना केल्याची माहिती आहे. ‘एससीडीसी’चे संचालक सुजित सिंग यांच्या अध्यक्षतेत तीन सदस्यीय समितीने जिल्ह्यात आढावा बैठक घेऊन कोरोना वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर काही सूचना केल्या होत्या. यानंतर त्यांनी मुंबईला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याशी संवाद साधला होता. यासंदर्भात विभागीय आयुक्त पीयूश सिंह यांच्याशीही संपर्क साधला. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही.जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे १० महिन्यांच्या कालावधीत ८ फेब्रुुवारीपर्यंत २,५०,३०० नमुन्यांची तपासणी करण्यात आली. यात २३,३९३ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. हा दर १२.५६ टक्के आहे. या कालावधीत हायरिस्कच्या ६७,५२९ जणांशी संपर्क आलेला आहे. हे प्रमाण १.९६ टक्के तर लो रिस्कमध्ये १,८२,७७० व्यक्तीशी संपर्क करण्यात आलेला आहे. हे प्रमाण ७.८४ टक्के आहे. मात्र  आरोग्य संचालकांनी एका कोरोनाग्रस्तामागे ३० कॉन्टक्ट ट्रेसींगचे निर्देश दिले असताना अमरावती जिल्ह्यात हे प्रमाण खूप माघारल्याने कोरोना संसर्गात दिवसेंदिवस वाढ होत असल्याचा आरोप होत आहे.आतापर्यंत २३,३९३ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. यात ७८१८ पॅझिटिव्ह हे ग्रामीण भागातील आहे. यापैकी ७,३६३ जणांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे. महापालकिा क्षेत्रात २५५ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला, तर ग्रामीण भागात १६९ व्यक्ती कोरोनाचे बळी ठरले आहेत. जिल्ह्यात सद्यस्थितीत ७००५ अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यापैकी ३९८ रुग्णांवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू आहे. आयसीयूमध्ये ८१ रुग्ण आहेत तर २ रुग्णाला व्हेंटीलेटर लागले आहे. २८० ऑक्सिजन बेडपैकी ६२ बेडवर रुग्ण असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सकाच्या अहवालात नमूद आहे. 

१०,८७४ जणांना कोरोनाची लसमंगळवारपर्यंत जिल्ह्यात १०,८७४ पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील लाभार्थींना कोरोनाची लस देण्यात आलेली आहे. यासाठी केंद्रही वाढविण्यात आलेली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील २१ बुथवर लसीकरणाचे सत्र सुरू आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील महसूलसह शासकीय यंत्रणांना कोरोनाची लस व काळजी घ्यायच्या टिप्स देण्यात येत आहे. 

असिम्टमॅटिक रुग्णांचा खुलेपणाने वावरकोरोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी आरोग्य संचालकांनी एका रुग्णामागे किमान ३० कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे निर्देश आरोग्य यंत्रणेला दिले आहे. जिल्ह्यात मात्र, जिल्ह्यात मात्र हे  प्रमाण १० टक्कयांवरच असल्याने असिम्टमॅटिक रुग्ण बाहेर मोकळेपणाने वावरत आहे. त्यामुळेही काही प्रमाणात संसर्ग वाढल्याची वस्तूस्थिती आहे. 

कोरोनासंदर्भातील उपाययोजनांचे पालन करण्यासोबतच ज्या भागात जास्त पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद होत आहे, तेथे चाचण्या वाढविणे, याशिवाय रुग्णालयातील बेडची स्थिती, औषधींचा साठा पुरेसा ठेवण्याच्या सुचना आहेत.- शैलेश नवाल, जिल्हाधिकारी

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लस