शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
2
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
3
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
4
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
5
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
6
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
7
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
8
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
9
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
10
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
12
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
13
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
14
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
15
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
16
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
17
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
18
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
19
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
20
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट

अंजनगाव तालुक्यात पिकांवर ढगांचा महिरप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2020 5:00 AM

ढगाळ वातावरण असतानाच अंजनगाव व अचलपूर तालुक्यात अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे कापूस ओला होऊन पिवळा पडत आहे. फुटण्याच्या अवस्थेत असलेली बोंड किडत आहेत. पावसाने तुरीची फुले गळत असून, अळ्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परिणामी, अर्धेअधिक तुरीचे दाणे अळ्यांच्या घशात जात आहेत, शिवाय या दूषित वातावरणाने रबी हंगामातील हरभरा व कांदा या पिकांनासुद्धा हानी पोहचत आहे.

ठळक मुद्देअळ्यांचा प्रादुर्भाव वाढला

 लोकमत न्यूज नेटवर्कअंजनगाव सुर्जी : दहा-पंधरा दिवसांपासून अंजनगाव तालुक्यात पिकांवर ढगांचा महिरप सजला आहे. मात्र, तो महिरप पिकांवरील अळ्यांसाठी पोषक असल्याने शेतकरी पुन्हा चिंताग्रस्त झाला आहे.  खरीप हंगामातील शिल्लक असलेला कापूस व तूर आणि रबी हंगामातील हरभरा व कांदा पिकाला या वातावरणाचा फटका बसत आहे.ढगाळ वातावरण असतानाच अंजनगाव व अचलपूर तालुक्यात अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. यामुळे कापूस ओला होऊन पिवळा पडत आहे. फुटण्याच्या अवस्थेत असलेली बोंड किडत आहेत. पावसाने तुरीची फुले गळत असून, अळ्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. परिणामी, अर्धेअधिक तुरीचे दाणे अळ्यांच्या घशात जात आहेत, शिवाय या दूषित वातावरणाने रबी हंगामातील हरभरा व कांदा या पिकांनासुद्धा हानी पोहचत आहे. कांद्याचे रोप तयार करण्याची प्रक्रिया वांदयात आली आहे. 

कांद्याला फटकाअतिशय संवेदनशील असलेल्या अंकुरलेल्या कांद्यावर ढगाळ वातावरणाचा दुष्परिणाम होऊन ते जळत आहे. या प्रकारामुळे शेतकऱ्यांना फवारणीचा अतिरिक्त खर्च करावा लागत आहे. पूर्वी अतिपावसाने खरीप हंगामाचे वाटोळे केले. आता रबी हंगामालासुद्धा वातावरणाचा फटका बसणार आहे. तालुक्यात रबी हंगामाची पेरणी पूर्ण झाली. मात्र, तीन दिवसांपासून असलेल्या ढगाळ वातावरणाचा पिकांवर विपरीत परिणाम होत आहे. हरभऱ्यावर घाटेअळी व मर, तुरीवर शेंगा पोखरणारी अळी व माशा तसेच कांदा पिकावर करपा व फुलकिडे आहेत.